शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

"एकही झोपडी तुटणार नाही", केजरीवाल यांच्या आरोपावर पंतप्रधान मोदी स्पष्टच बोलले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2025 16:15 IST

पंतप्रधान मोदी म्हणाले, "एकही झोपडपट्टी पडणार नाही आणि एकही योजना बंद होणरा नाही. 'आपदा'चे लोक अफवा पसरवत आहेत..."

दिल्लीत विधानसभा निवडणुकीची रणधुमाली सुरू आहे. नेतेमंडळी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. यातच, "जर भाजप सत्तेवर आला, तर सर्व झोपड्या पाडल्या जातील, जमिनी अब्जाधिशांच्या हवाले केल्या जातील. असे आरोप आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी केले आहेत. त्यांचे हे आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फेटाळून लावले आहे. 

पंतप्रधान मोदी म्हणाले, "एकही झोपडपट्टी पडणार नाही आणि एकही योजना बंद होणरा नाही. 'आपदा'चे लोक अफवा पसरवत आहेत. मात्र, लक्षात असू द्या, दिल्लीत एकही झोपडी पडणार नाही. तसेच ज्या लोककल्याणकारी योजना आहेत, त्यांपैकी कुठलीही योजन बंद होणार नाही.

पंतप्रधान मोदी म्हणाले, "भाजप हा एकमेव पक्ष आहे जो मध्यमवर्गाचा आदर करतो आणि प्रामाणिक लोकांना बक्षीस देतो. मध्यमवर्गीय म्हणत आहे की हा भारताच्या इतिहासातील सर्वात फ्रेंडली अर्थसंकल्प आहे. पूर्वी, अर्थसंकल्प सादर होणार आहे, हे ऐकताच मध्यमवर्गाची झोप उडत होती आणि ते वर्षभर झोपू शकत नव्हते. मात्र, या अर्थसंकल्पाने जनतेला मोठा दिलासा दिला आहे. आता १२ लाख रुपयांच्या उत्पन्नावरील आयकर शून्य करण्यात आला आहे. यामुळे मध्यमवर्गीय लोकांचे हजारो रुपये वाचतील.

मध्यमवर्गीयांच्या हजारो रुपयांची बचत होणार -यावेळी बोलताना पीएम मोदी म्हणतात, "आज जर पंडीत नेहरुंचा काळ असता, तर 12 लाख रुपयांवर एक चतुर्थांश कर भरावा लागला असता. इंदिरा गांधींचा काळ असता तर 12 लाख रुपयांपैकी 10 लाख रुपये करात गेले असते. 10-12 वर्षांपूर्वी काँग्रेस सरकारच्या काळात 12 लाख रुपयांवर 2 लाख 60 हजार रुपये कर भरावा लागायचा. पण, भाजप सरकारच्या काळात 12 लाख रुपये कमावणाऱ्या व्यक्तीला एक रुपयाही कर भरावा लागणार नाही." तसेच, "मध्यमवर्गीयांसाठी हा सर्वात अनुकूल अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पामुळे भारतातील प्रत्येक कुटुंब आनंदी आहे. 12 लाखांच्या उत्पन्नावर शून्य करामुळे मध्यमवर्गीय लोकांचे हजारो रुपयांची बचत होणार आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाDelhi Assembly Election 2025दिल्ली निवडणूक 2025