शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
2
संजय राऊतांना PM मोंदीचे नेतृत्व, क्षमतेवर शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही?”
3
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
4
"हा, आम्ही दहशतवादी पोसले पण आता..."; संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनेही दिली कबुली
5
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
6
"आता आर-पार करण्याची वेळ आलीय...", जावेद अख्तर यांनी पहलगाम हल्ल्यावरून पाकिस्तानला फटकारलं
7
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
8
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
9
Delhi Rains : पावसाचे थैमान! दिल्ली-NCR मध्ये रस्ते पाण्याखाली, १०० फ्लाइट्स लेट; ४ जणांनी गमावला जीव
10
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला केले जाते पितृतर्पण; कसे आणि का? सविस्तर जाणून घ्या!
11
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
12
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
13
Adani Enterprises Q4 Results: जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
14
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
15
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
16
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
17
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
18
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
19
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
20
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक

काश्मीरच नव्हे भारतातील "या" राज्यांमध्ये पाकिस्तान जिंकल्यानंतर फुटले फटाके

By admin | Updated: June 22, 2017 09:04 IST

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पाकिस्तानने भारतावर मिळवलेल्या विजयाचा आनंदोत्सव फक्त काश्मीरमध्येच साजरा करण्यात आला नसून...

 ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. 22 - चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पाकिस्तानने भारतावर मिळवलेल्या विजयाचा आनंदोत्सव फक्त काश्मीरमध्येच साजरा करण्यात आला नसून, देशाच्या अन्य काही भागातही असे प्रकार घडले आहेत. राजस्थानमध्ये पाकिस्तानचा विजय साजरा करणा-या पाच जणांवर देशद्रोहाचा आरोप ठेवण्यात आला आहे. तीन राज्यांमध्ये पाकिस्तान जिंकल्याचा आनंद साजरा करण्यात आल्याच्या घटना घडल्या असून, तीन अल्पवयीन मुलांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 
 
मध्यप्रदेशात पाकिस्तान जिंकल्याच्या आनंदात फटाके फोडून घोषणाबाजी करणा-या 15 जणांना अटक केली आहे. देशद्रोहाच्या आरोपाचा गुन्हा सिद्ध झाला तर, दोषीला आयुष्यभरासाठी तुरुंगवास होऊ शकतो. राजस्थान बिकानेरमधून अटक केलेल्या पाच जणांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. रविवारी फायनलमध्ये पाकिस्तानने विजय मिळवल्यानंतर सुभाषपूरा येथील मुस्लीम युवक ड्रम वाजवून पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देत होते. स्थानिक रहिवाशांनी याची तक्रार केल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. 
 
या पाचही जणांना न्यायालयीने कोठडी सुनावण्यात आली आहे. हिंदू जागरण मंच आणि अन्य संघटनांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना पत्र दिले असून त्यांनी कठोरात कठोर कारवाईची मागणी केली आहे. भारतीय संघाच्या पराभवाने काश्मीरमधील फुटिरतावाद्यांना आपल्या भारतद्वेशाला मोकळी वाट करून देण्याची संधी मिळाली. चॅम्पियन्स ट्रॉफीत पाकिस्तानचा विजय झाल्यावर फुटिरतावाद्यांनी फटाके फोडून जल्लोश केला. ते एवढ्यावरच थांबले नाहीत., त्यांनी भारतविरोधी घोषणाही दिल्या. 
 
आणखी वाचा 
 
श्रीनगरमध्ये तरुणांनी फटाके फोडून पाकिस्तानचे झेंडे फडकवून आनंद साजरा केला. भारतविरोधी घोषणाबाजीही केली. श्रीनगरमधील फतेहकदाल, साकीदफर आणि अनंतनाग येथे पोलिस आणि लष्कराच्या तळांवर फटाके फेकणाऱ्या तरुणांना रोखण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. त्रालमध्ये सुद्धा पाकिस्तानच्या विजयानंतर महिला आणि पुरुषांनी रस्त्यावर उतरून पाकिस्तानच्या विजयाचा जल्लोश साजरा केला. 
 
दरम्यान केंद्रातल्या मोदी सरकारवर देशद्रोहाच्या कायद्याचा गैरवापर केल्याचा आरोप झाला आहे. एखाद्या मुद्यावर मतभेद असले तर ते समजून न घेता केंद्रातील भाजपा सरकार देशद्रोहाच्या कायद्याचा गैरवापर करते असा आरोप  विरोधकांनी केला होता.