शहरं
Join us  
Trending Stories
1
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
2
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
3
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
4
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
5
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
6
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
7
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
8
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
9
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
10
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
11
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
12
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
13
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
14
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
15
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
16
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
17
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!
18
प्राजक्ता माळीने वाढदिवशी घेतलं भीमाशंकरचं दर्शन; म्हणाली, "१२ ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण..."
19
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
20
BCCI: बीसीसीआय नव्या प्रशिक्षकाच्या शोधात, अर्जही मागवले! जाणून घ्या पात्रता

"गुन्हेगारांसारखे वागू नका, कायद्याच्या कक्षेत राहून काम करा"; सुप्रीम कोर्टाने ईडीला फटकारले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 14:48 IST

पीएमएलए अंतर्गत चौकशी करताना ईडीने गुन्हेगारांसारखे वागू नये, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे.

Supreme Court on ED: सुप्रीम कोर्टाने गुरुवारी अंमलबजावणी संचालनालयाला चांगलेच फटकारले. मनी लाँडरिंग कायद्याअंतर्गत चौकशी करताना ईडीने गुन्हेगारांसारखे वागू नये आणि कायद्याच्या कक्षेत राहून काम करावे, अशा शब्दात सुप्रीम कोर्टाने तपास यंत्रणेला सुनावलं. २०२२ मध्ये सुप्रीम कोर्टाने आपल्या एका निकालात मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत अटक, शोध आणि जप्तीचे ईडीचे अधिकार कायम ठेवले होते. या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची मागणी करणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आल्या. त्यावर सुनावणी घेताना कोर्टाने ईडीवर ताशेरे ओढले आहेत.

न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती उज्जल भुईयान आणि न्यायमूर्ती एन कोटीश्वर सिंह यांच्या खंडपीठाने या याचिकांवर सुनावणी केली. या दरम्यान, ईडीच्या वतीने उपस्थित असलेले अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एसव्ही राजू यांनी, या याचिका विचारात घेण्यासारख्या नाहीत असं म्हटलं. या गुन्हेगारांकडे भरपूर संसाधने आहेत,  तपास अधिकाऱ्यांकडे तेवढी संसाधने नाहीत. या याचिकांद्वारे तपासाला विलंब करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा युक्तिवाद एसव्ही राजू यांनी केला.

यानंतर सुप्रीम कोर्टाने ईडीला कडक शब्दात झापले. "तुम्ही बदमाशासारखे वागू शकत नाही. तुम्हाला कायद्याच्या कक्षेत राहून काम करावे लागेल. कायदा अंमलात आणणे आणि कायदा मोडणे यात फरक आहे. मी न्यायालयीन प्रक्रियेत पाहिले की तुम्ही जवळजवळ ५,००० पेक्षा अधिक 'एनफोर्समेंट केस इन्फॉर्मेशन रिपोर्ट्स' दाखल केले आहेत. २०१५ ते २०२५ पर्यंत शिक्षा होण्याचे प्रमाण १० टक्क्यांपेक्षा कमी आहे. म्हणून आम्ही तुम्हाला तुमच्या तपास प्रक्रियेत सुधारणा करण्याचा, तुमच्या साक्षीदारांची गुणवत्ता सुधारण्याचा आग्रह करत आहोत. आम्ही लोकांच्या स्वातंत्र्याबद्दल बोलत आहोत. आम्हाला ईडीच्या प्रतिमेबद्दलही चिंता आहे. ५ ते ६ वर्षांच्या न्यायालयीन कोठडीनंतर, जर लोक निर्दोष सुटले तर त्यांचा खर्च कोण देणार?" असा सवाल न्यायमूर्ती उज्जल भुईयान यांनी केला.

दरम्यान, एसव्ही राजू यांनी दावा केला की पीएमएलए प्रकरणांमध्ये निर्दोष सुटणाऱ्यांची संख्या खूपच कमी आहे. त्यांनी असा युक्तिवाद केला की या प्रकरणांची सुनावणी उशिरा होते कारण प्रभावशाली आरोपी अनेक वकिलांद्वारे एकामागून एक अनेक अर्ज दाखल करतात. यामुळे कार्यवाही लांबते. कारणांमुळे तपास अधिकारी देखील अडचणीत आहेत असंही एसव्ही राजू म्हणाले. गेल्या वर्षी दुसऱ्या एका प्रकरणाची सुनावणी करताना, न्यायमूर्ती भुईयान यांनी असे निदर्शनास आणून दिले होते की दहा वर्षांत, पीएमएलए अंतर्गत नोंदवलेल्या ५,००० प्रकरणांमध्ये केवळ ४० प्रकरणांमध्ये शिक्षा झाली आहे. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयCourtन्यायालय