शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

ईशान्य भारतात 92 नवे हवाईमार्ग, उडान योजनेद्वारे मिळणार लाभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2017 15:18 IST

ईशान्य भारतात उडान योजनेंतर्गत 92 नवे हवाई मार्ग अस्तित्त्वात येतील अशी माहिती केंद्रीय नागरी हवाई उड्डाण राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी स्पष्ट केले.

ठळक मुद्देईशान्य भारत विकास परिषदेमध्ये जयंत सिन्हा या नव्या मार्गांबाबत बोलत होते. इंडिया फाऊंडेशन ही संस्था आणि मणिपूर सरकारतर्फे ही परिषद आयोजीत करण्यात आली होती.

इंफाळ- ईशान्य भारताचा उर्वरीत भारताशी संपर्क अधिकाधिक वाढविण्यासाठी 'उडान' योजनेचा उपयोग आता केला जाणार आहे. ईशान्य भारतात या योजनेंतर्गत 92 नवे हवाई मार्ग अस्तित्त्वात येतील अशी माहिती केंद्रीय नागरी हवाई उड्डाण राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी स्पष्ट केले. 

जानेवारी महिन्यापासून दिल्ली आणि इंफाळमध्ये आठवड्यातून दोनदा एअर इंडियाचे विमान सेवा पुरवेल तसेच मागणी वाढल्यास ही सेवा दररोज पुरवली जाईल असेही सिन्हा यांनी सांगितले. इंडिगो विमानकंपनी आपली सेवा गुवाहाटी ते सिल्चर आणि ऐजॉल अशी सुरु करेल त्याचप्रमाणे अत्यंत लहान हवाईपट्टीवर उतरू शकतील अशी नऊ-दहा आसनांची सीप्लेनस स्पाईसजेट विमानकंपनी सुरु करत असल्याची माहिती सिन्हा यांनी दिली. स्पाईसजेट अशा प्रकारची विमाने खरेदी करत आहे, त्यामुळे ईशान्य भारताशी संपर्क वाढेल.

ईशान्य भारत विकास परिषदेमध्ये जयंत सिन्हा या नव्या मार्गांबाबत बोलत होते. इंडिया फाऊंडेशन ही संस्था आणि मणिपूर सरकारतर्फे ही परिषद आयोजीत करण्यात आली होती. ते पुढे म्हणाले, "सिक्कीममधील पाकयोंग विमानतळ आता पूर्ण होत असून त्यामुळे नथू ला पाहण्यासाठी जाणारे आणि सिक्किमच्या उत्तर भागात जाणारे पर्यटक त्याचा वापर करु शकतील. मणिपूरमधील मोअर, आसाममधील रुप्सी, मेघालयातील तुरा अशा विमानतळांवरील वाहतूक सुरु होणार आहे." देशात विमानवाहतूक वाढविण्यासाठी, ज्या शहरांमध्ये आजवर विमानवाहतूक सुरु झाली नाही किंवा वापरात नसलेल्या विमानतळांचा वापर सुरु करणे यासाठी उडान म्हणजे उडे देशका हर नागरिक ही योजना केंद्र सरकारतर्फे सुरु करण्यात आली आहे. या योजनेच्या अंतर्गतच देशामध्ये हवाई वाहतूक वाढण्यासाठी प्रयत्न केले जात आहे.

 

टॅग्स :Indiaभारत