शहरं
Join us  
Trending Stories
1
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
4
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
5
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
6
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
7
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
8
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
9
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
10
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
11
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
12
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
13
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
14
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
15
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
16
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
17
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
18
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
19
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
20
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!

केवळ पुस्तकी ज्ञान नको, शिक्षण क्षेत्रात भारताला मोठा पल्ला गाठायचा आहे: बिल गेट्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 13:50 IST

मायक्रोसॉफ्टचे माजी सीईओ आणि भारतातील आरोग्य क्षेत्रांसाठी मोठ्या प्रमाणात देणग्या देणारे समाजसेवक बिल गेट्स यांनी भारतातील विद्यमान शिक्षण पद्धतीबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली आहे.

मुंबई : मायक्रोसॉफ्टचे माजी सीईओ आणि भारतातील आरोग्य क्षेत्रांसाठी मोठ्या प्रमाणात देणग्या देणारे समाजसेवक बिल गेट्स यांनी भारतातील विद्यमान शिक्षण पद्धतीबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली आहे.भारतातील शिक्षण क्षेत्रावर सावध टीका करताना बिल गेट्स म्हणाले, भारताविषयीचे माझे मत तसे सकारात्मक असले तरी येथील शिक्षण व्यवस्थेबाबत मात्र मी फार निराश आहे. ही शिक्षण व्यवस्था अधिक चांगली असायला पाहिजे. मला त्यावर टीका करायची नाही. परंतु मला त्याबाबत ब-याच चांगल्या अपेक्षा आहेत.’तथापि शिक्षण क्षेत्रात सुधारणा घडवून आणण्याच्या संदर्भात आपल्या तूर्तास कोणत्याही योजना नाहीत, असे गेट्स यांनी स्पष्ट केले. आरोग्य क्षेत्राकडून शिक्षण क्षेत्रात सुधारणा करण्याकडे वळणार काय, असा प्रश्न विचारला असता त्यांनी कोणतेही स्पष्ट उत्तर दिले नाही. ‘आपण सर्वच काही करू शकत नाही. भारतातील बहुतांश समाजसेवकांनी शिक्षण क्षेत्र निवडले आहे आणि त्याचा मला आनंद आहे,’ असे ते म्हणाले.केवळ पुस्तकी ज्ञान बाळगण्याची प्रवृत्ती चांगली नाही, असे सांगून ते म्हणाले, ‘मागील दोन दशकात भारताने मोठी भरारी घेतली आहे. विकासाचे चांगले संकेत मिळत आहेत. परंतु या उपलब्धीचा योग्य फायदा करण्याची आणि आपल्या मानव विकास निर्देशांकाचा परिपूर्ण वापर करण्याची गरज आहे. हे सर्व काही केवळ दर्जेदार शिक्षणामुळे घडेल आणि भारताच्या विकासाचा चढता आलेख कायम राखण्यासाठी हे फार महत्त्वाचे आहे.’बालकांना त्यांच्या लहान वयात केवळ चांगले आरोग्य आणि पोषणहार देणेच गरजेचे नाही तर त्यांना चांगले शिक्षणदेखील दिले गेले पाहिजे. शिक्षणामुळे मोठे झाल्यावर त्यांची कमावण्याची क्षमताही वाढेल. या संदर्भात बरेच काही करण्याची गरज आहे. परंतु या क्षेत्रात भारताला अद्याप मोठा पल्ला गाठावयाचा आहे, असे बिल गेट्स म्हणाले.

टॅग्स :Bill Gatesबिल गेटसeducationशैक्षणिकIndiaभारत