शहरं
Join us  
Trending Stories
1
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
2
ट्रम्प यांनी भारतावर का लावलंय मोठ्या प्रमाणात टॅरिफ, अखेर व्हाईट हाऊसनं सांगितलं कारण
3
'नोरा फतेहीसारखी फिगर बनव'; पतीने केला पत्नीचा अतोनात छळ, चिडलेल्या तिने शिकवला 'असा' धडा!
4
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
5
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
6
Mumbai Rain Updates Live: मुंबईसाठी हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट, मुंबई रेल्वेची वाहतूक धीम्या गतीनं सुरू
7
गृहकर्जाचे हप्ते डोईजड झालेत? सरकार स्वस्तात देतंय २५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज; कोण घेऊ शकतो लाभ?
8
'मुंबईचा फौजदार' सिनेमाचा रिमेक येणार? गश्मीर म्हणाला- "मी सिनेमा बनवेन पण प्राजक्ता माळीला..."
9
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
10
Ritul: मासिक पाळीदरम्यान केस का धुवू नयेत? जाणून घ्या शास्त्र आणि विज्ञान!
11
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
12
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
13
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
14
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
15
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
16
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
17
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
18
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
19
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
20
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...

आता भाजपाला येणार ‘बुरे दिन’

By admin | Updated: January 16, 2017 04:55 IST

नरेंद्र मोदी सरकारने नोटाबंदी करून, देशातील ९० टक्के जनतेला कंगाल केले

मीना कमल,

लखनौ- नरेंद्र मोदी सरकारने नोटाबंदी करून, देशातील ९० टक्के जनतेला कंगाल केले असून, उत्तर प्रदेशातील जनतेला त्याचा मोठाच फटका बसला आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशातील मतदार विधानसभा निवडणुकीत भाजपाला धडा शिकवल्याशिवाय गप्प बसणार नाहीत, असा असा इशारा बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी रविवारी दिला. आपल्या ६१ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित सोहळ्याद्वारे त्यांनी बसपाच्या प्रचाराची रणनीतीच निश्चित केली.राज्यातील विधानसभा निवडणुकीत बहुजन समाज पार्टी स्वबळावरच लढेल आणि कोणाशीही समझोता करणार नाही, असे सांगून मायावती म्हणाल्या की, भाजपाने सत्तेत येण्यासाठी जनतेला अच्छे दिनचे आश्वासन दिले होते. पण आता भाजपाचे बुरे दिन येणार आहेत. नोटाबंदीचा मोठा फटका गरीब व मध्यमवर्गालाच बसला. त्यामुळे हे सारे संतापलेले मतदार भाजपाच्या विरोधात मतदान करतील, याबद्दल माझ्या मनात काडीमात्र शंका नाही.काँग्रेसकडे गांभीर्याने पाहण्याचे कारण नाही, कारण उत्तर प्रदेशात हा पक्षच शिल्लक राहिलेला नाही, असे सांगताना मायावती यांनी समाजवादी पार्टी आणि भाजपा यांच्या छुपा समझोता झाला असल्याचाही आरोप केला. समाजवादी पार्टीने उत्तर प्रदेशचे मोठे नुकसान गेल्या पाच वर्षांत केले. आता तर तिथे बाप आणि बेटा यांचेही पटत नाही, असे सांगून त्या म्हणाल्या एकीकडे काँग्रेसशी समझोता करण्याची भाषा अखिलेश यादव यांचे समर्थक करीत आहेत. पण प्रत्यक्षात भाजपाचा फायदा व्हावा, अशीच त्यांची पावले पडत आहेत.सक्तवसुली संचालनालयाने बसपाच्या खात्यामध्ये १०४ कोटी रुपये असल्याचे सांगितले होते. याचा उल्लेख करून त्या म्हणाल्या निवडणुका जवळ आल्याबरोबरच चौकशी मागे लावण्याचा आणि बसपाला त्रास देण्याचा प्रयत्न मोदी सरकार करीत आहेत. आपल्या भावाच्या अवाढव्य मालमत्तेच्या प्रसिद्ध झालेल्या बातम्यांचाही उल्लेख करीत, माझ्या भावाने नियमांचे उल्लंघन करून, इतकी मालमत्ता जमवली असे सरकारला म्हणायचे असेल, तर गेली अडीच वर्षे मोदी सरकार का गप्प होते? इतके दिवस भावावर का कारवाई झाली नाही? निवडणुका तोंडावर येताच त्यांना भावाच्या मालमत्तेची आठवण कशी झाली? असे सवाल त्यांनी केले. >विविध राजकीय पक्षांतील ३00 बड्या नेत्यांच्या संपत्तीची चौकशी केली, तर बरेच काही उघड होईल, असे सांगतानाच मायावती यांनी भाजपा नेत्यांच्या बँक खात्यांची माहिती उघड करण्यात यावी आणि या नेत्यांनी नोटाबंदीच्या आधी १0 महिने काय बँक व्यवहार केले, तेही उघड करावेत, अशी मागणी केली.