शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
3
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
4
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
5
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
6
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
7
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
8
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
9
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
10
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
11
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
12
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
13
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
14
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
15
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
16
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
17
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
18
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
19
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
20
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी

मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत नव्या वर्षाचं सेलिब्रेशन करणार नाही; शेतकरी आक्रमक

By मोरेश्वर येरम | Updated: December 31, 2020 21:41 IST

नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे महिन्याभराहून अधिक काळापासून आंदोलन सुरू आहे.

ठळक मुद्देशेतकरी आंदोलन आणखी आक्रमकमागण्या मान्य होत नाहीत तोवर नववर्षाचं सेलिब्रेशन नाहीकृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर आंदोलक शेतकरी ठाम

नवी दिल्ली

केंद्र सरकार जोवर कृषी कायदे रद्द करुन आमच्या मागण्या मान्य करत नाही, तोपर्यंत नववर्षाचं सेलिब्रेशन करणार नाही, असा पवित्रा दिल्लीच्या सिंघू सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी घेतला आहे. 

नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे महिन्याभराहून अधिक काळापासून आंदोलन सुरू आहे. सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये आतापर्यंत झालेल्या सर्व चर्चा देखील निष्फळ ठरल्या आहेत. दिल्लीच्या सिंघू सीमेवर २५ नोव्हेंबरपासून शेतकरी आंदोलनाचं व्यवस्थापन पाहणाऱ्या हरजिंदर सिंग यांनी सरकारचा कडक शब्दांत निषेध व्यक्त केला. "जोपर्यंत सरकार आमच्या मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत आमच्यासाठी नवं वर्ष नसेल", असं हरजिंदर म्हणाले. 

केंद्र सरकार आणि शेतकरी आंदोलकांच्या प्रतिनिधींमध्ये बुधवारी झालेल्या शेवटच्या चर्चेत सरकारने वाढते वीजदर आणि पेंढा जाळल्याबद्दल दंड आकारण्यात आल्याच्या मुद्द्याकडे लक्ष वेधून शेतकऱ्यांच्या समस्येकडे लक्ष दिले. पण सरकारनं असं चिंता व्यक्त करणं म्हणजे सेलिब्रेट करण्यासारखी घटना नसल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. 

"होय, आमचे कुटुंबिय आमची वाट पाहातायत. त्यांची आठवण आम्हाला येते. पण इथं हे आंदोलन करत असलेले शेतकरी बांधव देखील आमचं कुटुंबच आहे", असं हरजिंदर म्हणाले.  

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपFarmerशेतकरी