शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

महाआघाडीवरून शरद पवार यांचा राहुल गांधींना सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 07:01 IST

राहुल गांधी यांनी पवारांची चारवेळा भेट घेतली.

- हरीश गुप्ता 

नवी दिल्ली : राष्ट्रीय पातळीवर २२ विरोधी पक्षांची महाआघाडी नसेल, हे आता स्पष्ट होत चालले आहे. विरोधी पक्षांतील ज्येष्ठ नेत्यांच्या राज्यांत ना संयुक्त सभा होतील ना ते एकत्रितपणे प्रचार करतील हेही स्पष्ट झाले आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी विरोधकांच्या संयुक्त सभा टाळणे हे योग्य ठरेल, असे सुचवले आहे. विरोधी पक्षांनी राज्यांत व मतदारसंघांत आपापल्या उमेदवारांचा विजय निश्चित होण्यावर लक्ष केंद्रित करावे. संयुक्त सभा राज्य पातळीवर गरज असेल तरच घेतल्या जाव्यात, असे पवार म्हणाले.

राहुल गांधी यांनी पवारांची चारवेळा भेट घेतली. नुकत्याच एका भेटीत पवारांना महाआघाडीऐवजी फक्त राज्यांतच आघाड्या कराव्यात, असे जाणवले. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने युती करण्याचे तत्वत: ठरवले आहे. तसेच इतर राज्यांतही आघाड्या करण्याची हीच वेळ आहे. काँग्रेसने तमिळनाडू, बिहार, झारखंड, आंध्र, काश्मीरमध्ये तत्वत: आघाडी केली आहे. परंतु, उत्तर प्रदेशात सपा-बसपाशी आघाडी झालेली नाही.

काँग्रेसला पश्चिम बंगालमध्ये स्वबळावर लढावे की ममता बॅनर्जी यांच्यासोबत जावे की माकपसोबत हा तिढा सोडवायचा आहे. गुजरात तसेच कर्नाटकातील प्रश्नही त्याच्यासमोर आहे. कर्नाटकात तर काँग्रेसने जनता दलासोबत (धर्मनिरपेक्ष) सरकारही स्थापन केले आहे. याशिवाय हा पक्ष दिल्ली, पंजाब आदी राज्यांत आम आदमी पक्षासोबत आघाडी, जागावाटप आदी प्रश्नांना तोंड देत आहे. या पार्श्वभूमीवर पवारांनी राष्ट्रव्यापी संयुक्त सभा नकोत व अशा संयुक्त प्रचार फक्त राज्यांतच मर्यादित ठेवाव्यात, असे सुचवले आहे. शरद पवार यावर भाष्य करण्यास लगेच उपलब्ध झाले नाहीत. पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी ही लाभ घेण्याची वेळ असून त्या दिशेने चर्चा झालेली आहे, असे सांगितले. मात्र तपशील देण्यास त्यांनी नकार दिला.पवारांनी काय दिला सल्ला?ही लोकसभा निवडणूक ‘मोदी विरुद्ध इतर सगळे’ अशी बनवणे भाजपाला आवडेल तसेच विरोधकांपेक्षा आपण किती श्रेष्ठ आहोत अशी स्वत:ची प्रतिमा भाजपा रंगवेल हे शरद पवार यांनी राहुल गांधी यांना सांगितले आहे. मोदी यांना पदावरून दूर करण्यासाठी नुकतेच २२ विरोधी पक्ष नेते एकत्र आले होते. पण तो प्रयोग सध्या टाळावा. दोन पोटनिवडणुका आणि पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांत भाजपचा दुबळेपणाच सिद्ध झाला आहे, असे पवार यांचे मत आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीSharad Pawarशरद पवार