शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
2
जिओ-हॉटस्टार सबस्क्रीप्शनमध्ये मोठी वाढ करण्याची शक्यता; ₹१,४९९ प्लॅनची किंमत थेट...
3
India’s Squad For Rising Star T20 Asia Cup: वैभव सूर्यवंशीला संधी; 'या' तारखेला रंगणार भारत-पाक सामना!
4
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
5
चीनने पाकिस्तानसमोर मैत्रीचा हात पुढे केला! भारताविरुद्ध जाण्याचा नवा कट? काय आहे ड्रॅगनची खेळी?
6
जगातील 'या' 9 देशांकडे 12,241 अण्वस्त्रे; रशिया-अमेरिका आघाडीवर, भारताचा कितवा नंबर..?
7
दररोज पाठवायचा अश्लील मेसेज, प्रायव्हेट पार्ट व्हिडिओ; अभिनेत्रीने एकदा भेटायला बोलावले अन्...
8
आता सरकारी कार्यालयात खेटे घालण्याची गरज नाही; घरबसल्या मिळेल जीवन प्रमाणपत्र
9
Sandeep Deshpande : "खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
10
MHADA Lottery: पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! 'म्हाडा'च्या लॉटरीत वाकड-हिंजवडीत फक्त २८ लाखांत घर; ६० लाखांची थेट बचत!
11
त्रिपुरी पौर्णिमा २०२५: त्रिपुरी पौर्णिमेला 'या' राशींवर लक्ष्मीकृपा; व्यापारात लाभ; मालमत्ता खरेदीचे योग
12
रोहित आर्या प्रकरणावर अभिनेता आस्ताद काळेने व्यक्त केला संशय, पोस्ट करत म्हणाला...
13
आता त्यांचे मोजकेच दिवस उरलेत, या देशाच्या राष्ट्रपतींना ट्रम्प यांची उघड धमकी   
14
हवाई प्रवाशांसाठी मोठी बातमी; अतिरिक्त शुल्काशिवाय विमान तिकिटे रद्द करता येणार, कंपन्यांची मनमानी थांबणार!
15
Harmanpreet Kaur: "हरमनप्रीत कौरला कर्णधारपदाच्या ओझ्यातून मुक्त करा", माजी क्रिकेटपटूची मागणी चर्चेत!
16
कारच्या बंद दरवाजात गुदमरले जीव, ५ जणांचा मृत्यू; Tesla कारविरोधात खटला दाखल, काय आहे प्रकरण?
17
Ladki Bahin Yojana: मेसेजची रिंग वाजली? लाडकी बहीण योजनेचे आज पैसे येणार; eKYC न केलेल्या महिलांचे काय?
18
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
19
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
20
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...

राम मंदिरच नाही सोमनाथ मंदिरातही बांधकाम पूर्ण होण्याआधी झाली होती प्राणप्रतिष्ठापना, समोर येतेय अशी माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2024 17:04 IST

Ram Mandir: अयोध्येतील राम मंदिरामध्ये होणाऱ्या रामललांच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याला आता केवळ काही दिवसांचा अवधी उरला आहे. मात्र या सोहळ्याची तारीख जसजशी जवळ येतेय, तसतसे प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याबाबत वादही निर्माण होत आहेत.

अयोध्येतील राम मंदिरामध्ये होणाऱ्या रामललांच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याला आता केवळ काही दिवसांचा अवधी उरला आहे. मात्र या सोहळ्याची तारीख जसजशी जवळ येतेय, तसतसे प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याबाबत वादही निर्माण होत आहेत. त्यातच मंदिराचं बांधकाम अपूर्ण असताना राम मंदिरामध्ये रामललांची प्राणप्रतिष्ठापना होत आहे, असा आरोप करून या मंदिराला विरोध केला जात आहे. काही शंकराचार्यांनी अपूर्ण मंदिरात होणारी प्राण प्रतिष्ठापना ही  विधिविधानाच्या विरोधात असल्याचा आरोप करत या प्राणप्रतिष्ठापनेला विरोध केला आहे. मात्र देशात याआधीही अनेक मंदिरांचं बांधकाम पूर्ण होण्याआधी त्यामध्ये प्राणप्रतिष्ठापना झाली होती, अशी माहिती समोर येत आहे. स्वातंत्र्योत्तर काळात प्राचीन सोमनाथ मंदिराची पुनर्बांधणी झाली होती. त्यावेळी ११ मे १९५१ रोजी देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद  प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यामध्ये सहभागी झाले होते. मात्र त्यावेळी या मंदिराचं बांधकाम पूर्ण झालेलं नव्हतं.

जे.डी. परमार यांनी लिहिलेल्या प्रभास तीर्थ दर्शन: सोमनाथ नावाच्या पुस्तकामध्ये याबाबतचा उल्लेख आढळतो. मे १९५१ मध्ये झालेल्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानंतर अनेक वर्षांपर्यंत सोमनाथ मंदिरामध्ये बांधकाम सुरू होते.  या पुस्तकातील १८ व्या पानावरून हे समजते की, तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते ११ मे १९५१ रोजी सोमनाथ मंदिरातील शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठापना झाली होती.  पुस्तकातील याच पानावर असाही उल्लेख आहे की, प्राण प्रतिष्ठापना सोहळ्यानंतरही श्री सोमनाथ ट्रस्टचे अध्यक्ष महाराजा जामसाहेब दिग्विजय सिंह हे मंदिराच्या निर्मितीमध्ये मार्गदर्शन करत होते. मंदिरातील सभामंडप आणि शिखराचं काम पूर्ण झाल्यानंतर त्यांनी महारुद्रयाग केला आणि १३  मे १९६५ रोजी दुपारी १२.३० वाजता कलश प्रतिष्ठापना करून तिथे मौल्यवान असा कौशेय ध्वज फडकवला होता.  

सोमनाथ मंदिराच्या अधिकृत संकेतस्थळावरही या संदर्भातील महत्त्वपूर्ण माहिती मिळत आहे. संकेतस्थळानुसार नवं सोमनाथ मंदिर अनेक टप्प्यांमध्ये बनवण्यात आलं आहे. नव्या मंदिरामध्ये तीन भाग होते. पहिला शिखर, दुसरा सभामंडप आणि तिसरा नृत्यमंडप. यामधील पहिल्या दोन भागांचं बांधकाम ७ मे १९६५ रोजी पूर्ण झालं. तर पूर्णत: पूनर्निर्मित मंदिराचं १ डिसेंबर १९९५ रोजी तत्कालीन राष्ट्रपती शंकरदयाळ शर्मा यांच्याहस्ते उदघाटन झालं होतं. 

सोमनाथ मंदिरां हिंदू धर्म आणि संस्कृतीमध्ये खास महत्त्व आहे. हे ज्योतिर्लिंग १२ ज्योतिर्लिंगामधील पहिलं ज्योतिर्लिंग मानलं जातं. हे मंदिर अनेक आक्रमणांची शिकार झालं होतं. मात्र प्रत्येकवेळी त्याचं पुनर्निर्माण झालं. देश स्वातंत्र्य झाल्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुढाकारानं या मंदिराचं पुनर्निर्माण झालं होतं.  

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याHinduismहिंदुइझम