शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
4
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
5
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
6
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
7
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
8
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
9
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
10
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
11
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
12
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
13
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
14
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
15
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
16
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
17
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
18
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
19
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
20
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची

ईशान्येकडील राज्यांत बीफबंदी करणार नाही

By admin | Updated: March 28, 2017 01:56 IST

उत्तर प्रदेशात कत्तलखान्यांच्या विरोधात जोरदार मोहीम योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने राबविली असतानाच

गुवाहाटी : उत्तर प्रदेशात कत्तलखान्यांच्या विरोधात जोरदार मोहीम योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने राबविली असतानाच, ईशान्येकडील राज्यांमध्ये सत्तेवर आल्यास गोहत्येवर बंदी घातली जाणार नाही, असे भारतीय जनता पार्टीने म्हटले आहे. पुढील वर्षी ईशान्येकडील मेघालय, मिझोराम आणि नागालँडमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. या तीनच नव्हे, तर ईशान्येकडील सर्वच राज्यांत अनेक जनावरांचे मांस सररास खाल्ले जाते.मेघालय, नागालँड आणि मिझोराम या राज्यांत ख्रिश्चन बहुसंख्येने असून, गायीचे मांस तेथे मोठ्या प्रमाणावर खाल्ले जाते. भाजपाचे मेघालय शाखेचे सरचिटणीस डेव्हिड खारसाती यांनी रविवारी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, काही हितसंबंधी गटांनी तशा अफवा पसरवल्या आहेत. गोहत्येवर उत्तर प्रदेशात बंदी असली तरी तशी नागालँडमध्ये पुढील वर्षी आम्ही सत्तेवर आल्यास घातली जाणार नाही. नागालँडमधील वस्तुस्थिती खूपच भिन्न आहे.यूपीमध्ये परवानाधारक कत्तलखान्यांनी घाबरू नयेबेकायदा कत्तलखान्यांवरच कारवाई केली जात आहे, असे स्पष्टीकरण उत्तर प्रदेश सरकारने सोमवारी केले. परवानाधारक कत्तलखान्यांनी नियमांचे पालन करावे. आम्ही फक्त बेकायदा कत्तलखान्यांवरच कारवाई करीत आहोत, असे आरोग्य मंत्री सिद्धार्थ नाथ सिंह यांनी येथे सांगितले. परवानाधारक कत्तलखान्यांनी परवान्यातील नियमांचे पालन केले पाहिजे, त्यांना घाबरण्याचे कारण नाही, असे सिंह म्हणाले. अंडी, मासे आणि कोंबड्या विकणाऱ्या कोणत्याही दुकानावर कारवाई करण्याचे कोणतेही आदेश दिले गेलेले नाहीत, त्यांनी घाबरण्याचे कारण नाही, असे मंत्र्यांनी स्पष्ट केले. अधिकाऱ्यांनी अति उत्साहात कृती आणि आपल्या अधिकाराचे उल्लंघन करू नये, असे आदेश सिंह यांनी अधिकाऱ्यांना दिले. कत्तलखान्याच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे बंधन परवान्यात आहे. ते लवकरात लवकर लावण्यात यावेत.तेवढ्या कारणास्तव पोलीस वा प्रशासनाने कत्तलखान्यांच्या मालकांवर सरसकट कारवाई करू नये. राष्ट्रीय हरित लवादाने २०१५मध्ये बेकायदा कत्तलखान्यांमुळे पर्यावरणाला धोका असल्याचे म्हटले होते. परंतु अखिलेश सरकारने काहीही कारवाई केली नाही, अशी टीकाही सिद्धार्थ नाथ सिंह यांनी केली. बेकायदा कत्तलखान्यांवर होतेय कारवाई : सीतारामननवी दिल्ली : उत्तर प्रदेश सरकार राज्यातील फक्त बेकायदा कत्तलखान्यांवर कारवाई करीत आहे, असे वाणिज्यमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी लोकसभेत सांगितले. गेल्या आर्थिक वर्षात म्हशीच्या मांसाच्या निर्यातीत झालेली घट ही जागतिक कारणांमुळे होती, असेही त्या म्हणाल्या.