शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

कलम 370 हटवल्यानंतर कलम 371बाबत अमित शाहांचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2020 21:35 IST

'गेल्या सहा वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि येथील पेमा खांडू यांच्या नेतृत्वात विकासाची कामे वेगाने सुरू आहेत. '

ठळक मुद्दे'पूर्वोत्तर भारतासाठी नेहमीच जास्त महत्वाचा राहिला आहे''आजच्या दिवशीच 33 वर्षापूर्वी अरूणाचल राज्याची स्थापना झाली होती.''पूर्वोत्तर बंडखोर, सीमेवरील आंतरराज्यीय संघर्ष यांसारख्या समस्यांपासून मुक्त होईल'

नवी दिल्ली : केद्रीय गृहमंत्री अमित शाह अरुणाचल प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी जनसमुदायाला संबोधित करताना अमित शाह यांनी कलम 371 बाबत मोठे विधान केले. कलम 370 हटविल्यानंतर कलम 371 सुद्धा हटविले जाईल, असा संभ्रम पसरविला जात आहे. मात्र, तसे कधीच होणार नाही, असे अमित शाह यांनी यावेळी म्हटले. 

आजच्या दिवशीच 33 वर्षापूर्वी अरूणाचल राज्याची स्थापना झाली होती. मला आनंद आहे की, गेल्या सहा वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि येथील पेमा खांडू यांच्या नेतृत्वात विकासाची कामे वेगाने सुरू आहेत. पूर्वोत्तर भारतासाठी नेहमीच जास्त महत्वाचा राहिला आहे, या दुर्गम भागात स्थायिक झालेले आदिवासी भारतीय संस्कृतीसाठी एका श्रृंगारापेक्षा कमी नाहीत, असे अमित शाह यांनी सांगितले.

याचबरोबर, भारताची संस्कृती ही पूर्वोत्तरच्या संस्कृतीशिवाय अपूर्णच नाही तर अपंगही आहे. ऑगस्टमध्ये जेव्हा कलम 370 हटविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यावेळी अफवा आणि गैरसमज सुद्धा याठिकाणी पसरविण्यात आल्या की कलम 371 सुद्धा हटविले जाईल. मात्र, येथील संपूर्ण पूर्वोतर भागातील लोकांना सांगू इच्छितो की, कोणीही कलम 371 काढू शकत नाही किंवा ते काढण्याचा कोणताही हेतू नाही, असे अमित शाह म्हणाले. 

पूर्वोत्तर क्षेत्र 2014 पूर्वी फक्त भारताच्या काही भागांशी भौगोलिकदृष्ट्या जोडलेला होता. मात्र, खरंतर मोदी सरकारच्या काळात सर्वत्र जोडला असल्याचे अमित शाह यांनी सांगितले. याशिवाय, पूर्वोत्तर भागात बंडखोर, सीमेवरील आंतरराज्यीय संघर्ष यांसारख्या समस्यांपासून मुक्त व्हावा, असे मोदी सरकारला वाटते. त्यामुळे 2024 च्या निवडणुकीपूर्वी पूर्वोत्तर बंडखोर, सीमेवरील आंतरराज्यीय संघर्ष यांसारख्या समस्यांपासून मुक्त होईल, असेही अमित शाह यांनी यावेळी म्हटले. 

टॅग्स :Amit Shahअमित शहाArunachal Pradeshअरुणाचल प्रदेश