शहरं
Join us  
Trending Stories
1
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
2
IND vs ENG : 'ती' साथ देणार अशा परिस्थितीत त्यानं विश्रांती घेतली; सोशल मीडियावर बुमराह झाला ट्रोल
3
"भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; अमित शाहांचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाणांचे गंभीर विधान
4
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
5
आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ  
6
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
7
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्
8
बांगलादेशी मॉडेलला भारतात अटक! पोलिसांनी राहत्या घरावर टाकली धाड अन् आत जे सापडलं...
9
Nashik Dengue News: नाशकात डेंग्यूचा उद्रेक! एका महिन्यात रुग्णांची संख्या तिप्पट, कारण काय?
10
महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे; कुटुंबाच्या भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आदेश
11
अशी ही 'अदलाबदली'! कोकाटेंचा 'पत्ता' कापणार नाहीत, पण खातं बदलणार; दत्तात्रय भरणे होणार कृषिमंत्री - सूत्र
12
'भारताची अर्थव्यवस्था मृतावस्थेत', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेला राहुल गांधींचे समर्थन, म्हणाले...
13
भयंकर! एम्समधील नर्सच्या दोन मुलांना घरात घुसून जिवंत जाळले, आईचा आक्रोश
14
चीनने पाकिस्तानला भेट दिली रस्त्यावरून धावणारी मेट्रो, रुळांची गरजच नाही, अशी आहेत आणखी वैशिष्ट्ये
15
IND vs ENG : कमनशिबी कॅप्टन! किंग कोहलीनंतर टीम इंडियातील प्रिन्स शुबमन गिलवर आली ही वेळ
16
भारताचा विकास रोखण्याचा प्रयत्न; ट्रम्प यांनी भारतीय कंपन्यांवर लादलेल्या निर्बंधांमुळे इराण संतापला
17
अर्ध वर्षं संपलं, पण अर्धं तर बाकी आहे! 'या' सवयी बदला- डिसेंबर २०२५ पर्यंत बदलेल जगणं
18
'आयुष्मान भारत योजना फसवी' मुंबईतील महिलेची सरकारी योजनेवर टीका, सांगितला धक्कादायक अनुभव
19
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
20
मालेगाव बॉम्ब स्फोट: "तपास यंत्रणा शंकेपलीकडे आरोप सिद्ध करू शकत नसतील, तर..."; खासदार देसाई काय बोलले?

रेल्वे वाहतुकीसाठी काही राज्यांकडून असहकार्य, रेल्वे मंत्रालयाची तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2020 05:54 IST

असहकार्य करत असलेल्या राज्यांनी त्यांच्याकडे रेल्वेगाड्यांना प्रवेश द्यावा आणि रेल्वेगाड्यांच्या येण्याजाण्याची संख्या वाढवावी, अशी विनंती आम्ही त्यांना केली असल्याचे रेल्वेमंत्रालयाने म्हटले.

- संतोष ठाकूरनवी दिल्ली : केंद्र आणि राज्य सरकारे यांच्यात रेल्वे वाहतुकीवरून वाद थांबायला तयार नाही. अनेक राज्ये अशी आहेत की, ती त्यांच्याकडे रेल्वेगाड्या येऊ देत नाहीत, असे केंद्राने आधीच म्हटलेले होते. यामुळे त्या त्या राज्यांत अडकून पडलेले स्थलांतरित कामगार व इतर लोकांना त्यांच्या राज्यांत परत पाठवण्याच्या कामात अडथळे आले आहेत. असहकार्य करत असलेल्या राज्यांनी त्यांच्याकडे रेल्वेगाड्यांना प्रवेश द्यावा आणि रेल्वेगाड्यांच्या येण्याजाण्याची संख्या वाढवावी, अशी विनंती आम्ही त्यांना केली असल्याचे रेल्वेमंत्रालयाने म्हटले.असे प्रश्न पश्चिम बंगाल व महाराष्ट्रात निर्माण झाल्याचे त्याचे म्हणणे आहे. रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी म्हटले की, पश्चिम बंगालने आठ मेपर्यंत आठ रेल्वेगाड्यांना येऊ दिले जाईल, असे म्हटले होते. परंतु, आजही या रेल्वे धावलेल्या नाहीत. पश्चिम बंगालसाठी फक्त दोन रेल्वेगाड्या धावल्या आहेत. पश्चिम बंगालच्या असहकार्यामुळे त्या राज्यात राहणाऱ्यांचीच अडचण झाली आहे असे नाही तर त्या राज्यात अडकून पडलेल्यांना तेथून बाहेर काढता येत नाही.रेल्वे मंत्रालयातील अधिकारी म्हणाला की, ‘‘महाराष्ट्रातही अशाच अडचणी येत आहेत. महाराष्ट्र बाहेरून रेल्वे येऊ देण्यात सहकार्य करत नाही. इतर राज्यांत अडकून पडलेल्या महाराष्ट्रातील लोकांना त्यांच्या राज्यात परत येण्यात अडचणी येत आहेत तसेच महाराष्ट्रातून बाहेर राज्यांत जाऊ इच्छिणाऱ्यांना सरकारमुळे अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. महाराष्ट्राने रेल्वेंची संख्या वाढवावी व रेल्वेंना येऊ देण्यात सहकार्य करावे.’’

 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेIndiaभारत