शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
6
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
7
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
8
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
9
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
10
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
11
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
12
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
13
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
14
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
15
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
16
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
17
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
18
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
19
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
20
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी

खर्गेच नाही, गांधी कुटुंबियालाच मोदींचा अपमान करण्याची सवय; अमित शाहनी कर्नाटकात राग छेडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2023 21:32 IST

केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी दावणगिरीमध्ये शुक्रवारी काँग्रेसवर जोरदार वार केला.

कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीत आता रंगत येऊ लागली आहे. यामध्ये केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी दावणगिरीमध्ये शुक्रवारी काँग्रेसवर जोरदार वार केला. कर्नाटकात काँग्रेस जेव्हा जेव्हा सत्तेत आली तेव्हा त्यांना गरीबांची चिंता नव्हती, असा आरोप शाह यांनी केला आहे. 

काँग्रेस पक्ष जेव्हा जेव्हा कर्नाटकात सत्तेत आला तेव्हा तेव्हा त्यांनी इथल्या गरिबांची चिंता केली नाही. शेतकऱ्यांची चिंता केली नाही. विकासाची चिंता केली नाही. कर्नाटकच्या सुरक्षेची चिंता केली नाही, अशी टीका शाह यांनी केली. काँग्रेसला फक्त आणि फक्त एटीएम बनून दिल्लीला पैसे पाठवण्याची चिंता होती, भाजपाने सत्तेत आल्यावर दरवेळी कर्नाटकच्या विकासाची आणि सुरक्षेची चिंता केली, असे शाह म्हणाले. 

काँग्रेसने पीएफआय कार्यकर्त्यांना मोकळे सोडले आहे. यामुळे त्यांच्या राजवटीत हत्या आणि बॉम्बस्फोट झाले. पंतप्रधान मोदींनी पीएफआयवर बंदी घातली आणि 95 हून अधिक नेत्यांना तुरुंगात पाठवले. त्यामुळे कर्नाटक सुरक्षित झाले, असे मोदी म्हणाले. 

काँग्रेस पक्षाने नेहमीच शेतकऱ्यांचा अपमान केला. ना शेतमालाला रास्त भाव मिळाला, ना खत मिळाले, ना पाणी मिळाले. आज भाजपाच्या डबल इंजिन सरकारमध्ये थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवण्याचे काम झाले. गरिबांना प्रत्येक सुविधा देण्याचे काम केले, असे शाह म्हणाले.  

टॅग्स :Amit Shahअमित शाहBJPभाजपा