शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

बिहार मंत्रिमंडळ: स्वातंत्र्यानंतर 'हे' असं पहिल्यांदाच घडलं

By मोरेश्वर येरम | Updated: November 18, 2020 15:54 IST

सरकारमध्ये एकही मुस्लिम आमदार नसल्याचे समोर आले आहे. स्वातंत्र्योत्तर काळात आतापर्यंत पहिल्यांदाच अशी घटना घडली आहे. विशेष म्हणजे बिहारमध्ये एकूण लोकसंख्येमध्ये १६ टक्क्यांहून अधिक मुस्लिम जनता आहे. 

ठळक मुद्देनितीश कुमारांच्या मंत्रिमंडळात एकही मुस्लिम मंत्री नाहीस्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच बिहारच्या मंत्रिमंडळात मुस्लिम चेहरा नाहीएनडीएकडून यावेळी एकही मुस्लिम आमदार निवडून आला नाही

पाटणानितीश कुमार सरकारच्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर झाले. पण मंत्रिमंडळात एकही मुस्लिम आमदाराला स्थान मिळालेले नाही. इतकंच नव्हे तर बिहारमध्ये सत्ता स्थापन केलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) एकही मुस्लिम आमदार नाही.  बिहारमध्ये भाजप, जदयू, हिंदूस्तान आवाम मोर्चा (सेक्यूलर) आणि विकासशील इन्सान पार्टी या पक्षांचा समावेश असलेल्या एनडीएने बहुमताच्या जोरावर सत्ता स्थापन केली आहे. पण या सरकारमध्ये एकही मुस्लिम आमदार नसल्याचे समोर आले आहे. स्वातंत्र्योत्तर काळात आतापर्यंत पहिल्यांदाच अशी घटना घडली आहे. विशेष म्हणजे बिहारमध्ये एकूण लोकसंख्येमध्ये १६ टक्क्यांहून अधिक मुस्लिम जनता आहे. 

मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या 'जदयू'कडून यावेळीच्या निवडणुकीत एकूण ११ मुस्लिम उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. पण ते सर्व उमेदवार पराभूत झाले आहेत. कॅबिनेट मंत्र्यांच्या शपथविधीवेळी नितीश कुमार यांना एका मुस्लिम उमेदवाराला मंत्रिमंडळात स्थान देण्याची संधी होती. त्यानंतर विधान परिषदेवर त्या उमेदवाराला निवडून आणता आलं असतं. पण तशीही भूमिका नितीश कुमार यांनी घेतली नाही. 

राज्यपाल फागू चौहान यांनी नितीश कुमार यांच्यासह एकूण १५ मंत्र्यांना पद आणि गोपनियतीची शपथ दिली. यातील चार मंत्री हे उच्चवर्णीय, चार मागास जातींचे प्रतिनिधित्व करणारे आहेत. तर तीन अत्यंत मागासवर्गीय आणि तीन अनुसूचित जातींचे प्रतिनिधित्व करणारे आहेत. 

घटनात्मक तरतुदीनुसार बिहार मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांसह जास्तीत जास्त ३६ सदस्यांची मंत्रीपदी नियुक्ती करता येऊ शकते. नितीश यांच्या मंत्रिमंडळात अजूनही २१ जणांची जागा शिल्लक आहे. त्यामुळे येत्या काळात नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळात मुस्लिम समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्याला स्थान दिलं जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

बिहारच्या निवडणूक निकालात सत्ताधारी एनडीएने १२५ जागांवर यश मिळवत सत्तास्थापनेचा दावा केला. तर महागठबंधनला ११० जागांवर समाधान मानावे लागले. विशेष म्हणजे महागठबंधनमध्ये 'राजद'ला सर्वाधिक ७५ जागांवर यश मिळालं आहे. तर भाजप ७४ जागांसह दुसऱ्या स्थानावर आहे. जदयूला ४३ जागा मिळाल्या, तर काँग्रेसच्या पदरात १९ जागांवर यश मिळालं आहे.

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकNitish Kumarनितीश कुमारPoliticsराजकारण