शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

कलम 370 हटवल्यानंतर कलम 371बाबत अमित शाहांचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2020 21:35 IST

'गेल्या सहा वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि येथील पेमा खांडू यांच्या नेतृत्वात विकासाची कामे वेगाने सुरू आहेत. '

ठळक मुद्दे'पूर्वोत्तर भारतासाठी नेहमीच जास्त महत्वाचा राहिला आहे''आजच्या दिवशीच 33 वर्षापूर्वी अरूणाचल राज्याची स्थापना झाली होती.''पूर्वोत्तर बंडखोर, सीमेवरील आंतरराज्यीय संघर्ष यांसारख्या समस्यांपासून मुक्त होईल'

नवी दिल्ली : केद्रीय गृहमंत्री अमित शाह अरुणाचल प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी जनसमुदायाला संबोधित करताना अमित शाह यांनी कलम 371 बाबत मोठे विधान केले. कलम 370 हटविल्यानंतर कलम 371 सुद्धा हटविले जाईल, असा संभ्रम पसरविला जात आहे. मात्र, तसे कधीच होणार नाही, असे अमित शाह यांनी यावेळी म्हटले. 

आजच्या दिवशीच 33 वर्षापूर्वी अरूणाचल राज्याची स्थापना झाली होती. मला आनंद आहे की, गेल्या सहा वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि येथील पेमा खांडू यांच्या नेतृत्वात विकासाची कामे वेगाने सुरू आहेत. पूर्वोत्तर भारतासाठी नेहमीच जास्त महत्वाचा राहिला आहे, या दुर्गम भागात स्थायिक झालेले आदिवासी भारतीय संस्कृतीसाठी एका श्रृंगारापेक्षा कमी नाहीत, असे अमित शाह यांनी सांगितले.

याचबरोबर, भारताची संस्कृती ही पूर्वोत्तरच्या संस्कृतीशिवाय अपूर्णच नाही तर अपंगही आहे. ऑगस्टमध्ये जेव्हा कलम 370 हटविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यावेळी अफवा आणि गैरसमज सुद्धा याठिकाणी पसरविण्यात आल्या की कलम 371 सुद्धा हटविले जाईल. मात्र, येथील संपूर्ण पूर्वोतर भागातील लोकांना सांगू इच्छितो की, कोणीही कलम 371 काढू शकत नाही किंवा ते काढण्याचा कोणताही हेतू नाही, असे अमित शाह म्हणाले. 

पूर्वोत्तर क्षेत्र 2014 पूर्वी फक्त भारताच्या काही भागांशी भौगोलिकदृष्ट्या जोडलेला होता. मात्र, खरंतर मोदी सरकारच्या काळात सर्वत्र जोडला असल्याचे अमित शाह यांनी सांगितले. याशिवाय, पूर्वोत्तर भागात बंडखोर, सीमेवरील आंतरराज्यीय संघर्ष यांसारख्या समस्यांपासून मुक्त व्हावा, असे मोदी सरकारला वाटते. त्यामुळे 2024 च्या निवडणुकीपूर्वी पूर्वोत्तर बंडखोर, सीमेवरील आंतरराज्यीय संघर्ष यांसारख्या समस्यांपासून मुक्त होईल, असेही अमित शाह यांनी यावेळी म्हटले. 

टॅग्स :Amit Shahअमित शहाArunachal Pradeshअरुणाचल प्रदेश