शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
4
BCCI च्या मुंबईतील कार्यालयात चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या मालालवर मारला डल्ला
5
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
6
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
7
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
8
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
9
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
10
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
11
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
12
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
13
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
14
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
15
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
16
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
17
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
18
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
19
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
20
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

'जगातील कोणतीही शक्ती भारताला विकसित होण्यापासून रोखू शकत नाही'- PM मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2025 17:56 IST

PM Modi: 'तो दिवस दूर नाही जेव्हा भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट गाठेल.'

PM Modi in Viksit Bharat Young Leaders Dialogue 2025: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (12 जानेवारी 2025) स्वामी विविकेनंद यांच्या जयंतीनिमित्त भारत मंडपम येथे आयोजित विकास भारत यंग लीडर्स डायलॉग 2025 कार्यक्रमात भाग घेतला. यावेळी मोदींनी उपस्थित तरुणांना संबोधित करताना, देशातील तरुणांशी माझे मैत्रिचे नाते असल्याचे म्हटले. तसेच, देशातील युवा शक्तीच्या बळावरच भारत लवकरात लवकर विकसित होईल, असा विश्वास पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला.

'भारताला विकसित देश होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही'पीएम मोदी पुढे म्हणतात, 'आज येथे उपस्थित तरुणांशी बोलत असताना मला विकसित भारताचे चित्रही दिसत आहे. विकसित भारतात आपल्याला काय पहायचे आहे? आपल्याला कोणत्या प्रकारचा भारत बघायचा आहे? जिथे चांगली कमाई आणि चांगल्या अभ्यासाच्या अधिकाधिक संधी असतील... फक्त बोलून आपण विकास करू का?... जेव्हा प्रत्येक निर्णयाचा निकष एकच असतो, जेव्हा आपल्या प्रत्येक पावलाची दिशा विकसित भारत असते, तेव्हा जगातील कोणतीही शक्ती आपल्याला विकास करण्यापासून रोखू शकत नाही.'

'भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार''मी लाल किल्ल्यावरून 1 लाख नवीन तरुणांना राजकारणात आणण्याबाबत बोललो आहे. तुमच्या सूचना अंमलात आणण्यासाठी राजकारण हेही एक उत्तम माध्यम असू शकते. मला विश्वास आहे की, तुमच्यापैकी अनेकजण राजकारणातही उतरतील. विकसित भारताच्या या प्रवासात आपल्याला रोज नवनवीन ध्येये निश्चित करायची आहेत आणि ती साध्य करायची आहेत. तो दिवस दूर नाही जेव्हा भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट गाठेल. गेल्या 10 वर्षात देशाने 25 कोटी लोकांना रोजगार दिला आहे. आम्ही अनेकांना गरिबीतून बाहेर काढले. ज्या वेगाने आम्ही पुढे जात आहोत, तो दिवस दूर नाही जेव्हा संपूर्ण भारत गरिबीमुक्त होईल,' असंही मोदी यावेळी म्हणाले.

'भारत नियोजित वेळेपूर्वीच लक्ष्य गाठत आहे'मोदी पुढे म्हणतात, 'आज अनेक क्षेत्रांमध्ये भारत निर्धारित वेळेपूर्वीच आपले लक्ष्य गाठत आहे. तुम्हाला कोरोनाची वेळ आठवत असेल, जग लसीबद्दल चिंतेत होते, असे म्हटले जात होते की, कोरोनाची लस बनवायला वर्षे लागतील, पण भारतीय शास्त्रज्ञांनी वेळेपूर्वी पहिली लस बनवून दाखवले. 1930 च्या दशकात अमेरिका गंभीर आर्थिक संकटात अडकली होती, तेव्हा अमेरिकेच्या लोकांनी ठरवले की, आपल्याला त्यातून बाहेर पडून वेगाने पुढे जायचे आहे. त्यांनी तो मार्ग निवडला आणि अमेरिका त्या संकटातून बाहेर तर आलाच, पण विकासाचा वेगही अनेक पटींनी वाढला.'

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीdelhiदिल्लीBJPभाजपाIndiaभारत