शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
4
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
5
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
6
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
7
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
8
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
9
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
10
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
11
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
12
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
13
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
14
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
15
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
16
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
17
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
18
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
19
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
20
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
Daily Top 2Weekly Top 5

राम मंदिरच नाही सोमनाथ मंदिरातही बांधकाम पूर्ण होण्याआधी झाली होती प्राणप्रतिष्ठापना, समोर येतेय अशी माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2024 17:04 IST

Ram Mandir: अयोध्येतील राम मंदिरामध्ये होणाऱ्या रामललांच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याला आता केवळ काही दिवसांचा अवधी उरला आहे. मात्र या सोहळ्याची तारीख जसजशी जवळ येतेय, तसतसे प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याबाबत वादही निर्माण होत आहेत.

अयोध्येतील राम मंदिरामध्ये होणाऱ्या रामललांच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याला आता केवळ काही दिवसांचा अवधी उरला आहे. मात्र या सोहळ्याची तारीख जसजशी जवळ येतेय, तसतसे प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याबाबत वादही निर्माण होत आहेत. त्यातच मंदिराचं बांधकाम अपूर्ण असताना राम मंदिरामध्ये रामललांची प्राणप्रतिष्ठापना होत आहे, असा आरोप करून या मंदिराला विरोध केला जात आहे. काही शंकराचार्यांनी अपूर्ण मंदिरात होणारी प्राण प्रतिष्ठापना ही  विधिविधानाच्या विरोधात असल्याचा आरोप करत या प्राणप्रतिष्ठापनेला विरोध केला आहे. मात्र देशात याआधीही अनेक मंदिरांचं बांधकाम पूर्ण होण्याआधी त्यामध्ये प्राणप्रतिष्ठापना झाली होती, अशी माहिती समोर येत आहे. स्वातंत्र्योत्तर काळात प्राचीन सोमनाथ मंदिराची पुनर्बांधणी झाली होती. त्यावेळी ११ मे १९५१ रोजी देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद  प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यामध्ये सहभागी झाले होते. मात्र त्यावेळी या मंदिराचं बांधकाम पूर्ण झालेलं नव्हतं.

जे.डी. परमार यांनी लिहिलेल्या प्रभास तीर्थ दर्शन: सोमनाथ नावाच्या पुस्तकामध्ये याबाबतचा उल्लेख आढळतो. मे १९५१ मध्ये झालेल्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानंतर अनेक वर्षांपर्यंत सोमनाथ मंदिरामध्ये बांधकाम सुरू होते.  या पुस्तकातील १८ व्या पानावरून हे समजते की, तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते ११ मे १९५१ रोजी सोमनाथ मंदिरातील शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठापना झाली होती.  पुस्तकातील याच पानावर असाही उल्लेख आहे की, प्राण प्रतिष्ठापना सोहळ्यानंतरही श्री सोमनाथ ट्रस्टचे अध्यक्ष महाराजा जामसाहेब दिग्विजय सिंह हे मंदिराच्या निर्मितीमध्ये मार्गदर्शन करत होते. मंदिरातील सभामंडप आणि शिखराचं काम पूर्ण झाल्यानंतर त्यांनी महारुद्रयाग केला आणि १३  मे १९६५ रोजी दुपारी १२.३० वाजता कलश प्रतिष्ठापना करून तिथे मौल्यवान असा कौशेय ध्वज फडकवला होता.  

सोमनाथ मंदिराच्या अधिकृत संकेतस्थळावरही या संदर्भातील महत्त्वपूर्ण माहिती मिळत आहे. संकेतस्थळानुसार नवं सोमनाथ मंदिर अनेक टप्प्यांमध्ये बनवण्यात आलं आहे. नव्या मंदिरामध्ये तीन भाग होते. पहिला शिखर, दुसरा सभामंडप आणि तिसरा नृत्यमंडप. यामधील पहिल्या दोन भागांचं बांधकाम ७ मे १९६५ रोजी पूर्ण झालं. तर पूर्णत: पूनर्निर्मित मंदिराचं १ डिसेंबर १९९५ रोजी तत्कालीन राष्ट्रपती शंकरदयाळ शर्मा यांच्याहस्ते उदघाटन झालं होतं. 

सोमनाथ मंदिरां हिंदू धर्म आणि संस्कृतीमध्ये खास महत्त्व आहे. हे ज्योतिर्लिंग १२ ज्योतिर्लिंगामधील पहिलं ज्योतिर्लिंग मानलं जातं. हे मंदिर अनेक आक्रमणांची शिकार झालं होतं. मात्र प्रत्येकवेळी त्याचं पुनर्निर्माण झालं. देश स्वातंत्र्य झाल्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुढाकारानं या मंदिराचं पुनर्निर्माण झालं होतं.  

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याHinduismहिंदुइझम