शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
2
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
3
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
4
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
5
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
6
Health Tips: शरीरावर असलेले लाल तीळ कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
7
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका
8
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
9
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
10
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
11
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
12
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
13
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
14
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
15
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
16
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये सलमान खानची एन्ट्री, 'या' भूमिकेत दिसणार भाईजान
18
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
19
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
20
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी

लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्याची अधिसूचना, २० राज्यांतील ९१ मतदारसंघांत ११ एप्रिलला मतदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2019 06:06 IST

देशातील २० राज्यांतल्या ९१ मतदारसंघांत लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यासाठी ११ एप्रिलला मतदान होणार असून, त्या संदर्भातील अधिसूचना सोमवारी जारी करण्यात आली.

नवी दिल्ली - देशातील २० राज्यांतल्या ९१ मतदारसंघांत लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यासाठी ११ एप्रिलला मतदान होणार असून, त्या संदर्भातील अधिसूचना सोमवारी जारी करण्यात आली.या निवडणुकांत केंद्रातील सत्ता टिकविण्याचा भाजपाकडून, तर त्या पक्षाला हरविण्याचे काँग्रेस व अन्य विरोधी पक्षांकडून आटोकाट प्रयत्न सुरू झाले आहेत. लोकसभा निवडणुका सात टप्प्यांत होणार आहेत. पहिल्या टप्प्याबाबतची राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची स्वाक्षरी केलेली अधिसूचना निवडणूक आयोगाने जारी केली आहे. निवडणुका होऊ घातलेल्या मतदारसंघांमध्ये सोमवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करून घेण्याच्या प्रक्रियेस सुरुवात झाली असून, ती २५ मार्चपर्यंत चालणार आहे. या अर्जांची २६ मार्च रोजी छाननी होईल. त्यानंतर, २८ मार्चपर्यंत उमेदवारांना आपले अर्ज मागे घेता येतील. त्या दिवशी संध्याकाळी ९१ लोकसभा मतदारसंघांतील उमेदवारांची एकूण संख्या किती आहे, ते कळू शकेल.लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यामध्ये आंध्र प्रदेश (२५), अरुणाचल प्रदेश (२), आसाम (५), बिहार (४), छत्तीसगड (१), जम्मू-काश्मीर (२), महाराष्ट्र (७), मणिपूर (१), मेघालय (२), मिझोरम (१), नागालँड (१), ओडिशा (४), सिक्किम (१), तेलंगणा (१७), त्रिपुरा (१), उत्तर प्रदेश (८), उत्तराखंड (५), पश्चिम बंगाल (२), अंदमान आणि निकोबार बेटे (१), लक्षद्वीप (१) या ठिकाणी मतदान होणार आहे.तेलंगणामध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवातहैदराबाद : लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यासाठी ११ एप्रिलला मतदान होत आहे. तेलंगणामध्ये सोमवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. या राज्यात उमेदवारांचे अर्ज २५ मार्चपर्यंत स्वीकारण्यात येतील.डिसेंबरमध्ये विधानसभा निवडणुकांत दणदणीत विजय मिळविल्यानंतर, त्याचीच पुनरावृत्ती आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये होईल, असा विश्वास सत्ताधारी तेलंगणा राष्ट्र समिती (टीआरएस) या पक्षाला वाटत आहे. राज्यात लोकसभेच्या १७ जागा असून, त्यापैकी १६ जागा टीआरएस लढविणार असून, एक जागा एआयएमआयएम या मित्रपक्षाला देण्यात आली आहे.टीआरएसचे प्रमुख व मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी रविवारी करीमनगर येथून प्रचारमोहिमेचा प्रारंभ केला. ते म्हणाले की, भाजपा व काँग्रेसने जनतेच्या भल्यासाठी काहीही भरीव काम केलेले नाही. या दोन पक्षांचा मुकाबला करण्यासाठी देशात पर्यायी संघराज्य राजकारण अस्तित्वात आले पाहिजे. त्यासाठी मी महत्त्वाची भूमिका बजावण्यास तयार आहे. देशामध्ये वेगाने सुधारणा घडविण्यासाठी वेळप्रसंगी राष्ट्रीय पक्ष स्थापन करण्याचीही तयारी त्यांनी दर्शविली. मात्र, टीआरएसने अजून उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही. डाव्या पक्षांचे काही आमदार गेल्या काही महिन्यांत टीआरएसमध्ये गेल्यामुळे ते पक्ष काहीसे हताश आहेत. (वृत्तसंस्था)एमआयएम आघाडीआॅल इंडिया मजलिस-ए-इत्तेहदुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) या पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी सोमवारी हैदराबादमधून उमेदवारी दाखल केली. दुर्बल, वंचित गटांचा आवाज हैदराबादमधून बुलंद केला जातो. यापुढेही हे कार्य आम्ही असेच सुरूच ठेवू, असे ओवेसी म्हणाले. २००४ सालापासून ते हैदराबादमधून सातत्याने लोकसभेवर निवडून येत आहेत. टीआरएसने एआयएमआयएमला पाठिंबा जाहीर केला आहे. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकIndiaभारत