शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

खर्गेच नाही, गांधी कुटुंबियालाच मोदींचा अपमान करण्याची सवय; अमित शाहनी कर्नाटकात राग छेडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2023 21:32 IST

केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी दावणगिरीमध्ये शुक्रवारी काँग्रेसवर जोरदार वार केला.

कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीत आता रंगत येऊ लागली आहे. यामध्ये केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी दावणगिरीमध्ये शुक्रवारी काँग्रेसवर जोरदार वार केला. कर्नाटकात काँग्रेस जेव्हा जेव्हा सत्तेत आली तेव्हा त्यांना गरीबांची चिंता नव्हती, असा आरोप शाह यांनी केला आहे. 

काँग्रेस पक्ष जेव्हा जेव्हा कर्नाटकात सत्तेत आला तेव्हा तेव्हा त्यांनी इथल्या गरिबांची चिंता केली नाही. शेतकऱ्यांची चिंता केली नाही. विकासाची चिंता केली नाही. कर्नाटकच्या सुरक्षेची चिंता केली नाही, अशी टीका शाह यांनी केली. काँग्रेसला फक्त आणि फक्त एटीएम बनून दिल्लीला पैसे पाठवण्याची चिंता होती, भाजपाने सत्तेत आल्यावर दरवेळी कर्नाटकच्या विकासाची आणि सुरक्षेची चिंता केली, असे शाह म्हणाले. 

काँग्रेसने पीएफआय कार्यकर्त्यांना मोकळे सोडले आहे. यामुळे त्यांच्या राजवटीत हत्या आणि बॉम्बस्फोट झाले. पंतप्रधान मोदींनी पीएफआयवर बंदी घातली आणि 95 हून अधिक नेत्यांना तुरुंगात पाठवले. त्यामुळे कर्नाटक सुरक्षित झाले, असे मोदी म्हणाले. 

काँग्रेस पक्षाने नेहमीच शेतकऱ्यांचा अपमान केला. ना शेतमालाला रास्त भाव मिळाला, ना खत मिळाले, ना पाणी मिळाले. आज भाजपाच्या डबल इंजिन सरकारमध्ये थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवण्याचे काम झाले. गरिबांना प्रत्येक सुविधा देण्याचे काम केले, असे शाह म्हणाले.  

टॅग्स :Amit Shahअमित शाहBJPभाजपा