शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuwanshi: सोनमच्या हातात काठी, पाठीमागे चालतोय राजा; हत्येपूर्वी युट्यूबरच्या व्हिडीओत झाले कैद
2
मुंबई मेट्रो- १ मार्गिकेवर तांत्रिक बिघाड, वर्सोवाकडे जाणारी वाहतूक रखडली, प्रवाशांचे हाल
3
इराणने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात हैफा बंदराचं मोठं नुकसान? अदानी समुहानं दिली अशी माहिती   
4
Census 2027 : केंद्र सरकारकडून जनगणनेची अधिसूचना जारी! ३५ लाखांहून अधिक कर्मचारी काम करणार, अ‍ॅपचा वापर होणार
5
इराणने थेट अमेरिकन दूतावासावर डागली मिसाइल्स, इस्रायलची राजधानी तेल अवीवमध्ये घबराट
6
'अनेक वेळा लोक अशा गोष्टींकडे लक्ष देत नाहीत', कुंडमळ घटनेबद्दल CM फडणवीसांनी मांडली भूमिका
7
G20 च्या पडद्यामागील हिरो अमिताभ कांत यांचा राजीनामा! ४५ वर्षांच्या सेवेला का दिली पूर्ण विराम?
8
संजय कपूर यांचा शेवटचा फोटो समोर, कॅप्टनसोबत हसताना दिसले; पोलो खेळतानाच गेला जीव
9
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात बिघाड; फ्लाईटने हवेतून यु-टर्न घेतला, हाँगकाँगला गेले
10
"इराणने मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला, बेडरूमवर डागलं क्षेपणास्त्र’’, इस्राइलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी केला दावा   
11
टाटा मोटर्सचे शेअर्स ५% ने घसरले, जर तुम्हीही गुंतवणूक केली असेल तर 'ही' महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या
12
Monsoon Picnic: सध्या पावसाळी सहलीला जाताना जरा सांभाळूनच; वाचा 'ही' मार्मिक कथा!
13
Kedarnath Helicopter Crash:'हेलिकॉप्टर थोडे वळले, मागे गेले आणि मग...', केदारनाथ हेलिकॉप्टर अपघाताचे खरे कारण समोर आले
14
अमृता सुभाष अन् अनिता दातेच्या 'जारण'ची वाढती लोकप्रियता, १० दिवसातली कमाई किती?
15
Air India Plane Crash: ९२ जणांचे DNA नमुने जुळले, पण ८७ जणांचीच पटली ओळख; कारण...
16
संजय कपूरच्या निधनानंतर करिश्माला बसणार मोठा फटका! दर महिन्याला मिळणारी रक्कम होणार बंद?
17
'पाकिस्तान इस्रायलवर अणु बॉम्ब टाकेल', इराणी अधिकाऱ्याच्या दाव्यानंतर पाक स्पष्टच बोलला!
18
Govandi Accident: ‘मुझे अब पापा कौन कहेंगे?’ गोवंडी अपघातात मुलांना गमावलेल्या वडिलांनी फोडला टाहो!
19
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
20
Lufthansa Hyderabad Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?

नोटाबंदीच्या निर्णयाचा एकही उद्देश सफल झाला नाही; पी. चिदंबरम यांची मोदींवर सडकून टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2017 17:58 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाचा एकही उद्देश सफल झाला नाही, अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी.चिंदबरम यांनी केली आहे.

ठळक मुद्दे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाचा एकही उद्देश सफल झाला नाही, अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी.चिंदबरम यांनी केली आहे. बनावट चलनी नोटा, दहशतवाद, देशातील काळ पैसा रोखणं यापैकी नोटाबंदीचा एकही उद्देश सफल झाला नसल्याचं पी. चिदंबरम यांनी म्हंटलं आहे.

मुंबई, दि. 9- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाचा एकही उद्देश सफल झाला नाही, अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी.चिंदबरम यांनी केली आहे. बनावट चलनी नोटा, दहशतवाद, देशातील काळ पैसा रोखणं यापैकी नोटाबंदीचा एकही उद्देश सफल झाला नसल्याचं पी. चिदंबरम यांनी म्हंटलं आहे. नोटांबदी पूर्णपणे अपयशी ठरल्याची थेट टीका पी.चिदंबरम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली आहे. नोटाबंदीनंतर दोन हजार रूपयांची नवी नोट चलनात आली. पण त्या दोन हजाराच्या नोटेच्याही बनावट नोटा अनेक ठिकाणी आढळून आल्याचं चिदंबरम यांनी म्हंटलं. मुंबईमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत पी. चिदंबरम बोलत होते. 

नोटाबंदीनंतर 2017 या वर्षात काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले आणि मृत्यूमुखी पडलेल्या  जवानांच्या संख्येत मोठी वाढ झाली. काळ्या पैशामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने तामिळनाडूच्या आर के नगर मतदारसंघातली निवडणूक निवडणूक आयोगाने रद्द केली. या निवडणूकीत वापरलेला पैसा काळ होता की पांढरा?  भाजपने देशात अनेक सभा घेतल्या त्या सभांचा व्यवहार चेकने केला का? असे सवालही चिदंबरम यांनी उपस्थित केले आहेत. मोदींनी केलेली नोटाबंदी पूर्णपणे अपयशी ठरली आहे, असं मत चिदंबरम यांनी मांडलं. 

नोटाबंदीमुळे विकासदर दोन टक्क्याने कमी होईल, असं मनमोहन सिंह म्हणाले होते.  ते खरं ठरलं असून सलग सहाव्या तिमाहीत विकासदरात घसरण झाली.  तसंच येणा-या तिमाहीत ही घसरण कायम राहील. आता भारत ही जगात सर्वात वेगाने वाढणारी व्यवस्था राहिली नाही, असं म्हणतं पी चिंदबरम यांनी घसरलेल्या जीडीपीच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर टीका केली आहे. नव्या नोटांची छपाई करण्यालक 8 हजार कोटींचा खर्च झाला. तसंच नोटांची वाहतूक, जुन्या नोटा जमा करणं, त्या जुन्या नोटांची विल्हेवाट लावणं,  यावर झालेला तसंच होणारा खर्च वेगळा आहे.  नोटाबंदीवर 21000 कोटी खर्च झाले. असंही चिदंबरम यांनी म्हंटलं आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदीच्या निर्णयाला धाडसी निर्णय म्हंटलं होतं. पण चुकीचे निर्णय घ्यायला धाडस लागत नाही. चुकीची जबाबदारी स्वीकारायला धाडस लागतं, असा टोला चिंदबरम यांनी मोदींना लगावला आहे.  नोटाबंदीमुळे जानेवारी 2017 या एका महिन्यात 15 लाख लोकांच्या नोकऱ्या गेल्या . तर 104 लोकांचा मृत्यू झाला. लघु आणि मध्यम उद्योग बंद झाले. उत्पादन घटलं, मागणी घटली, कृषी विकासदर घटला, निर्यातही घटली.  सरकार दरवर्षी दोन कोटी नव्या नोकऱ्या देणार होतं मग नोकऱ्या कुठे आहेत?, असा सवाल चिदंबरम यांनी उपस्थित केला.