शहरं
Join us  
Trending Stories
1
‘स्वर्गाचा दरवाजा उघडलाय!, त्यांना मरण येऊ दे’ नाताळादिवशी झेलेन्स्कींनी केली पुतीन यांच्या मृत्यूची कामना  
2
प्रकाश महाजन शिंदेसेनेत प्रवेश करणार, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश
3
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
4
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू तरुणाची हत्या, भरबाजारात मारहाण करून घेतला जीव
5
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
6
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
7
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
8
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
9
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
10
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
11
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
12
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
13
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
14
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीरच नव्हे भारतातील "या" राज्यांमध्ये पाकिस्तान जिंकल्यानंतर फुटले फटाके

By admin | Updated: June 22, 2017 09:04 IST

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पाकिस्तानने भारतावर मिळवलेल्या विजयाचा आनंदोत्सव फक्त काश्मीरमध्येच साजरा करण्यात आला नसून...

 ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. 22 - चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पाकिस्तानने भारतावर मिळवलेल्या विजयाचा आनंदोत्सव फक्त काश्मीरमध्येच साजरा करण्यात आला नसून, देशाच्या अन्य काही भागातही असे प्रकार घडले आहेत. राजस्थानमध्ये पाकिस्तानचा विजय साजरा करणा-या पाच जणांवर देशद्रोहाचा आरोप ठेवण्यात आला आहे. तीन राज्यांमध्ये पाकिस्तान जिंकल्याचा आनंद साजरा करण्यात आल्याच्या घटना घडल्या असून, तीन अल्पवयीन मुलांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 
 
मध्यप्रदेशात पाकिस्तान जिंकल्याच्या आनंदात फटाके फोडून घोषणाबाजी करणा-या 15 जणांना अटक केली आहे. देशद्रोहाच्या आरोपाचा गुन्हा सिद्ध झाला तर, दोषीला आयुष्यभरासाठी तुरुंगवास होऊ शकतो. राजस्थान बिकानेरमधून अटक केलेल्या पाच जणांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. रविवारी फायनलमध्ये पाकिस्तानने विजय मिळवल्यानंतर सुभाषपूरा येथील मुस्लीम युवक ड्रम वाजवून पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देत होते. स्थानिक रहिवाशांनी याची तक्रार केल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. 
 
या पाचही जणांना न्यायालयीने कोठडी सुनावण्यात आली आहे. हिंदू जागरण मंच आणि अन्य संघटनांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना पत्र दिले असून त्यांनी कठोरात कठोर कारवाईची मागणी केली आहे. भारतीय संघाच्या पराभवाने काश्मीरमधील फुटिरतावाद्यांना आपल्या भारतद्वेशाला मोकळी वाट करून देण्याची संधी मिळाली. चॅम्पियन्स ट्रॉफीत पाकिस्तानचा विजय झाल्यावर फुटिरतावाद्यांनी फटाके फोडून जल्लोश केला. ते एवढ्यावरच थांबले नाहीत., त्यांनी भारतविरोधी घोषणाही दिल्या. 
 
आणखी वाचा 
 
श्रीनगरमध्ये तरुणांनी फटाके फोडून पाकिस्तानचे झेंडे फडकवून आनंद साजरा केला. भारतविरोधी घोषणाबाजीही केली. श्रीनगरमधील फतेहकदाल, साकीदफर आणि अनंतनाग येथे पोलिस आणि लष्कराच्या तळांवर फटाके फेकणाऱ्या तरुणांना रोखण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. त्रालमध्ये सुद्धा पाकिस्तानच्या विजयानंतर महिला आणि पुरुषांनी रस्त्यावर उतरून पाकिस्तानच्या विजयाचा जल्लोश साजरा केला. 
 
दरम्यान केंद्रातल्या मोदी सरकारवर देशद्रोहाच्या कायद्याचा गैरवापर केल्याचा आरोप झाला आहे. एखाद्या मुद्यावर मतभेद असले तर ते समजून न घेता केंद्रातील भाजपा सरकार देशद्रोहाच्या कायद्याचा गैरवापर करते असा आरोप  विरोधकांनी केला होता.