शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
2
लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा
3
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
4
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
5
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
7
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
8
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
9
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
10
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
11
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
12
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
13
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
14
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
15
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
16
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
17
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
18
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
19
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
20
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास

बिहार मंत्रिमंडळ: स्वातंत्र्यानंतर 'हे' असं पहिल्यांदाच घडलं

By मोरेश्वर येरम | Updated: November 18, 2020 15:54 IST

सरकारमध्ये एकही मुस्लिम आमदार नसल्याचे समोर आले आहे. स्वातंत्र्योत्तर काळात आतापर्यंत पहिल्यांदाच अशी घटना घडली आहे. विशेष म्हणजे बिहारमध्ये एकूण लोकसंख्येमध्ये १६ टक्क्यांहून अधिक मुस्लिम जनता आहे. 

ठळक मुद्देनितीश कुमारांच्या मंत्रिमंडळात एकही मुस्लिम मंत्री नाहीस्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच बिहारच्या मंत्रिमंडळात मुस्लिम चेहरा नाहीएनडीएकडून यावेळी एकही मुस्लिम आमदार निवडून आला नाही

पाटणानितीश कुमार सरकारच्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर झाले. पण मंत्रिमंडळात एकही मुस्लिम आमदाराला स्थान मिळालेले नाही. इतकंच नव्हे तर बिहारमध्ये सत्ता स्थापन केलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) एकही मुस्लिम आमदार नाही.  बिहारमध्ये भाजप, जदयू, हिंदूस्तान आवाम मोर्चा (सेक्यूलर) आणि विकासशील इन्सान पार्टी या पक्षांचा समावेश असलेल्या एनडीएने बहुमताच्या जोरावर सत्ता स्थापन केली आहे. पण या सरकारमध्ये एकही मुस्लिम आमदार नसल्याचे समोर आले आहे. स्वातंत्र्योत्तर काळात आतापर्यंत पहिल्यांदाच अशी घटना घडली आहे. विशेष म्हणजे बिहारमध्ये एकूण लोकसंख्येमध्ये १६ टक्क्यांहून अधिक मुस्लिम जनता आहे. 

मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या 'जदयू'कडून यावेळीच्या निवडणुकीत एकूण ११ मुस्लिम उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. पण ते सर्व उमेदवार पराभूत झाले आहेत. कॅबिनेट मंत्र्यांच्या शपथविधीवेळी नितीश कुमार यांना एका मुस्लिम उमेदवाराला मंत्रिमंडळात स्थान देण्याची संधी होती. त्यानंतर विधान परिषदेवर त्या उमेदवाराला निवडून आणता आलं असतं. पण तशीही भूमिका नितीश कुमार यांनी घेतली नाही. 

राज्यपाल फागू चौहान यांनी नितीश कुमार यांच्यासह एकूण १५ मंत्र्यांना पद आणि गोपनियतीची शपथ दिली. यातील चार मंत्री हे उच्चवर्णीय, चार मागास जातींचे प्रतिनिधित्व करणारे आहेत. तर तीन अत्यंत मागासवर्गीय आणि तीन अनुसूचित जातींचे प्रतिनिधित्व करणारे आहेत. 

घटनात्मक तरतुदीनुसार बिहार मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांसह जास्तीत जास्त ३६ सदस्यांची मंत्रीपदी नियुक्ती करता येऊ शकते. नितीश यांच्या मंत्रिमंडळात अजूनही २१ जणांची जागा शिल्लक आहे. त्यामुळे येत्या काळात नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळात मुस्लिम समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्याला स्थान दिलं जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

बिहारच्या निवडणूक निकालात सत्ताधारी एनडीएने १२५ जागांवर यश मिळवत सत्तास्थापनेचा दावा केला. तर महागठबंधनला ११० जागांवर समाधान मानावे लागले. विशेष म्हणजे महागठबंधनमध्ये 'राजद'ला सर्वाधिक ७५ जागांवर यश मिळालं आहे. तर भाजप ७४ जागांसह दुसऱ्या स्थानावर आहे. जदयूला ४३ जागा मिळाल्या, तर काँग्रेसच्या पदरात १९ जागांवर यश मिळालं आहे.

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकNitish Kumarनितीश कुमारPoliticsराजकारण