शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
2
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
3
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
4
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
5
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
6
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
7
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
8
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
9
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
10
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
11
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
12
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
13
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
14
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
15
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
16
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
17
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
18
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
19
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
20
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 

"PM मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी, जर ते लांबले असतं तर नुकसान झालं असतं"; चंद्राबाबू नायडूंनी केलं कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 07:58 IST

पंतप्रधान मोदींशिवाय कोणीही ऑपरेशन सिंदूर राबवू शकले नसते, असंही चंद्राबाबू नायडू म्हणाले.

N. Chandrababu Naidu on Operation Sindoor:  पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ऑपरेश सिंदूर राबवून पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. या कारवाईत अनेक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. यासह भारताने दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानलाही कडक इशारा दिला.  ऑपरेशन सिंदूरवर भारताची बाजू मांडत सर्वपक्षीय शिष्टमंडळाने जगभरातल्या देशांमध्ये जात पाकिस्तानची पोलखोल केली. त्यामुळे जगभरातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करण्यात आलं. आता एनडीएतील महत्त्वाचे घटक असलेल्या एन. चंद्राबाबू नायडू यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जोरदार कौतुक केले आहे. पंतप्रधान मोदींशिवाय कोणीही ऑपरेशन सिंदूर राबवू शकले नसते, असं टीडीपीचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांनी म्हटलं.

विरोधकांना नेहमीप्रमाणे आशा होती की कधीतरी चंद्राबाबू नायडू पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या धोरणांना विरोध करायला सुरुवात करतील. पण नेहमीप्रमाणे यावेळीही त्याच्या उलटच झाले. इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीमध्ये चंद्राबाबू नायडू यांनी सरकारच्या सर्व मुद्द्यांवर भाजप आणि पंतप्रधान मोदींना उघडपणे पाठिंबा दिला आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी ऑपरेशन सिंदूरसाठी पंतप्रधान मोदींचे उघडपणे कौतुक केले. मोदी सरकारसाठी ही एक मोठी कामगिरी आहे. इतर कोणताही नेता इतक्या अचूकतेने हे काम करू शकला नसता, असं चंद्राबाबू नायडू म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जागतिक नेते आहेत. भारत आणि पाकिस्तानमधील लष्करी संघर्ष रोखण्यात पंतप्रधान मोदींनी भूमिका बजावली, असंही चंद्राबाबू नायडूंनी म्हटलं.

"१०० टक्के, हे (ऑपरेशन सिंदूर) मोदी सरकारचे एक यश आहे. इतर कोणताही नेता इतक्या अचूकतेने आणि कार्यक्षमतेने हे करू शकला नसता. पहलगाम दहशतवादी हल्ला दुर्दैवी होता, ज्यामध्ये पतींना त्यांच्या पत्नींसमोर मारण्यात आले. या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी पंतप्रधान मोदींनी लष्करी कारवाईला "ऑपरेशन सिंदूर" असे नाव दिले, ज्यामध्ये भारतीय महिलांच्या भावनांचा आदर करण्यात आला. २० मिनिटांत दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले आणि नागरिकांवर आणि संरक्षणाच्या संदर्भातील ठिकाणांवर कोणताही हल्ला झाला नाही. वेळीच संघर्ष थांबवण्यात आला. पंतप्रधान मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी झाले. जर ते जास्त काळ चालू राहिले असते तर आपले नुकसान झाले असते," एन. चंद्राबाबू नायडू म्हणाले.

"भारताला सर्व देशांशी मैत्रीपूर्ण संबंध हवे आहेत, पण आम्हाला कोणत्याही शिफारशी किंवा पाठिंब्याची गरज नाही. पंतप्रधान मोदी जागतिक स्तरावर एक मोठे नेते म्हणून उदयास येत आहेत, जी भारतासाठी अभिमानाची बाब आहे," असंही चंद्राबाबू नायडू यांनी म्हटलं. 

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरChandrababu Naiduचंद्राबाबू नायडूNarendra Modiनरेंद्र मोदी