शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
4
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
5
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
6
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
7
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
8
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
9
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
10
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
11
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
12
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
13
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
14
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
15
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
16
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

कलम 370 हटवल्यानंतर कलम 371बाबत अमित शाहांचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2020 21:35 IST

'गेल्या सहा वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि येथील पेमा खांडू यांच्या नेतृत्वात विकासाची कामे वेगाने सुरू आहेत. '

ठळक मुद्दे'पूर्वोत्तर भारतासाठी नेहमीच जास्त महत्वाचा राहिला आहे''आजच्या दिवशीच 33 वर्षापूर्वी अरूणाचल राज्याची स्थापना झाली होती.''पूर्वोत्तर बंडखोर, सीमेवरील आंतरराज्यीय संघर्ष यांसारख्या समस्यांपासून मुक्त होईल'

नवी दिल्ली : केद्रीय गृहमंत्री अमित शाह अरुणाचल प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी जनसमुदायाला संबोधित करताना अमित शाह यांनी कलम 371 बाबत मोठे विधान केले. कलम 370 हटविल्यानंतर कलम 371 सुद्धा हटविले जाईल, असा संभ्रम पसरविला जात आहे. मात्र, तसे कधीच होणार नाही, असे अमित शाह यांनी यावेळी म्हटले. 

आजच्या दिवशीच 33 वर्षापूर्वी अरूणाचल राज्याची स्थापना झाली होती. मला आनंद आहे की, गेल्या सहा वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि येथील पेमा खांडू यांच्या नेतृत्वात विकासाची कामे वेगाने सुरू आहेत. पूर्वोत्तर भारतासाठी नेहमीच जास्त महत्वाचा राहिला आहे, या दुर्गम भागात स्थायिक झालेले आदिवासी भारतीय संस्कृतीसाठी एका श्रृंगारापेक्षा कमी नाहीत, असे अमित शाह यांनी सांगितले.

याचबरोबर, भारताची संस्कृती ही पूर्वोत्तरच्या संस्कृतीशिवाय अपूर्णच नाही तर अपंगही आहे. ऑगस्टमध्ये जेव्हा कलम 370 हटविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यावेळी अफवा आणि गैरसमज सुद्धा याठिकाणी पसरविण्यात आल्या की कलम 371 सुद्धा हटविले जाईल. मात्र, येथील संपूर्ण पूर्वोतर भागातील लोकांना सांगू इच्छितो की, कोणीही कलम 371 काढू शकत नाही किंवा ते काढण्याचा कोणताही हेतू नाही, असे अमित शाह म्हणाले. 

पूर्वोत्तर क्षेत्र 2014 पूर्वी फक्त भारताच्या काही भागांशी भौगोलिकदृष्ट्या जोडलेला होता. मात्र, खरंतर मोदी सरकारच्या काळात सर्वत्र जोडला असल्याचे अमित शाह यांनी सांगितले. याशिवाय, पूर्वोत्तर भागात बंडखोर, सीमेवरील आंतरराज्यीय संघर्ष यांसारख्या समस्यांपासून मुक्त व्हावा, असे मोदी सरकारला वाटते. त्यामुळे 2024 च्या निवडणुकीपूर्वी पूर्वोत्तर बंडखोर, सीमेवरील आंतरराज्यीय संघर्ष यांसारख्या समस्यांपासून मुक्त होईल, असेही अमित शाह यांनी यावेळी म्हटले. 

टॅग्स :Amit Shahअमित शहाArunachal Pradeshअरुणाचल प्रदेश