शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

Noida Residential Plot Scheme: बापरे! ४५० चौ. मीटरचा प्लॉट अन् बोली १००० कोटींची, अजब लिलावानं सर्वच आश्चर्यचकीत; नेमकं प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2022 17:32 IST

नोएडामध्ये एक आश्चर्यकारक लिलाव पाहायला मिळाला. प्राधिकरणाने सुरू केलेल्या निवासी भूखंड योजनेत 450 चौरस मीटरच्या भूखंडाला एक हजार कोटींहून अधिक रुपयांची बोली लागली आहे.

नवी दिल्ली-

नोएडामध्ये एक आश्चर्यकारक लिलाव पाहायला मिळाला. प्राधिकरणाने सुरू केलेल्या निवासी भूखंड योजनेत 450 चौरस मीटरच्या भूखंडाला एक हजार कोटींहून अधिक रुपयांची बोली लागली आहे. हे पाहून खुद्द प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांचाही यावर विश्वास बसत नाही. सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. हा प्लॉट नोएडाच्या सेक्टर 44 मध्ये आहे. तर या भूखंडाची मूळ किंमत ९.३१ कोटी रुपये होती. आता प्राधिकरणाकडून या लिलावाचा तपास केला जाणार आहे. एका भूखंडाची जास्त बोली लागल्याने सर्वच हैराण झाले आहेत. 

भूखंडाच्या मूळ किमतीपेक्षा अनेक पटींनी अधिक बोली लावण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी मंगळवारी लिलाव होणार होता, मात्र प्राधिकरणाने सोमवारी सायंकाळी अचानक लिलाव पुढे ढकलला होता. प्राधिकरणाची निवासी आणि औद्योगिक भूखंड योजना नोएडा येथे 5 सप्टेंबर रोजी सुरू करण्यात आली. योजनेत प्राधिकरणाने सेक्टर-३१, ३३, ३४, ३५, ४३, ४४, ४७, ५१, ५२, १०५, १०८, ९३बी आणि १५१ मधील सुमारे १४० भूखंड खरेदीसाठी अर्ज मागवले होते. अर्ज केल्यानंतर, ई-लिलाव प्रक्रिया राबवली जाणार होती. सेक्टर-151 च्या नव्याने विकसित झालेल्या परिसरात अर्ज करता येईल. यानंतर उर्वरित भूखंड जुन्या सेक्टरमध्ये आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ सप्टेंबर होती.

चार हप्त्यांमध्ये द्यावे लागणार पैसेअर्जदाराला प्लॉट यशस्वीरित्या प्राप्त झाल्यास त्याला पैसे एका वर्षात चार हप्त्यांमध्ये भरावे लागतील. याशिवाय ५ टक्के सुरक्षा ठेव जमा करावी लागणार आहे. ११२ sqm ते ५३२ sqm चे भूखंड येथे दिले आहेत. तसेच औद्योगिक विभागाच्या भूखंड योजनेचा शुभारंभही करण्यात आला. या योजनेंतर्गत प्रथमच भूखंड केवळ ई-लिलावाद्वारे उपलब्ध होणार आहेत. सेक्टर-६७, ८०, १४५, १५८ आणि १६४ मध्ये ४५० चौरस मीटर ते ३३५०० चौरस मीटरपर्यंतचे ७९ भूखंड आहेत.

बोली राखीव किंमतीच्या वर ठेवावी लागणारज्या सेक्टरमध्ये भूखंड असेल त्या क्षेत्राच्या निवासी भूखंडाचे दर राखीव किंमत म्हणून निश्चित करण्यात आले आहेत. आता अर्जदारांना राखीव किंमतीपेक्षा जास्त बोली लावावी लागेल. यामध्ये जो कोणी सर्वाधिक बोली लावेल, त्याच्या नावावर भूखंडाचे वाटप केले जाईल. या योजनेत, अर्जदारांनी नोंदणीसाठी राखीव किंमतीच्या 10 टक्के रक्कम जमा केली आहे. याशिवाय कागदपत्र शुल्क म्हणून २५०० रुपये, प्रक्रिया शुल्क म्हणून २३०० रुपये आणि जीएसटी म्हणून ४५० रुपये जमा करण्यात आले आहेत.

टॅग्स :delhiदिल्ली