शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कोरोनाने नाही, लॉकडाऊनच्या बेरोजगारीने उपाशी मरण्याची आली वेळ; ६ जणांचे कुटुंब रुग्णालयात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2021 06:22 IST

दोन महिन्यांपासून फरपट : लोकांच्या मदतीवर काढले दिवस. गेल्या दहा दिवसांपासून या कुटुंबाला काहीच खायला मिळाले नाही.

अलीगढ (उत्तर प्रदेश) : कोरोना महामारीचा फार मोठा तडाखा रोजंदारी मजूर लोकांना बसला. उद्योग, व्यवसाय बंद असल्यामुळे अनेक कुटुंबांची उपासमार झाली. सरकारने केलेल्या मदती मर्यादा आहेत. अलीगढ येथील महिला (४२) आणि तिची पाच मुले दोन महिन्यांपासून उपाशी असल्यामुळे त्यांना मलखान सिंह जिल्हा रुग्णालयात भरती करावे लागले आहे. 

या महिलेची मोठी विवाहित मुलगी व तिच्या पतीला हा प्रकार समजल्यावर त्यांनी त्यांना जिल्हा रुग्णालयात भरती केले. लेक व जावयाचीदेखील आर्थिक ओढाताणच आहे. रुग्णालयात भरती केल्यावर त्यांनी एका एनजीओला फोन केल्यावर ती संस्था रुग्णालयातच आली व तिने या कुटुंबाला मदत केली.या सहा जणांना कोणाकडून अधूनमधून जेवण दिले जायचे. गेल्या दहा दिवसांपासून या कुटुंबाला काहीच खायला मिळाले नाही. त्यामुळे संपूर्ण कुटुंबाची प्रकृती बिघडली. नंतर त्यांना महिलेची मुलगी व स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने जिल्हा रुग्णालयात भरती केले गेले.

या महिलेचा पती दोन महिन्यांपूर्वी गंभीर आजारामुळे मरण पावला. तेव्हापासून संपूर्ण कुटुंबाची खाण्याची आबाळ होत आहे. घर चालवण्यासाठी तिने एका कारखान्यात चार हजार रुपये वेतनाची नोकरीही सुरू केली. लाॅकडनमध्ये कारखाना बंद पडल्यावर तिला कुठेच काम मिळाले नाही. घरातील धान्यही संपले. मग या कुटुंबाला लोकांनी दिलेल्या अन्नावर दिवस काढावे लागले. लॉकडाऊन संपल्यावर या कुटुंबातील मुलाने (२०) मजुरी सुरू केली. ज्या दिवशी काम त्या दिवशी रेशन मिळत होते. काम नसले की कुटुंबाची उपासमार व्हायची. महिलेला चार मुले आणि मुलगी आहे, मुलगी १३ वर्षांची, मोठा मुलगा २०, दुसरा १५, तिसरा १० आणि सर्वात लहान मुलगा पाच वर्षांचा आहे.

तिघांची प्रकृती चिंताजनकमलखानसिंग जिल्हा रुग्णालयाचे आपत्कालीन प्रभारी डॉ. अमित म्हणाले की, “महिला आणि तिच्या पाच मुलांनी गेल्या दहा दिवसांपासून काहीही खाल्ले नाही, परिणामी त्यांची प्रकृती खूपच खराब आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सर्वांची प्रकृती ठीक नसून तीन मुलांची प्रकृती चिंताजनक आहे.” 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉक