शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
3
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
4
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
5
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
6
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
7
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
8
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
9
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
10
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
11
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
12
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
13
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
14
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
15
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
16
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
17
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
18
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
19
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
20
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले

रेल्वे वाहतुकीसाठी काही राज्यांकडून असहकार्य, रेल्वे मंत्रालयाची तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2020 05:54 IST

असहकार्य करत असलेल्या राज्यांनी त्यांच्याकडे रेल्वेगाड्यांना प्रवेश द्यावा आणि रेल्वेगाड्यांच्या येण्याजाण्याची संख्या वाढवावी, अशी विनंती आम्ही त्यांना केली असल्याचे रेल्वेमंत्रालयाने म्हटले.

- संतोष ठाकूरनवी दिल्ली : केंद्र आणि राज्य सरकारे यांच्यात रेल्वे वाहतुकीवरून वाद थांबायला तयार नाही. अनेक राज्ये अशी आहेत की, ती त्यांच्याकडे रेल्वेगाड्या येऊ देत नाहीत, असे केंद्राने आधीच म्हटलेले होते. यामुळे त्या त्या राज्यांत अडकून पडलेले स्थलांतरित कामगार व इतर लोकांना त्यांच्या राज्यांत परत पाठवण्याच्या कामात अडथळे आले आहेत. असहकार्य करत असलेल्या राज्यांनी त्यांच्याकडे रेल्वेगाड्यांना प्रवेश द्यावा आणि रेल्वेगाड्यांच्या येण्याजाण्याची संख्या वाढवावी, अशी विनंती आम्ही त्यांना केली असल्याचे रेल्वेमंत्रालयाने म्हटले.असे प्रश्न पश्चिम बंगाल व महाराष्ट्रात निर्माण झाल्याचे त्याचे म्हणणे आहे. रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी म्हटले की, पश्चिम बंगालने आठ मेपर्यंत आठ रेल्वेगाड्यांना येऊ दिले जाईल, असे म्हटले होते. परंतु, आजही या रेल्वे धावलेल्या नाहीत. पश्चिम बंगालसाठी फक्त दोन रेल्वेगाड्या धावल्या आहेत. पश्चिम बंगालच्या असहकार्यामुळे त्या राज्यात राहणाऱ्यांचीच अडचण झाली आहे असे नाही तर त्या राज्यात अडकून पडलेल्यांना तेथून बाहेर काढता येत नाही.रेल्वे मंत्रालयातील अधिकारी म्हणाला की, ‘‘महाराष्ट्रातही अशाच अडचणी येत आहेत. महाराष्ट्र बाहेरून रेल्वे येऊ देण्यात सहकार्य करत नाही. इतर राज्यांत अडकून पडलेल्या महाराष्ट्रातील लोकांना त्यांच्या राज्यात परत येण्यात अडचणी येत आहेत तसेच महाराष्ट्रातून बाहेर राज्यांत जाऊ इच्छिणाऱ्यांना सरकारमुळे अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. महाराष्ट्राने रेल्वेंची संख्या वाढवावी व रेल्वेंना येऊ देण्यात सहकार्य करावे.’’

 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेIndiaभारत