शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
3
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
4
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
5
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
6
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
7
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
8
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
9
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
10
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
11
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
12
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
13
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
14
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
15
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
16
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
17
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
18
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
19
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
20
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
Daily Top 2Weekly Top 5

"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 20:08 IST

विमान तिकीटांच्या दरावर वर्षभर कमाल मर्यादा लागू मागणी केंद्र सरकारले फेटाळली आहे.

Central Government on Airfare: इंडिगोच्या मोठ्या प्रमाणात विमानांची उड्डाणे रद्द झाल्यामुळे प्रवाशांना झालेल्या त्रासाच्या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारने हवाई तिकीट दरांवर वर्षभर कमाल मर्यादा लागू करण्याची मागणी लोकसभेत फेटाळून लावली आहे. नागरी उड्डयन मंत्री के. राममोहन नायडू यांनी शुक्रवारी लोकसभेत या विषयावर माहिती दिली. केंद्रीय मंत्री नायडू यांनी सभागृहात सांगितले की, हवाई दरांवर वर्षभर मर्यादा घालणे हे अव्यवहार्य आहे. चढ-उतार आणि मागणीतील बदल लक्षात घेता, सरकार संपूर्ण वर्षासाठी किंमती निश्चित करू शकत नाही.

सणासुदीच्या काळात किंवा जास्त मागणीच्या वेळी हवाई भाड्यामध्ये वाढ होणे स्वाभाविक असल्याचे मंत्री के. राममोहन नायडू म्हणाले. नागरी उड्डयन क्षेत्राला झपाट्याने वाढवण्यासाठी बाजाराचे डि-रेग्युलेशन ठेवणे ही प्राथमिक आणि आवश्यक अट असल्याचे सांगितले. बाजारात अधिक कंपन्या आल्यास आणि नियमनमुक्त स्पर्धा वाढल्यास मागणी आणि पुरवठ्याच्या नैसर्गिक नियमांमुळे अंतिम फायदा प्रवाशालाच होतो, असेही ते म्हणाले.

एका खासगी सदस्याने सादर केलेल्या विमान भाडे नियंत्रण विधेयकावर उत्तर देताना नायडू म्हणाले की, ज्या देशांमध्ये हवाई वाहतुकीत प्रचंड वाढ झाली आहे, त्या सर्वांनी आपले बाजार नियंत्रणमुक्त ठेवले आहेत. नायडू यांनी सांगितले की, "जर आपल्याला या क्षेत्राची खऱ्या अर्थाने वाढ करायची असेल, तर बाजार नियंत्रणमुक्त ठेवणे आवश्यक आहे, जेणेकरून अधिक कंपन्या बाजारात उतरू शकतील."

सरकारच्या हस्तक्षेपाचा अधिकार अबाधित

बाजाराचे नियमनमुक्त धोरण असले तरी, त्याचा अर्थ कंपन्यांना पूर्ण सूट दिली आहे असा होत नाही, असेही नायडू यांनी स्पष्ट केले. एअरक्राफ्ट ॲक्टनुसार, केंद्र सरकारला असाधारण परिस्थितीत विशेषतः कंपन्यांकडून भाड्याचा गैरवापर होण्याची शक्यता असताना, हस्तक्षेप करण्याचे पुरेसे अधिकार आहेत. या अधिकारांमध्ये प्रवाशांकडून गैरवाजवी दर आकारले जात असल्यास तिकीटाच्या दराला कमाल मर्यादा लागू करण्याचाही समावेश आहे.

इंडिगो संकट आणि सरकारी हस्तक्षेप

अलीकडेच डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात इंडिगोच्या हजारोंच्या संख्येने उड्डाणे रद्द झाल्यामुळे हवाई भाड्यामध्ये मोठी वाढ झाली होती. या दरवाढीला सरकारने संधीसाधूपणा म्हटले होते. त्यावेळी सरकारने तातडीने हस्तक्षेप करत, अत्यधिक भाडेवाढ रोखण्यासाठी तात्पुरते भाड्याचे स्लॅब लागू केले होते. या संकटाच्या चौकशीसाठी सरकारने चार सदस्यीय समिती स्थापन केली आहे. तसेच, इंडिगोला त्यांच्या वेळापत्रकात असलेल्या विमानांच्या उड्डाणांमध्ये १० टक्के कपात करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

मंत्री नायडू यांनी एअरलाइन्स कंपन्यांना गर्दीच्या वेळी सीट क्षमता वाढवण्याचे, गर्दीच्या मार्गांवर नवीन उड्डाणे सुरू करण्याचे आणि प्रवासी सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचे आदेश दिल्याचेही लोकसभेत सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : No year-long airfare cap possible: Centre clarifies amid Indigo crisis.

Web Summary : The government rejected year-long airfare caps despite Indigo's flight cancellations. Minister Naidu cited market dynamics, stating regulation hinders growth. Intervention remains for unfair practices. Indigo faces scrutiny and flight reductions.
टॅग्स :ParliamentसंसदCentral Governmentकेंद्र सरकारairplaneविमानAirportविमानतळ