शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

Noida Residential Plot Scheme: बापरे! ४५० चौ. मीटरचा प्लॉट अन् बोली १००० कोटींची, अजब लिलावानं सर्वच आश्चर्यचकीत; नेमकं प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2022 17:32 IST

नोएडामध्ये एक आश्चर्यकारक लिलाव पाहायला मिळाला. प्राधिकरणाने सुरू केलेल्या निवासी भूखंड योजनेत 450 चौरस मीटरच्या भूखंडाला एक हजार कोटींहून अधिक रुपयांची बोली लागली आहे.

नवी दिल्ली-

नोएडामध्ये एक आश्चर्यकारक लिलाव पाहायला मिळाला. प्राधिकरणाने सुरू केलेल्या निवासी भूखंड योजनेत 450 चौरस मीटरच्या भूखंडाला एक हजार कोटींहून अधिक रुपयांची बोली लागली आहे. हे पाहून खुद्द प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांचाही यावर विश्वास बसत नाही. सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. हा प्लॉट नोएडाच्या सेक्टर 44 मध्ये आहे. तर या भूखंडाची मूळ किंमत ९.३१ कोटी रुपये होती. आता प्राधिकरणाकडून या लिलावाचा तपास केला जाणार आहे. एका भूखंडाची जास्त बोली लागल्याने सर्वच हैराण झाले आहेत. 

भूखंडाच्या मूळ किमतीपेक्षा अनेक पटींनी अधिक बोली लावण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी मंगळवारी लिलाव होणार होता, मात्र प्राधिकरणाने सोमवारी सायंकाळी अचानक लिलाव पुढे ढकलला होता. प्राधिकरणाची निवासी आणि औद्योगिक भूखंड योजना नोएडा येथे 5 सप्टेंबर रोजी सुरू करण्यात आली. योजनेत प्राधिकरणाने सेक्टर-३१, ३३, ३४, ३५, ४३, ४४, ४७, ५१, ५२, १०५, १०८, ९३बी आणि १५१ मधील सुमारे १४० भूखंड खरेदीसाठी अर्ज मागवले होते. अर्ज केल्यानंतर, ई-लिलाव प्रक्रिया राबवली जाणार होती. सेक्टर-151 च्या नव्याने विकसित झालेल्या परिसरात अर्ज करता येईल. यानंतर उर्वरित भूखंड जुन्या सेक्टरमध्ये आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ सप्टेंबर होती.

चार हप्त्यांमध्ये द्यावे लागणार पैसेअर्जदाराला प्लॉट यशस्वीरित्या प्राप्त झाल्यास त्याला पैसे एका वर्षात चार हप्त्यांमध्ये भरावे लागतील. याशिवाय ५ टक्के सुरक्षा ठेव जमा करावी लागणार आहे. ११२ sqm ते ५३२ sqm चे भूखंड येथे दिले आहेत. तसेच औद्योगिक विभागाच्या भूखंड योजनेचा शुभारंभही करण्यात आला. या योजनेंतर्गत प्रथमच भूखंड केवळ ई-लिलावाद्वारे उपलब्ध होणार आहेत. सेक्टर-६७, ८०, १४५, १५८ आणि १६४ मध्ये ४५० चौरस मीटर ते ३३५०० चौरस मीटरपर्यंतचे ७९ भूखंड आहेत.

बोली राखीव किंमतीच्या वर ठेवावी लागणारज्या सेक्टरमध्ये भूखंड असेल त्या क्षेत्राच्या निवासी भूखंडाचे दर राखीव किंमत म्हणून निश्चित करण्यात आले आहेत. आता अर्जदारांना राखीव किंमतीपेक्षा जास्त बोली लावावी लागेल. यामध्ये जो कोणी सर्वाधिक बोली लावेल, त्याच्या नावावर भूखंडाचे वाटप केले जाईल. या योजनेत, अर्जदारांनी नोंदणीसाठी राखीव किंमतीच्या 10 टक्के रक्कम जमा केली आहे. याशिवाय कागदपत्र शुल्क म्हणून २५०० रुपये, प्रक्रिया शुल्क म्हणून २३०० रुपये आणि जीएसटी म्हणून ४५० रुपये जमा करण्यात आले आहेत.

टॅग्स :delhiदिल्ली