शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'च नव्हे, भारताने आधीही पाकिस्तानविरुद्ध केलेल्या 'या' मोठ्या कारवाया!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 10:52 IST

भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानला धडा शिकवला आहे. भारतीय वायुसेनेने 'ऑपरेशन सिंदूर' आखून दहशतवाद्यांची तळं उद्ध्वस्त केली आहेत. या आधीही भारताने पाक विरोधात अशी मोठी ऑपरेशन्स केली होती.

भारत देशाने पुन्हा एकदा शत्रूच्या गोटात शिरून बदला घेतला आहे. भारतीय सैन्याने 'ऑपरेशन सिंदूर' करून पाकिस्तानातील दहशतवाद्यांची तळं उद्ध्वस्त केली आहेत. ७ मे २०२५च्या रात्री पार पडलेल्या 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताने पाकव्याप्त काश्मीरमधील मुरीदके, कोटली, मुजफ्फरबाद आणि बहावलपूर येथील दहशतवाद्यांच्या तळांवर हल्लाबोल केला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारताने लष्कर-ए-तोयबा आणि टीआरएफच्या ९ ठिकाणांवर हल्ला करत, ही तळं उद्ध्वस्त केली आहेत. या कारवाई दरम्यान, पाकिस्तानी नागरिक, सैन्य किंवा इतर कोणत्याही सामान्य ठिकाणांना निशाणा बनवण्यात आले नसल्याचे, सरकारने स्पष्ट केले आहे. 

'ऑपरेशन सिंदूर' करत भारताने पाकिस्तानला मोठा धडा शिकवला आहे. मात्र, भारताने पाकिस्तानला अशाप्रकारे धडा शिकवण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी अशा मोठ्या कारवाया पार पडल्या आहेत. चला त्याबद्दल जाणून घेऊया... 

ऑपरेशन मेघदूत१३ एप्रिल १९८४ला भारतीय वायुसेनेने 'ऑपरेशन मेघदूत'ची सुरुवात केली होती. जगातील सर्वात कठीण क्षेत्रांपैकी एक असलेल्या सियाचीन ग्लेशियरवर नियंत्रण स्थापित करणे होता, हा या ऑपरेशनचा उद्देश होता.

ऑपरेशन विजय कारगिल प्रदेश शत्रूच्या तावडीतून सोडवण्यासाठी भारतीय सैन्याने २६ मे १९९९मध्ये 'ऑपरेशन विजय' आखलं होतं. त्यावेळी भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांत तब्बल २ महिने युद्ध सुरू होतं.१४ जुलै १९९९ रोजी भारताने हे युद्ध जिंकून 'ऑपरेशन विजय' यशस्वी करून कारगिलवर तिरंगा फडकावला. 

ऑपरेशन पराक्रम २००१ मध्ये संसदेवर दहशतवादी हल्ल्या झाला होता. यानंतर भारतीय लष्कराने डिसेंबरमध्ये 'ऑपरेशन पराक्रम' सुरू केले. यावेळी दोन्ही देशांमध्ये युद्ध झाले नसले, तरी भारत-पाकिस्तान सीमेवर हजारो सैनिक तैनात होते.

बालाकोट एअर स्ट्राईक१४ फेब्रुवारी २०१९ रोजी झालेल्या पुलवामा हल्ल्यानंतर प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने बालाकोट एअर स्ट्राईक केला होता. या ऑपरेशनमध्ये भारताने बालाकोटमध्ये शिरून हवाई हल्ला केला होता. 

सर्जिकल स्ट्राईककाश्मीरमधील उरी येथील लष्करी छावणीवर २८ सप्टेंबर २०१६ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी सर्जिकल स्ट्राईक करण्यात आला होता. पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळं नष्ट करणे, हा या कारवाईचा उद्देश होता. 

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानsurgical strikeसर्जिकल स्ट्राइकPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्ला