शहरं
Join us  
Trending Stories
1
बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
2
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
3
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
4
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
5
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
6
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
7
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
8
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!
9
पहलगाम हल्ल्यातील मास्टरमाईंडचा खात्मा, एन्काऊंटरचे फोटो समोर, मिळाली धक्कादायक माहिती
10
सेल्फी अन् रीलचा नाद लय बेक्कार! काही सेकंदांचं वेड करतंय जीवाशी खेळ; फुकट जातोय वेळ...
11
नवीन कर प्रणालीतही टॅक्स वाचवता येतो! NPS, EPF पासून ते 'या' खास पर्यायांपर्यंत, बचत करण्याचे ७ प्रभावी मार्ग!
12
ऐकावं ते नवलच! नाव डॉग बाबू, वडील कुत्ता बाबू अन् आई कुटिया देवी; कुत्र्यासाठी बनवले रहिवासी प्रमाणपत्र
13
गुंतवणुकीसाठी बेस्ट आहे 'ही' सरकारी स्कीम; एकदा गुंतवणूक करा आणि दरवर्षी मिळवा २ लाखांचं फिक्स व्याज
14
दक्षिण कोरियाने मैत्रीचा हात पुढे केला, किम जोंग यांची बहिण म्हणाली, "कोणताही रस नाही..."
15
दहशतवादी पहलगाममध्ये घुसलेच कसे? PoK का घेतले नाही? काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल
16
ऑपरेशन सिंदूरदरम्यान नेमकं काय घडलं, किती दहशतवादी मारले गेले? राजनाथ सिंह यांनी लोकसभेत दिली माहिती, म्हणाले...
17
VIDEO: जाडेजा-स्टोक्समध्ये हात मिळवण्यावरून राडा, सामना संपल्यावर 'शेक-हँड' नाकारलं?
18
Operation Mahadev: सैन्याला मोठे यश! पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी मुसा मारला गेल्याची शक्यता, तीन दहशतवादी ठार
19
‘डान्सबारमध्ये नाचणाऱ्या मुली लाडक्या बहिणी नाहीत का? मुली नाचवणाऱ्यांना वाचवणे कोणत्या हिंदुत्वात बसते?’, काँग्रेसचा सवाल   
20
Thailand Shooting: थायलंडमध्ये भर बाजारात बेछूट गोळीबार, सहा जणांचा मृत्यू, हल्लेखोराने स्वत:वरही झाडली गोळी  

नव-याला पाणी न विचारणं क्रूरता आहे का ? उच्च न्यायालय म्हणतं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2018 09:17 IST

नव-याच्या गरजा पूर्ण न करणे किंवा कामावरून घरी परतल्यावर नव-याला पाणी देण्याबाबत विचारणा न करणे यामध्ये...

मुंबई: नव-याच्या गरजा पूर्ण न करणे किंवा कामावरून घरी परतल्यावर नव-याला पाणी देण्याबाबत विचारणा न करणे यामध्ये कोणतीही क्रूरता नाही असं मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. मुंबईच्या सांताक्रूज येथील 52 वर्षांच्या एका बॅंक कर्मचा-याने केलेल्या घटस्फोट याचिकेवर सुनावणी करताना कोर्टाने हे स्पष्ट केलं. क्रूरतेच्या आधारे या व्यक्तीने आपल्या 40 वर्षीय पत्नीपासून घटस्फोटाची मागणी केली होती. माझी पत्नी माझ्या गरजा पूर्ण करत नाही, मी रात्री कामावरून परतल्यावर ती मला साधं पाणीही विचारत नाही असं त्याने याचिकेत म्हटलं होतं. न्या. कमल किशोर आणि सारंग कोटवाल यांच्या खंडपिठासमोर याबाबत सुनावणी झाली. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, यावेळी खंडपिठाने याचिकाकर्त्याची पत्नी स्वतः देखील शिक्षिका असण्याकडे लक्ष वेधलं. दिवसभर काम करून पत्नी देखील थकलेली असते. तरी देखील ती कुटुंबियांसाठी जेवण बनवते तसंच घरातील इतर कामंही करते असं कोर्टाने म्हटलं. या दांपत्याचं 2005 मध्ये लग्न झालं असून पत्नी उशीरा घरी येते आणि आई-वडिलांसोबत भाडणं करते असाही दावा पतीने केला होता.  

टॅग्स :Mumbai High Courtमुंबई हायकोर्ट