शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्याची अधिसूचना, २० राज्यांतील ९१ मतदारसंघांत ११ एप्रिलला मतदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2019 06:06 IST

देशातील २० राज्यांतल्या ९१ मतदारसंघांत लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यासाठी ११ एप्रिलला मतदान होणार असून, त्या संदर्भातील अधिसूचना सोमवारी जारी करण्यात आली.

नवी दिल्ली - देशातील २० राज्यांतल्या ९१ मतदारसंघांत लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यासाठी ११ एप्रिलला मतदान होणार असून, त्या संदर्भातील अधिसूचना सोमवारी जारी करण्यात आली.या निवडणुकांत केंद्रातील सत्ता टिकविण्याचा भाजपाकडून, तर त्या पक्षाला हरविण्याचे काँग्रेस व अन्य विरोधी पक्षांकडून आटोकाट प्रयत्न सुरू झाले आहेत. लोकसभा निवडणुका सात टप्प्यांत होणार आहेत. पहिल्या टप्प्याबाबतची राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची स्वाक्षरी केलेली अधिसूचना निवडणूक आयोगाने जारी केली आहे. निवडणुका होऊ घातलेल्या मतदारसंघांमध्ये सोमवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करून घेण्याच्या प्रक्रियेस सुरुवात झाली असून, ती २५ मार्चपर्यंत चालणार आहे. या अर्जांची २६ मार्च रोजी छाननी होईल. त्यानंतर, २८ मार्चपर्यंत उमेदवारांना आपले अर्ज मागे घेता येतील. त्या दिवशी संध्याकाळी ९१ लोकसभा मतदारसंघांतील उमेदवारांची एकूण संख्या किती आहे, ते कळू शकेल.लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यामध्ये आंध्र प्रदेश (२५), अरुणाचल प्रदेश (२), आसाम (५), बिहार (४), छत्तीसगड (१), जम्मू-काश्मीर (२), महाराष्ट्र (७), मणिपूर (१), मेघालय (२), मिझोरम (१), नागालँड (१), ओडिशा (४), सिक्किम (१), तेलंगणा (१७), त्रिपुरा (१), उत्तर प्रदेश (८), उत्तराखंड (५), पश्चिम बंगाल (२), अंदमान आणि निकोबार बेटे (१), लक्षद्वीप (१) या ठिकाणी मतदान होणार आहे.तेलंगणामध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवातहैदराबाद : लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यासाठी ११ एप्रिलला मतदान होत आहे. तेलंगणामध्ये सोमवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. या राज्यात उमेदवारांचे अर्ज २५ मार्चपर्यंत स्वीकारण्यात येतील.डिसेंबरमध्ये विधानसभा निवडणुकांत दणदणीत विजय मिळविल्यानंतर, त्याचीच पुनरावृत्ती आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये होईल, असा विश्वास सत्ताधारी तेलंगणा राष्ट्र समिती (टीआरएस) या पक्षाला वाटत आहे. राज्यात लोकसभेच्या १७ जागा असून, त्यापैकी १६ जागा टीआरएस लढविणार असून, एक जागा एआयएमआयएम या मित्रपक्षाला देण्यात आली आहे.टीआरएसचे प्रमुख व मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी रविवारी करीमनगर येथून प्रचारमोहिमेचा प्रारंभ केला. ते म्हणाले की, भाजपा व काँग्रेसने जनतेच्या भल्यासाठी काहीही भरीव काम केलेले नाही. या दोन पक्षांचा मुकाबला करण्यासाठी देशात पर्यायी संघराज्य राजकारण अस्तित्वात आले पाहिजे. त्यासाठी मी महत्त्वाची भूमिका बजावण्यास तयार आहे. देशामध्ये वेगाने सुधारणा घडविण्यासाठी वेळप्रसंगी राष्ट्रीय पक्ष स्थापन करण्याचीही तयारी त्यांनी दर्शविली. मात्र, टीआरएसने अजून उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही. डाव्या पक्षांचे काही आमदार गेल्या काही महिन्यांत टीआरएसमध्ये गेल्यामुळे ते पक्ष काहीसे हताश आहेत. (वृत्तसंस्था)एमआयएम आघाडीआॅल इंडिया मजलिस-ए-इत्तेहदुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) या पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी सोमवारी हैदराबादमधून उमेदवारी दाखल केली. दुर्बल, वंचित गटांचा आवाज हैदराबादमधून बुलंद केला जातो. यापुढेही हे कार्य आम्ही असेच सुरूच ठेवू, असे ओवेसी म्हणाले. २००४ सालापासून ते हैदराबादमधून सातत्याने लोकसभेवर निवडून येत आहेत. टीआरएसने एआयएमआयएमला पाठिंबा जाहीर केला आहे. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकIndiaभारत