शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
2
“काँग्रेसचे पाक प्रेम उतू चाललेय, ऑपरेशन सिंदूरचा हिशोब विचारणारे देशद्रोही”: एकनाथ शिंदे
3
भारतीय बाजारात उद्याच स्वस्तातली सात सीटर कार लाँच होणार; अर्टिगा, ट्रायबरला मिळणार टक्कर...
4
स्वस्त 'पर्सनल लोन'च्या शोधात आहात? 'या' ५ बँकांमध्ये मिळतोय सर्वात कमी व्याजदर; १२ लाखांचा EMI किती?
5
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
6
PM मोदी जॉर्डन-ओमान दौऱ्यावर, तर जयशंकर इजराइलमध्ये; भारताचा जगाला स्पष्ट संदेश..!
7
मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बुरखा हटवल्याने महिला डॉक्टर धक्क्यात; सरकारी नोकरी नाकारून सोडले राज्य
8
काव्या मारननं पारखलं सोनं! अनसोल्ड खेळाडूवर लावली बोली, त्यानं ४८ चेंडूत कुटल्या ७६ धावा
9
Post Office ची जबरदस्त स्कीम... घरबसल्या दर महिन्याला होईल २० हजार रुपयांची कमाई, कोणती आहे योजना, पाहा डिटेल्स
10
बुकिंग सुरू होताच 'या' कारवर तुटून पडले लोक, 24 तासांत 70000 यूनिट बूक; खिशात हवेत फक्त ₹21000
11
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
12
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
13
...अन् त्यावेळी राष्ट्रपती बनण्याचा प्रस्ताव वाजपेयींनी नाकारला; 'अटल संस्मरण' पुस्तकात दावा
14
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
15
Video - हार्ट अटॅकमुळे वेदनेने तडफडत होता पती; पत्नीने जोडले हात, पण कोणीच केली नाही मदत
16
शेतकऱ्यांसाठी मोठा अलर्ट! फार्मर आयडीशिवाय पीएम किसानचे पैसे येणार नाहीत; अशी तयार करा ID
17
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
18
BMC ELections: मुंबईत अजित पवार पडले एकटे, राष्ट्रवादीची किती जागांवर लढण्याची तयारी, बैठकीत काय झाला निर्णय? 
19
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
Daily Top 2Weekly Top 5

केरळमध्ये आता कुणीही 'अत्यंत गरीब' नाही, मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 12:20 IST

राज्य सरकारने 2021 मध्ये सुरू केलेल्या ‘अत्यंत गरिबी निर्मूलन प्रोजेक्ट’ अंतर्गत 64,006 कुटुंब, अत्यंत गरीब म्हणून चिन्हांकीत केले होते. या चार वर्षांच्या योजनंतर्तगत या कुटुंबांना निवास, अन्न, आरोग्य आणि उपजीविकेशी संबंधित मदत पुरविण्यात आली.

शिक्षण क्षेत्राच्या बाबतीत तर केरळची चर्चा होतेच. मात्र आता गरिबी निर्मूलनाच्या प्रयत्नांच्या बाबतीतही या राज्याने देशाचे लक्ष वेधले आहे. मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी शनिवारी राज्य विधानसभेत घोषणा केली की, केरळने ‘अत्यंत गरिबी’ (Extreme Poverty) पूर्णपणे संपवली आहे. महत्वाचे म्हणजे, असा पराक्रम करणारे केरळ हे देशातील पहिले राज्य आहे, असा दावाही वाम लोकशाही आघाडी (एलडीएफ) सरकारने केला आहे. राज्याच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित विशेष अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी हा दावा केला आहे.

राज्य सरकारने 2021 मध्ये सुरू केलेल्या ‘अत्यंत गरिबी निर्मूलन प्रोजेक्ट’ अंतर्गत 64,006 कुटुंब, अत्यंत गरीब म्हणून चिन्हांकीत केले होते. या चार वर्षांच्या योजनंतर्तगत या कुटुंबांना निवास, अन्न, आरोग्य आणि उपजीविकेशी संबंधित मदत पुरविण्यात आली.

स्थानिक स्वराज्य मंत्री एम. बी. राजेश यांनी दिलेल्या माहितीनुसार, नीति आयोगाच्या अध्ययनानुसार, केरळचा गरिबी दर देशातील सर्वात कमी म्हणजे 0.7 टक्के आहे. सर्वेक्षणात आम्हाला 64,006 कुटुंबांतील 1,03,099 व्यक्ती अत्यंत गरीब असल्याचे आढळले आणि त्यांना विविध योजनांशी जोडण्यात आले.

दरम्यान, काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटने (यूडीएफ) ने सरकारचा हा दावा “पूर्णपणे फसवणूक” करणारा असल्याचे म्हणत, विधानसभेतून वॉकआउट केले. तसेच, विरोधी पक्षनेते व्ही. डी. सतीशन यांनी मुख्यमंत्र्यांचे हे विधान संसदीय नियमांचे उल्लंघन असल्याचा आरोप केला आहे.

यावर प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री विजयन म्हणाले, “यूडीएफ जेव्हा फसवणुकीसंदर्भात बोलते, तेव्हा ते स्वतःच्या वर्तनाचा उल्लेख करत असतात. आम्ही जे सांगितले होते, ते करून दाखवले आहे.” 

English
हिंदी सारांश
Web Title : Kerala claims eradication of extreme poverty, a first in India.

Web Summary : Kerala's CM Vijayan declared the state free of extreme poverty, a national first. Aided by a state project, 64,006 families received support for housing, food, healthcare, and livelihood. The opposition disputes the claim, alleging deception, while the government stands by its achievement.
टॅग्स :KeralaकेरळChief Ministerमुख्यमंत्रीcongressकाँग्रेस