शहरं
Join us  
Trending Stories
1
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
2
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
3
शिवसेना-मनसेची ताकद मुंबईत जास्त; राज ठाकरेंच्या दाव्यावर CM फडणवीसांनी आकेडवारीच दिली
4
थरकाप उडवणारा व्हिडीओ! मृत्यूने घातली झडप, बापाने लेकीसमोर जागेवरच सोडला जीव; दिल्लीतील घटना
5
अर्जुन तेंडुलकसंदर्भात हवाई सुंदरीला झालेला गैरसमज! क्रिकेटच्या देवानं आधी गंमत केली; मग...
6
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
7
Viral: माकड दादाने घेतली ‘डॉगेश भाऊं’ची मुलाखत, धम्माल VIDEO पाहून तुम्हीही पोट धरून हसाल
8
एकत्र जीवन संपवूया असं सांगून अल्पवयीन प्रेयसीला विष पाजून मारले, मग झाला फरार
9
स्वातंत्र्य दिनाच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status ला शेअर करा आणि द्या देशभक्तीच्या शुभेच्छा!
10
ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून आली...! अ‍ॅप्पल, टेस्लानंतर या कंपनीची भारतात एन्ट्री, बिग टेकने घोषणा केली...
11
₹७५ वरून ₹५०० च्या पार ट्रेड करतोय हा शेअर, अचानक गुंतवणुकदारांचं स्वारस्य वाढलं, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
12
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
13
राहुल गांधींवर खोटी साक्ष दिल्याचा आरोप, सावरकरांच्या पणतूने  कोर्टात दिलेल्या अर्जाने अडचणी वाढणार? 
14
जगातील सगळ्यात लहान ५ मोबाइल फोन; अगदी माचिसच्या डबीतही लपवून ठेवू शकता!
15
गोकुळाष्टमीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status ला शेअर करा;कृष्ण भक्तांना द्या हार्दिक शुभेच्छा!
16
सचिन तेंडुलकरहून ५ वर्षांनी मोठी अंजली; आता अर्जुनची होणारी पत्नीही मोठीच...किती आहे अंतर?
17
बाजारात संमिश्र कल! विप्रो-इन्फोसिस वधारले; पण, टाटासह 'या' स्टॉक्समध्ये मोठी घसरण
18
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
19
Rapido देणार Zomato, Swiggy ला टक्कर, पोहोचवणार जेवण; काय आहे कंपनीचा प्लान?
20
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लान सांगितला

Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'च नव्हे, भारताने आधीही पाकिस्तानविरुद्ध केलेल्या 'या' मोठ्या कारवाया!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 10:52 IST

भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानला धडा शिकवला आहे. भारतीय वायुसेनेने 'ऑपरेशन सिंदूर' आखून दहशतवाद्यांची तळं उद्ध्वस्त केली आहेत. या आधीही भारताने पाक विरोधात अशी मोठी ऑपरेशन्स केली होती.

भारत देशाने पुन्हा एकदा शत्रूच्या गोटात शिरून बदला घेतला आहे. भारतीय सैन्याने 'ऑपरेशन सिंदूर' करून पाकिस्तानातील दहशतवाद्यांची तळं उद्ध्वस्त केली आहेत. ७ मे २०२५च्या रात्री पार पडलेल्या 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताने पाकव्याप्त काश्मीरमधील मुरीदके, कोटली, मुजफ्फरबाद आणि बहावलपूर येथील दहशतवाद्यांच्या तळांवर हल्लाबोल केला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारताने लष्कर-ए-तोयबा आणि टीआरएफच्या ९ ठिकाणांवर हल्ला करत, ही तळं उद्ध्वस्त केली आहेत. या कारवाई दरम्यान, पाकिस्तानी नागरिक, सैन्य किंवा इतर कोणत्याही सामान्य ठिकाणांना निशाणा बनवण्यात आले नसल्याचे, सरकारने स्पष्ट केले आहे. 

'ऑपरेशन सिंदूर' करत भारताने पाकिस्तानला मोठा धडा शिकवला आहे. मात्र, भारताने पाकिस्तानला अशाप्रकारे धडा शिकवण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी अशा मोठ्या कारवाया पार पडल्या आहेत. चला त्याबद्दल जाणून घेऊया... 

ऑपरेशन मेघदूत१३ एप्रिल १९८४ला भारतीय वायुसेनेने 'ऑपरेशन मेघदूत'ची सुरुवात केली होती. जगातील सर्वात कठीण क्षेत्रांपैकी एक असलेल्या सियाचीन ग्लेशियरवर नियंत्रण स्थापित करणे होता, हा या ऑपरेशनचा उद्देश होता.

ऑपरेशन विजय कारगिल प्रदेश शत्रूच्या तावडीतून सोडवण्यासाठी भारतीय सैन्याने २६ मे १९९९मध्ये 'ऑपरेशन विजय' आखलं होतं. त्यावेळी भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांत तब्बल २ महिने युद्ध सुरू होतं.१४ जुलै १९९९ रोजी भारताने हे युद्ध जिंकून 'ऑपरेशन विजय' यशस्वी करून कारगिलवर तिरंगा फडकावला. 

ऑपरेशन पराक्रम २००१ मध्ये संसदेवर दहशतवादी हल्ल्या झाला होता. यानंतर भारतीय लष्कराने डिसेंबरमध्ये 'ऑपरेशन पराक्रम' सुरू केले. यावेळी दोन्ही देशांमध्ये युद्ध झाले नसले, तरी भारत-पाकिस्तान सीमेवर हजारो सैनिक तैनात होते.

बालाकोट एअर स्ट्राईक१४ फेब्रुवारी २०१९ रोजी झालेल्या पुलवामा हल्ल्यानंतर प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने बालाकोट एअर स्ट्राईक केला होता. या ऑपरेशनमध्ये भारताने बालाकोटमध्ये शिरून हवाई हल्ला केला होता. 

सर्जिकल स्ट्राईककाश्मीरमधील उरी येथील लष्करी छावणीवर २८ सप्टेंबर २०१६ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी सर्जिकल स्ट्राईक करण्यात आला होता. पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळं नष्ट करणे, हा या कारवाईचा उद्देश होता. 

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानsurgical strikeसर्जिकल स्ट्राइकPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्ला