शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

नोटाबंदी म्हणजे कायदेशीर लूट, काँग्रेस सरकारच्या काळात आम्ही 14 कोटी लोकांची गरीबी दूर केली - मनमोहन सिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2017 13:04 IST

उद्या आठ नोव्हेंबर असून नोटाबंदीच्या निर्णयाला एकवर्ष पूर्ण होत आहे. आठ नोव्हेंबर भारताची अर्थव्यवस्था आणि लोकशाहीसाठी काळा दिवस आहे.

ठळक मुद्देआपल्या देशाच्या जनतेवर लादण्यात आलेल्या नोटाबंदीच्या अनर्थकारी निर्णयाला एकवर्ष पूर्ण होत आहेअर्थव्यवस्थेला कॅशलेस बनवण्यासाठी सक्तीचा नोटाबंदीचा   निर्णय पूर्णपणे फसला आहे.

अहमदाबाद - उद्या आठ नोव्हेंबर असून नोटाबंदीच्या निर्णयाला एकवर्ष पूर्ण होत आहे. आठ नोव्हेंबर भारताची अर्थव्यवस्था आणि लोकशाहीसाठी काळा दिवस आहे अशा शब्दात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी नरेंद्र मोदी सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयावर टीका केली. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी गुजरातमध्ये आलेल्या मनमोहन सिंग यांनी अर्थव्यवस्थेच्या मुद्यावरुन भाजपा आणि मोदी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसने माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी प्रचारासाठी मैदानात उतरवले आहे. 

उद्या आपल्या देशाच्या जनतेवर लादण्यात आलेल्या नोटाबंदीच्या अनर्थकारी निर्णयाला एकवर्ष पूर्ण होत आहे. एकाच फटक्यात 86 टक्के चलन रद्द करण्याचा निर्णय जगातील कुठल्याही देशाने घेतलेला नाही असे मनमोहन सिंग म्हणाले. अर्थव्यवस्थेला कॅशलेस बनवण्यासाठी सक्तीचा नोटाबंदीचा   निर्णय पूर्णपणे फसला आहे. या निर्णयाचा काहीही परिणाम झाला नाही. नोटाबंदी म्हणजे संघटीत आणि कायदेशीर लूट होती. छोटे शेतकरी आणि उद्योजकांना याचा फटका बसला असे मनमोहन सिंग म्हणाले. 

 

नोटाबंदी आणि जीएसटी हे दोन निर्णय आपल्या अर्थव्यवस्थेसाठी मारक ठरले असून, यामुळे छोटया उद्योगांचा कण मोडला असे मनमोहन सिंग यांनी सांगितले. भारतीयांच्या नोक-यांच्या मोबदल्यात आपण चिनी वस्तूंची आयात करतोय असे मनमोहन सिंग म्हणाले.  2016-17 मध्ये आपण चीनकडून 1.96 लाख कोटी रुपयांचा माल आयात केला. 2017-18 मध्ये हेच प्रमाण वाढवून 2.41 लाख कोटी रुपये झाले असे सिंग म्हणाले. आमच्या सरकारच्या कार्यकाळात आम्ही 14 कोटी लोकांची गरीबी दूर केली हे अभिमानाने सांगू शकतो असे मनमोहन सिंग म्हणाले. 

 

माल आयात करण्यामध्ये अनपेक्षित वाढ झाली असून 45 हजार कोटींपेक्षा जास्त माल आयात केला. आयातीमध्ये वर्षभरात 23 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली असे मनमोहन सिंग म्हणाले. बुलेट ट्रेनबद्दल प्रश्न विचारला म्हणून आम्ही विकासविरोधी ठरतो का ?, जीएसटी, नोटाबंदीबद्दल प्रश्न विचारणे कर चुकवेगिरी ठरते का ? असा सवाल मनमोहन सिंग यांनी विचारले.  

 

टॅग्स :Manmohan Singhमनमोहन सिंगNote Banनोटाबंदी