शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मोरबी पूल सुरू करण्याची घाई नडली, बचावकार्य युद्धपातळीवर; कंपनीवर हत्येचा गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2022 07:27 IST

दुरुस्ती आणि नूतनीकरणाच्या कामानंतर पाच दिवसांपूर्वी तो सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात आला होता.

मोरबी : गुजरातच्या मोरबी शहरातील मच्छू नदीवरील केबल पूल दुर्घटनेतील मृतांची संख्या सोमवारी १३४ वर पोहोचली असून, अद्याप बचावकार्य सुरू आहे. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि गृहराज्यमंत्री हर्ष संघवी यांचे बचाव कार्यावर लक्ष आहे.  

या घटनेत आतापर्यंत ९ जणांना अटक करण्यात आली असून, पुलाची देखभाल करणाऱ्या कंपनीविरोधात हत्येचा गुन्हा नोंदविला आहे. हा पूल शतकाहून अधिक जुना आहे. दुरुस्ती आणि नूतनीकरणाच्या कामानंतर पाच दिवसांपूर्वी तो सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात आला होता. पूल खुला करण्याची घाई का करण्यात आली? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.

मोरबीचे ४३ वर्षांपूर्वी झाले होते स्मशान...

पुल अपघाताने मोरबीतील जनतेला पुन्हा एका वेदनादायक घटनेची आठवण करून दिली. मच्छू नदीवरील धरण फुटल्याने ११ ऑगस्ट १९७९ रोजी या संपूर्ण शहराचे स्मशानभूमीत रूपांतर झाले होते. १४०० जणांचे बळी गेले होते. ११ ऑगस्ट १९७९ रोजी दुपारी सव्वातीन वाजता धरण फुटले आणि १५ मिनिटांत धरणाच्या पाण्याने संपूर्ण शहर व्यापले. काही वेळातच संपूर्ण शहर उद्ध्वस्त झाले. घरे आणि इमारती कोसळल्या. लोकांना सावरण्याची संधीही मिळाली नाही. गावातील वीज खांबांवर माणसांपासून जनावरांचे मृतदेह लटकले होते. सगळीकडे केवळ मृतदेहच दिसत होते. 

खासदाराच्या १२ नातेवाइकांचा मृत्यू

पूल दुर्घटनेत आपल्या १२ नातेवाइकांचा मृत्यू झाल्याची माहिती राजकोटचे भाजप खासदार मोहन कुंदारिया यांनी सोमवारी दिली. रविवारी ही घटना घडली तेव्हा नातेवाईक पूल आणि परिसरात सहलीला गेले होते. माझ्या मोठ्या भावाच्या मेहुण्याच्या चार मुली, त्यापैकी तिघांचे पती आणि पाच मुले अपघातात मृत्युमुखी पडली, अपघाताला जबाबदार असणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

पुलाला फिटनेस प्रमाणपत्रच नाही...

एका खासगी ऑपरेटरने सहा महिने पुलाच्या दुरुस्तीचे काम केले. २६ ऑक्टोबर रोजी गुजराती नववर्षाच्या दिवशी हा पूल पुन्हा जनतेसाठी खुला करण्यात आला; परंतु स्थानिक प्रशासनाने अद्याप पुलासाठी फिटनेस प्रमाणपत्र जारी केलेले नाही, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

चौकशी समिती स्थापन

राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची (एनडीआरएफ) पाच पथके, राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची (एडीआरएफ) सहा पथके, एक हवाई दल, दोन लष्करी तुकड्या आणि भारतीय नौदलाच्या दोन तुकड्या, स्थानिक बचाव पथके शोधमोहिमेत सामील झाली आहेत. बचावकार्य अजूनही सुरूच असल्याचे यादव यांनी सांगितले. दरम्यान, राज्य सरकारने पूल कोसळण्याच्या घटनेच्या चौकशीसाठी समिती स्थापन केली आहे.

टॅग्स :Morbi Bridge Collapseमोरबी पूलGujaratगुजरात