शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
2
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
3
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'त्या' मरकजला केले जमीनदोस्त
4
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
5
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
6
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
7
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूरचं जे लक्ष्य होतं ते साध्य केलं - राजनाथ सिंह
8
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
9
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
10
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
11
Operation Sindoor : "आता पाकिस्तानला वेदनांची जाणीव झाली असेल, ऑपरेशन सिंदूरचा संपूर्ण देशाला अभिमान"
12
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?
13
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण! पंजाबच्या CM मरियम नवाज यांनी आणीबाणी जाहीर केली
14
'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमा बनवा! नेटकऱ्यांची बॉलिवूडकडे मागणी, सुचवलं 'या' अभिनेत्याचं नाव
15
पोलिसाच्या वर्दीत पाहून लेकाची काय होती प्रतिक्रिया? अंकुश चौधरी म्हणाला, "त्याने भलतीच मागणी..."
16
Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर बांगलादेशच्या मनात भिती; खेळाडूंच्या सुरक्षेबाबत उपस्थित केले प्रश्न
17
वर्धा: विवाहित महिला आणि पुरुषाचे प्रेमसंबंध, शेतातील विहिरीत सापडले दोघांचे मृतदेह
18
'या' व्यक्तीच्या पगारापुढे मस्क-जेफ बेझोस यांचा पगार काहीच नाही; कमाईच्या बाबतीत सर्वांना टाकलं मागे
19
"किती नुकसान झालं, किती दहशतवादी मारले गेले हे समजलं असतं तर…’’, काँग्रेस खासदार इम्रान मसूद यांचं मोठं विधान
20
हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानला आणखी एक दणका; भारतीय सैन्याने नीलम-झेलम धरण उडवले

Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'च नव्हे, भारताने आधीही पाकिस्तानविरुद्ध केलेल्या 'या' मोठ्या कारवाया!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 10:52 IST

भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानला धडा शिकवला आहे. भारतीय वायुसेनेने 'ऑपरेशन सिंदूर' आखून दहशतवाद्यांची तळं उद्ध्वस्त केली आहेत. या आधीही भारताने पाक विरोधात अशी मोठी ऑपरेशन्स केली होती.

भारत देशाने पुन्हा एकदा शत्रूच्या गोटात शिरून बदला घेतला आहे. भारतीय सैन्याने 'ऑपरेशन सिंदूर' करून पाकिस्तानातील दहशतवाद्यांची तळं उद्ध्वस्त केली आहेत. ७ मे २०२५च्या रात्री पार पडलेल्या 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताने पाकव्याप्त काश्मीरमधील मुरीदके, कोटली, मुजफ्फरबाद आणि बहावलपूर येथील दहशतवाद्यांच्या तळांवर हल्लाबोल केला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारताने लष्कर-ए-तोयबा आणि टीआरएफच्या ९ ठिकाणांवर हल्ला करत, ही तळं उद्ध्वस्त केली आहेत. या कारवाई दरम्यान, पाकिस्तानी नागरिक, सैन्य किंवा इतर कोणत्याही सामान्य ठिकाणांना निशाणा बनवण्यात आले नसल्याचे, सरकारने स्पष्ट केले आहे. 

'ऑपरेशन सिंदूर' करत भारताने पाकिस्तानला मोठा धडा शिकवला आहे. मात्र, भारताने पाकिस्तानला अशाप्रकारे धडा शिकवण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी अशा मोठ्या कारवाया पार पडल्या आहेत. चला त्याबद्दल जाणून घेऊया... 

ऑपरेशन मेघदूत१३ एप्रिल १९८४ला भारतीय वायुसेनेने 'ऑपरेशन मेघदूत'ची सुरुवात केली होती. जगातील सर्वात कठीण क्षेत्रांपैकी एक असलेल्या सियाचीन ग्लेशियरवर नियंत्रण स्थापित करणे होता, हा या ऑपरेशनचा उद्देश होता.

ऑपरेशन विजय कारगिल प्रदेश शत्रूच्या तावडीतून सोडवण्यासाठी भारतीय सैन्याने २६ मे १९९९मध्ये 'ऑपरेशन विजय' आखलं होतं. त्यावेळी भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांत तब्बल २ महिने युद्ध सुरू होतं.१४ जुलै १९९९ रोजी भारताने हे युद्ध जिंकून 'ऑपरेशन विजय' यशस्वी करून कारगिलवर तिरंगा फडकावला. 

ऑपरेशन पराक्रम २००१ मध्ये संसदेवर दहशतवादी हल्ल्या झाला होता. यानंतर भारतीय लष्कराने डिसेंबरमध्ये 'ऑपरेशन पराक्रम' सुरू केले. यावेळी दोन्ही देशांमध्ये युद्ध झाले नसले, तरी भारत-पाकिस्तान सीमेवर हजारो सैनिक तैनात होते.

बालाकोट एअर स्ट्राईक१४ फेब्रुवारी २०१९ रोजी झालेल्या पुलवामा हल्ल्यानंतर प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने बालाकोट एअर स्ट्राईक केला होता. या ऑपरेशनमध्ये भारताने बालाकोटमध्ये शिरून हवाई हल्ला केला होता. 

सर्जिकल स्ट्राईककाश्मीरमधील उरी येथील लष्करी छावणीवर २८ सप्टेंबर २०१६ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी सर्जिकल स्ट्राईक करण्यात आला होता. पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळं नष्ट करणे, हा या कारवाईचा उद्देश होता. 

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानsurgical strikeसर्जिकल स्ट्राइकPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्ला