शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत नव्या वर्षाचं सेलिब्रेशन करणार नाही; शेतकरी आक्रमक

By मोरेश्वर येरम | Updated: December 31, 2020 21:41 IST

नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे महिन्याभराहून अधिक काळापासून आंदोलन सुरू आहे.

ठळक मुद्देशेतकरी आंदोलन आणखी आक्रमकमागण्या मान्य होत नाहीत तोवर नववर्षाचं सेलिब्रेशन नाहीकृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर आंदोलक शेतकरी ठाम

नवी दिल्ली

केंद्र सरकार जोवर कृषी कायदे रद्द करुन आमच्या मागण्या मान्य करत नाही, तोपर्यंत नववर्षाचं सेलिब्रेशन करणार नाही, असा पवित्रा दिल्लीच्या सिंघू सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी घेतला आहे. 

नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे महिन्याभराहून अधिक काळापासून आंदोलन सुरू आहे. सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये आतापर्यंत झालेल्या सर्व चर्चा देखील निष्फळ ठरल्या आहेत. दिल्लीच्या सिंघू सीमेवर २५ नोव्हेंबरपासून शेतकरी आंदोलनाचं व्यवस्थापन पाहणाऱ्या हरजिंदर सिंग यांनी सरकारचा कडक शब्दांत निषेध व्यक्त केला. "जोपर्यंत सरकार आमच्या मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत आमच्यासाठी नवं वर्ष नसेल", असं हरजिंदर म्हणाले. 

केंद्र सरकार आणि शेतकरी आंदोलकांच्या प्रतिनिधींमध्ये बुधवारी झालेल्या शेवटच्या चर्चेत सरकारने वाढते वीजदर आणि पेंढा जाळल्याबद्दल दंड आकारण्यात आल्याच्या मुद्द्याकडे लक्ष वेधून शेतकऱ्यांच्या समस्येकडे लक्ष दिले. पण सरकारनं असं चिंता व्यक्त करणं म्हणजे सेलिब्रेट करण्यासारखी घटना नसल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. 

"होय, आमचे कुटुंबिय आमची वाट पाहातायत. त्यांची आठवण आम्हाला येते. पण इथं हे आंदोलन करत असलेले शेतकरी बांधव देखील आमचं कुटुंबच आहे", असं हरजिंदर म्हणाले.  

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपFarmerशेतकरी