शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

"गुन्हेगारांसारखे वागू नका, कायद्याच्या कक्षेत राहून काम करा"; सुप्रीम कोर्टाने ईडीला फटकारले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 14:48 IST

पीएमएलए अंतर्गत चौकशी करताना ईडीने गुन्हेगारांसारखे वागू नये, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे.

Supreme Court on ED: सुप्रीम कोर्टाने गुरुवारी अंमलबजावणी संचालनालयाला चांगलेच फटकारले. मनी लाँडरिंग कायद्याअंतर्गत चौकशी करताना ईडीने गुन्हेगारांसारखे वागू नये आणि कायद्याच्या कक्षेत राहून काम करावे, अशा शब्दात सुप्रीम कोर्टाने तपास यंत्रणेला सुनावलं. २०२२ मध्ये सुप्रीम कोर्टाने आपल्या एका निकालात मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत अटक, शोध आणि जप्तीचे ईडीचे अधिकार कायम ठेवले होते. या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची मागणी करणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आल्या. त्यावर सुनावणी घेताना कोर्टाने ईडीवर ताशेरे ओढले आहेत.

न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती उज्जल भुईयान आणि न्यायमूर्ती एन कोटीश्वर सिंह यांच्या खंडपीठाने या याचिकांवर सुनावणी केली. या दरम्यान, ईडीच्या वतीने उपस्थित असलेले अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एसव्ही राजू यांनी, या याचिका विचारात घेण्यासारख्या नाहीत असं म्हटलं. या गुन्हेगारांकडे भरपूर संसाधने आहेत,  तपास अधिकाऱ्यांकडे तेवढी संसाधने नाहीत. या याचिकांद्वारे तपासाला विलंब करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा युक्तिवाद एसव्ही राजू यांनी केला.

यानंतर सुप्रीम कोर्टाने ईडीला कडक शब्दात झापले. "तुम्ही बदमाशासारखे वागू शकत नाही. तुम्हाला कायद्याच्या कक्षेत राहून काम करावे लागेल. कायदा अंमलात आणणे आणि कायदा मोडणे यात फरक आहे. मी न्यायालयीन प्रक्रियेत पाहिले की तुम्ही जवळजवळ ५,००० पेक्षा अधिक 'एनफोर्समेंट केस इन्फॉर्मेशन रिपोर्ट्स' दाखल केले आहेत. २०१५ ते २०२५ पर्यंत शिक्षा होण्याचे प्रमाण १० टक्क्यांपेक्षा कमी आहे. म्हणून आम्ही तुम्हाला तुमच्या तपास प्रक्रियेत सुधारणा करण्याचा, तुमच्या साक्षीदारांची गुणवत्ता सुधारण्याचा आग्रह करत आहोत. आम्ही लोकांच्या स्वातंत्र्याबद्दल बोलत आहोत. आम्हाला ईडीच्या प्रतिमेबद्दलही चिंता आहे. ५ ते ६ वर्षांच्या न्यायालयीन कोठडीनंतर, जर लोक निर्दोष सुटले तर त्यांचा खर्च कोण देणार?" असा सवाल न्यायमूर्ती उज्जल भुईयान यांनी केला.

दरम्यान, एसव्ही राजू यांनी दावा केला की पीएमएलए प्रकरणांमध्ये निर्दोष सुटणाऱ्यांची संख्या खूपच कमी आहे. त्यांनी असा युक्तिवाद केला की या प्रकरणांची सुनावणी उशिरा होते कारण प्रभावशाली आरोपी अनेक वकिलांद्वारे एकामागून एक अनेक अर्ज दाखल करतात. यामुळे कार्यवाही लांबते. कारणांमुळे तपास अधिकारी देखील अडचणीत आहेत असंही एसव्ही राजू म्हणाले. गेल्या वर्षी दुसऱ्या एका प्रकरणाची सुनावणी करताना, न्यायमूर्ती भुईयान यांनी असे निदर्शनास आणून दिले होते की दहा वर्षांत, पीएमएलए अंतर्गत नोंदवलेल्या ५,००० प्रकरणांमध्ये केवळ ४० प्रकरणांमध्ये शिक्षा झाली आहे. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयCourtन्यायालय