शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

आता गावागावांत पोहोचवणार ब्रॉडबॅण्ड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 05:18 IST

पंतप्रधान मोदी यांच्या स्वप्नातील डिजिटल इंडिया साकारण्यासाठी सरकारने आता जोमात काम सुरू केले असून, गावागावांत ब्रॉडबॅण्ड सेवा देण्यासाठी नवी मोहीम सुरू केली आहे.

- संतोष ठाकूरनवी दिल्ली : पंतप्रधान मोदी यांच्या स्वप्नातील डिजिटल इंडिया साकारण्यासाठी सरकारने आता जोमात काम सुरू केले असून, गावागावांत ब्रॉडबॅण्ड सेवा देण्यासाठी नवी मोहीम सुरू केली आहे. दूरसंचार मंत्रालयाने ग्रामीण भागांतील सरकारी शाळा, पोलीस ठाणी, टपाल कार्यालये, आरोग्य केंद्रे व इतर सरकारी कार्यालये डिसेंबरपर्यंत ब्रॉडबॅण्डने सुसज्ज करण्याचे ठरवले आहे. एक लाख शाळा तसेच दहा हजार पोलीस ठाणी आणि आरोग्य केंद्रांना याचा लाभ मिळेल.हाती घेणार राष्ट्रीय मोहीमप्रत्येकाच्या हाती स्मार्टफोन पोहोचला असून आता मोबाइल इंटरनेट सेवाही स्वस्त झालेली आहे. परंतु, सरकारी कार्यालयांमध्ये ब्रॉडबॅण्ड नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे ग्रामीण भागांत ब्रॉडबॅण्डचा प्रसार व्हावा व लोकांना ते आॅन-डिमांड उपलब्ध व्हावे, यासाठी राष्टÑीय मोहीम हाती घेण्यात येत आहे.सव्वा लाख टपाल कार्यालयांनाही लाभ : सव्वा लाख ग्रामीण टपाल कार्यालये, २५ हजार आरोग्य केंद्रे, ५० हजारपेक्षा अधिक सार्वजनिक आरोग्य केंद्रांनाही ब्रॉडबॅण्ड देण्यात येणार आहे. यासाठी समित्या केल्या असून, रोज किती काम झाले, याची माहिती त्याद्वारे मिळेल. स्थानिक लोकांनाही सल्ला-कार्य प्रगती, देखरेख यांत सामील करून घेण्यात येईल.ब्रॉडबॅण्डच्या केबलच्या दर्जाबद्दल प्रश्न उपस्थित केले जातात. ही समस्या दूर करण्यासाठी राष्टÑीय फायबर आॅथॉरिटी करण्याचाही निर्णय घेण्यात आला.सध्या देशात फक्त ३० टक्के ब्रॉडबॅण्डचा वापर आहे. हे प्रमाण १०० टक्के करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी शहरे व ग्रामीण भागांकरिता स्वतंत्र ब्रॉडबॅण्ड धोरण तयार करीत आहोत. पब्लिक डेटा आॅफिस (पीडीओ) हे या दिशेने टाकलेले पाऊल आहे. नुकत्याच झालेल्या दूरसंचार आयोगाच्या बैठकीत त्यास मंजुरी देण्यात आली. ग्रामीण भागांमध्ये १०० एमबीपीएस स्पीड दिली जाणार आहे.- अरुणा सुंदरराजन,दूरसंचार सचिव 

टॅग्स :InternetइंटरनेटIndiaभारत