शहरं
Join us  
Trending Stories
1
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
4
डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश  
5
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
6
हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ
7
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
8
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
9
काँग्रेसचं पुनरागमन, भाजपाचा चंचुप्रवेश आणि डाव्यांना धक्का, केरळमधील राजकीय हवा बदलतेय?
10
'या' छोट्या देशाचा चीन-भारतासारख्या बलाढ्या देशांना धोबीपछाड! फंड उभारण्यात आशियात १ नंबरला
11
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
12
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
13
तारीख ठरली, वेळ बदलली? 'या' दिवशी सुरु होणार 'बिग बॉस मराठी ६'; पाहा प्रोमो
14
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
15
खोकला, घशात खवखव; मुंबईकरांचे आरोग्य बिघडले; वातावरणातील बदलामुळे रुग्ण संख्येत मोठी वाढ
16
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
17
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
18
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
19
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
20
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
Daily Top 2Weekly Top 5

'जगातील कोणतीही शक्ती भारताला विकसित होण्यापासून रोखू शकत नाही'- PM मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2025 17:56 IST

PM Modi: 'तो दिवस दूर नाही जेव्हा भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट गाठेल.'

PM Modi in Viksit Bharat Young Leaders Dialogue 2025: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (12 जानेवारी 2025) स्वामी विविकेनंद यांच्या जयंतीनिमित्त भारत मंडपम येथे आयोजित विकास भारत यंग लीडर्स डायलॉग 2025 कार्यक्रमात भाग घेतला. यावेळी मोदींनी उपस्थित तरुणांना संबोधित करताना, देशातील तरुणांशी माझे मैत्रिचे नाते असल्याचे म्हटले. तसेच, देशातील युवा शक्तीच्या बळावरच भारत लवकरात लवकर विकसित होईल, असा विश्वास पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला.

'भारताला विकसित देश होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही'पीएम मोदी पुढे म्हणतात, 'आज येथे उपस्थित तरुणांशी बोलत असताना मला विकसित भारताचे चित्रही दिसत आहे. विकसित भारतात आपल्याला काय पहायचे आहे? आपल्याला कोणत्या प्रकारचा भारत बघायचा आहे? जिथे चांगली कमाई आणि चांगल्या अभ्यासाच्या अधिकाधिक संधी असतील... फक्त बोलून आपण विकास करू का?... जेव्हा प्रत्येक निर्णयाचा निकष एकच असतो, जेव्हा आपल्या प्रत्येक पावलाची दिशा विकसित भारत असते, तेव्हा जगातील कोणतीही शक्ती आपल्याला विकास करण्यापासून रोखू शकत नाही.'

'भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार''मी लाल किल्ल्यावरून 1 लाख नवीन तरुणांना राजकारणात आणण्याबाबत बोललो आहे. तुमच्या सूचना अंमलात आणण्यासाठी राजकारण हेही एक उत्तम माध्यम असू शकते. मला विश्वास आहे की, तुमच्यापैकी अनेकजण राजकारणातही उतरतील. विकसित भारताच्या या प्रवासात आपल्याला रोज नवनवीन ध्येये निश्चित करायची आहेत आणि ती साध्य करायची आहेत. तो दिवस दूर नाही जेव्हा भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट गाठेल. गेल्या 10 वर्षात देशाने 25 कोटी लोकांना रोजगार दिला आहे. आम्ही अनेकांना गरिबीतून बाहेर काढले. ज्या वेगाने आम्ही पुढे जात आहोत, तो दिवस दूर नाही जेव्हा संपूर्ण भारत गरिबीमुक्त होईल,' असंही मोदी यावेळी म्हणाले.

'भारत नियोजित वेळेपूर्वीच लक्ष्य गाठत आहे'मोदी पुढे म्हणतात, 'आज अनेक क्षेत्रांमध्ये भारत निर्धारित वेळेपूर्वीच आपले लक्ष्य गाठत आहे. तुम्हाला कोरोनाची वेळ आठवत असेल, जग लसीबद्दल चिंतेत होते, असे म्हटले जात होते की, कोरोनाची लस बनवायला वर्षे लागतील, पण भारतीय शास्त्रज्ञांनी वेळेपूर्वी पहिली लस बनवून दाखवले. 1930 च्या दशकात अमेरिका गंभीर आर्थिक संकटात अडकली होती, तेव्हा अमेरिकेच्या लोकांनी ठरवले की, आपल्याला त्यातून बाहेर पडून वेगाने पुढे जायचे आहे. त्यांनी तो मार्ग निवडला आणि अमेरिका त्या संकटातून बाहेर तर आलाच, पण विकासाचा वेगही अनेक पटींनी वाढला.'

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीdelhiदिल्लीBJPभाजपाIndiaभारत