शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीस-शिंदेंमध्ये दुरावा? बिहारला ना एकत्र गेले, ना एकत्र आले, एकमेकांकडे पाहून कोरडंच हसले; नेमके काय घडले? 
2
'एनडीएने बिहारची मते ५.५ रुपये प्रतिदिन दराने खरेदी केली', प्रशांत किशोर यांचा मोठा दावा
3
कराची शेअर बाजारात तेजी... पाकिस्तानची सर्वात मोठी कंपनी कोणती? रिलायन्सच्या तुलनेत कुठे?
4
Mumbai Crime: ऑफिसमधून बाहेर पडताच कारच्या समोरून आले आणि घातल्या गोळ्या; मुंबईतील घटनेचा व्हिडीओ आला समोर
5
Jara Hatke : जगातील अद्भुत कोपरा, जिथे सूर्य दोन महिने 'सुट्टीवर' जातो; तापमानही जाते शून्याच्या खाली!
6
उदयपूरमध्ये शाही विवाह सोहळा, ज्युनियर ट्रम्पपासून VVIP पाहुणे येणार; कोण आहे वधू आणि वर?
7
किलर स्माईल ते किलर्स स्माईल! माधुरी दीक्षितची सस्पेन्स सीरिज 'या' दिवशी होणार रिलीज
8
एकनाथ शिंदेंकडून दिल्लीत तक्रार पण मंत्री उदय सामंतांनी रवींद्र चव्हाणांचं केलं भरभरून कौतुक
9
धक्कादायक! शाळेच्या छतावरून उडी घेऊन १३ वर्षीय विद्यार्थिनीने आयुष्य संपवले, नेमके कारण काय?
10
असं काय झालं की, लग्नाला फक्त ३ दिवस बाकी असताना नवरदेवाने संपवले आयुष्य; ४ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
11
Smriti Mandhana : समझो हो ही गया... स्मृती मंधानाने केली साखरपुड्याची अनोखी घोषणा, रविवारी होणार विवाह
12
"युट्यूबमधून मी जास्त पैसे कमावते...", फराह खानचा खुलासा; कोरिओग्राफी-दिग्दर्शनाबद्दल म्हणाली...
13
Jalana: १३ वर्षीय विद्यार्थिनीने शाळेच्या छतावरून उडी घेत संपवले जीवन; पालकांचा गंभीर आरोप
14
"जर मी तिला शाळेत पाठवलं नसतं तर..."; चौथ्या मजल्यावरुन उडी मारलेल्या अमायराच्या आईचा टाहो
15
मोमोजचा व्यवसाय, प्रचंड मेहनती, नवीन फ्लॅटही घेतला; साहिलने जे कमावलं ते ड्रायव्हिंगने गमावलं
16
The Family Man 3 Review: 'श्रीकांत तिवारी'वरच 'टास्क फोर्स'ला संशय; या मिशनमध्ये 'द फॅमिली मॅन' पास की फेल? वाचा रिव्ह्यू
17
Pune Accident: ताम्हिणी घाटात जीप ५०० फूट दरीत कोसळली, ६ तरुणांचा मृत्यू
18
IND vs SA: भारताला मोठा धक्का! शुबमन गिल दुसऱ्या कसोटीतून बाहेर, अनुभवी खेळाडूला कर्णधारपद
19
McDonald's नं भारतीय वंशाच्या कर्मचाऱ्याला दिलं ३५ लाखांचं बक्षीस, अमेरिकेत 'डिनर'देखील करवलं
20
Numerology: होणारी बायको कशी असणार? हे जन्मतारखेवरुन कळणार! मूलांकानुसार जाणून घ्या भविष्य
Daily Top 2Weekly Top 5

गांधीजींबाबत नाही आदर अन् ‘सोनार बांगला’ची भाषा; पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांची पदयात्रा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2020 07:00 IST

भारतीय जनता पक्षाच्या जातीय राजकारणापासून आपण त्याचे रक्षण केले पाहिजे.

कोलकाता : महात्मा गांधी आणि रवींद्रनाथ टागोर यांच्याविषयी आदर नसलेले आता ‘सोनार बांगला’ची भाषा बोलत आहेत, अशी टीका पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली. सध्या बंगालची अस्मिता संपवण्याचे ठरवून प्रयत्न सुरू आहेत. हे हिंसाचार आणि विभाजनवादी राजकारण थांबले पाहिजे, असे वक्तव्य बॅनर्जी यांनी बीरभूम जिल्ह्यातील बोलापूर येथील रॅलीमध्ये केले.

रॅलीमध्ये बॅनर्जी म्हणाल्या की, रवींद्रनाथ टागोर यांनी काही दशकांपूर्वीच सोनार बांगला (सोनेरी बंगाल) निर्माण केला होता. भारतीय जनता पक्षाच्या जातीय राजकारणापासून आपण त्याचे रक्षण केले पाहिजे. भाजप विश्वभारती युनिव्हर्सिटीची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्या म्हणाल्या की, विश्वभारती युनिव्हर्सिटीच्या निमित्ताने गलिच्छ राजकारण केले जात आहे. हिंदुत्वाच्या नावाखाली विद्वेष पसरवला जात आहे. युनिव्हर्सिटीचे कुलगुरु हे भाजपचे आहेत.

जातीय राजकारणासाठी ते युनिव्हर्सिटीची प्रतिमा मलिन करीत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप तृणमूल काँग्रेसच्या आमदारांची खरेदी करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. त्या म्हणाल्या की, पैशाच्या बळावर भ्रष्ट आमदारांची खरेदी करून आमच्या पक्षाची पाळेमुळे नष्ट करता येणार नाहीत. 

ते जेवण फाइव्ह स्टार हॉटेलातून आणलेले

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावरही त्यांनी यावेळी प्रखर टीका केली. त्या म्हणाल्या की, अलीकडेच अमित शहा यांनी बंगालच्या ख्यातनाम लोकसंगीतकारांच्या घरी जेवण घेतले. परंतु हा केवळ देखावा होता. त्यांनी त्यावेळी घेतलेले जेवण भाजप नेत्यांनी फाइव्ह स्टार हॉटेलातून आणलेले होते.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीBJPभाजपा