शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
2
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
3
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
4
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
5
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
7
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
8
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
9
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
10
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
11
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
12
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
13
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
14
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
15
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
16
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
17
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
18
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

"एकही झोपडी तुटणार नाही", केजरीवाल यांच्या आरोपावर पंतप्रधान मोदी स्पष्टच बोलले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2025 16:15 IST

पंतप्रधान मोदी म्हणाले, "एकही झोपडपट्टी पडणार नाही आणि एकही योजना बंद होणरा नाही. 'आपदा'चे लोक अफवा पसरवत आहेत..."

दिल्लीत विधानसभा निवडणुकीची रणधुमाली सुरू आहे. नेतेमंडळी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. यातच, "जर भाजप सत्तेवर आला, तर सर्व झोपड्या पाडल्या जातील, जमिनी अब्जाधिशांच्या हवाले केल्या जातील. असे आरोप आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी केले आहेत. त्यांचे हे आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फेटाळून लावले आहे. 

पंतप्रधान मोदी म्हणाले, "एकही झोपडपट्टी पडणार नाही आणि एकही योजना बंद होणरा नाही. 'आपदा'चे लोक अफवा पसरवत आहेत. मात्र, लक्षात असू द्या, दिल्लीत एकही झोपडी पडणार नाही. तसेच ज्या लोककल्याणकारी योजना आहेत, त्यांपैकी कुठलीही योजन बंद होणार नाही.

पंतप्रधान मोदी म्हणाले, "भाजप हा एकमेव पक्ष आहे जो मध्यमवर्गाचा आदर करतो आणि प्रामाणिक लोकांना बक्षीस देतो. मध्यमवर्गीय म्हणत आहे की हा भारताच्या इतिहासातील सर्वात फ्रेंडली अर्थसंकल्प आहे. पूर्वी, अर्थसंकल्प सादर होणार आहे, हे ऐकताच मध्यमवर्गाची झोप उडत होती आणि ते वर्षभर झोपू शकत नव्हते. मात्र, या अर्थसंकल्पाने जनतेला मोठा दिलासा दिला आहे. आता १२ लाख रुपयांच्या उत्पन्नावरील आयकर शून्य करण्यात आला आहे. यामुळे मध्यमवर्गीय लोकांचे हजारो रुपये वाचतील.

मध्यमवर्गीयांच्या हजारो रुपयांची बचत होणार -यावेळी बोलताना पीएम मोदी म्हणतात, "आज जर पंडीत नेहरुंचा काळ असता, तर 12 लाख रुपयांवर एक चतुर्थांश कर भरावा लागला असता. इंदिरा गांधींचा काळ असता तर 12 लाख रुपयांपैकी 10 लाख रुपये करात गेले असते. 10-12 वर्षांपूर्वी काँग्रेस सरकारच्या काळात 12 लाख रुपयांवर 2 लाख 60 हजार रुपये कर भरावा लागायचा. पण, भाजप सरकारच्या काळात 12 लाख रुपये कमावणाऱ्या व्यक्तीला एक रुपयाही कर भरावा लागणार नाही." तसेच, "मध्यमवर्गीयांसाठी हा सर्वात अनुकूल अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पामुळे भारतातील प्रत्येक कुटुंब आनंदी आहे. 12 लाखांच्या उत्पन्नावर शून्य करामुळे मध्यमवर्गीय लोकांचे हजारो रुपयांची बचत होणार आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाDelhi Assembly Election 2025दिल्ली निवडणूक 2025