शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा धसका! चिखलातील स्वप्नांचा शोध..; पिकेच नाही तर मातीही वाहून गेल्याने भविष्य संकटात
2
भारतीय औषध उद्योगाला ‘ट्रम्प’ झटका! १०.५ अब्ज डॉलरची निर्यात धोक्यात, अमेरिकेलाही बसणार झळ
3
Maharashtra Rain Alert: पुन्हा अतिवृष्टीचे संकट? आज, उद्या 'या' जिल्ह्यांत पाऊस घालणार धुमाकूळ, IMD सतर्कतेचा इशारा
4
Happy Birthday Google! २७ वा वाढदिवस साजरा करतोय गुगल! तुम्हाला Google चा फुल फॉर्म माहितीये का आणि कसं पडलं हे नाव?
5
२५ जण, ६ वाहनं... १ मिनिटात ९ कोटींवर डल्ला; दागिन्यांच्या दुकानात फिल्मी स्टाईल दरोडा
6
TATA च्या बहुप्रतिक्षित आयपीओची तारीख अखेर ठरली, 'या' दिवशी मिळणार गुंतवणूकीची संधी, चेक करा डिटेल्स
7
"उद्ध्वस्त एअरबेस, जळालेले हँगर हा तुमचा विजय?"; भारताची पाकिस्तानला सणसणीत चपराक
8
काळाचा घाला! गुरुग्राममधील भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू, थारचा चक्काचूर
9
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केली तर २४ महिन्यांनंतर किती रुपये मिळतील? पटापट पाहा कॅलक्युलेशन
10
केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी, प्रस्ताव मिळताच मदतनिधी देणार; PM नरेंद्र मोदींचं आश्वासन
11
चैतन्यनंदचे काळे कारनामे! मुलींची निवड करुन त्यांना कसं बनवायचा गुलाम?, खळबळजनक खुलासा
12
राज्यातील ८९ फार्मसी महाविद्यालयांची मान्यता रद्द; तंत्रशिक्षण विभागाचा मोठा निर्णय
13
आजचे राशीभविष्य, २७ सप्टेंबर २०२५: जमीन, घर अथवा वाहन खरेदीसाठी आजचा दिवस अनुकूल नाही
14
ठाण्यात भाजपा-शिंदेसेनेत संघर्ष; एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेत बैठकीला गणेश नाईकांचा ‘बहिष्कार’
15
आधी नगरपालिका की जिल्हा परिषद?;निवडणूक आयोगाची दोन्हींसाठी तयारी सुरू
16
कुजबुज! ओल्या दुष्काळात काजू-बदामची चर्चा; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी अन् राजकीय चिखलफेक
17
१६५ तोळे सोने, दोन किलो चांदी अन् ११ लाख राेख देऊनही छळ; मायानगरी मुंबईत विवाहितेचा गर्भपात
18
मढ बेट बनावट नकाशा प्रकरणाची गहाळ फाइल शोधा, अन्यथा गुन्हा दाखल करा; हायकोर्टाचे निर्देश
19
आता पहिलीपासूनच शिका शेती; शालेय अभ्यासक्रमात टप्प्याटप्प्याने कृषी विषयाचा समावेश
20
'शार्क टँक' फेम अश्नीर ग्रोव्हरला 'बिग बॉस १९'कडून ईमेल, वाइल्ड कार्ड एन्ट्रीची ऑफर; म्हणाला- "आधी सलमान खानला..."

नोटाबंदीच्या निर्णयाचा एकही उद्देश सफल झाला नाही; पी. चिदंबरम यांची मोदींवर सडकून टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2017 17:58 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाचा एकही उद्देश सफल झाला नाही, अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी.चिंदबरम यांनी केली आहे.

ठळक मुद्दे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाचा एकही उद्देश सफल झाला नाही, अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी.चिंदबरम यांनी केली आहे. बनावट चलनी नोटा, दहशतवाद, देशातील काळ पैसा रोखणं यापैकी नोटाबंदीचा एकही उद्देश सफल झाला नसल्याचं पी. चिदंबरम यांनी म्हंटलं आहे.

मुंबई, दि. 9- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाचा एकही उद्देश सफल झाला नाही, अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी.चिंदबरम यांनी केली आहे. बनावट चलनी नोटा, दहशतवाद, देशातील काळ पैसा रोखणं यापैकी नोटाबंदीचा एकही उद्देश सफल झाला नसल्याचं पी. चिदंबरम यांनी म्हंटलं आहे. नोटांबदी पूर्णपणे अपयशी ठरल्याची थेट टीका पी.चिदंबरम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली आहे. नोटाबंदीनंतर दोन हजार रूपयांची नवी नोट चलनात आली. पण त्या दोन हजाराच्या नोटेच्याही बनावट नोटा अनेक ठिकाणी आढळून आल्याचं चिदंबरम यांनी म्हंटलं. मुंबईमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत पी. चिदंबरम बोलत होते. 

नोटाबंदीनंतर 2017 या वर्षात काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले आणि मृत्यूमुखी पडलेल्या  जवानांच्या संख्येत मोठी वाढ झाली. काळ्या पैशामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने तामिळनाडूच्या आर के नगर मतदारसंघातली निवडणूक निवडणूक आयोगाने रद्द केली. या निवडणूकीत वापरलेला पैसा काळ होता की पांढरा?  भाजपने देशात अनेक सभा घेतल्या त्या सभांचा व्यवहार चेकने केला का? असे सवालही चिदंबरम यांनी उपस्थित केले आहेत. मोदींनी केलेली नोटाबंदी पूर्णपणे अपयशी ठरली आहे, असं मत चिदंबरम यांनी मांडलं. 

नोटाबंदीमुळे विकासदर दोन टक्क्याने कमी होईल, असं मनमोहन सिंह म्हणाले होते.  ते खरं ठरलं असून सलग सहाव्या तिमाहीत विकासदरात घसरण झाली.  तसंच येणा-या तिमाहीत ही घसरण कायम राहील. आता भारत ही जगात सर्वात वेगाने वाढणारी व्यवस्था राहिली नाही, असं म्हणतं पी चिंदबरम यांनी घसरलेल्या जीडीपीच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर टीका केली आहे. नव्या नोटांची छपाई करण्यालक 8 हजार कोटींचा खर्च झाला. तसंच नोटांची वाहतूक, जुन्या नोटा जमा करणं, त्या जुन्या नोटांची विल्हेवाट लावणं,  यावर झालेला तसंच होणारा खर्च वेगळा आहे.  नोटाबंदीवर 21000 कोटी खर्च झाले. असंही चिदंबरम यांनी म्हंटलं आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदीच्या निर्णयाला धाडसी निर्णय म्हंटलं होतं. पण चुकीचे निर्णय घ्यायला धाडस लागत नाही. चुकीची जबाबदारी स्वीकारायला धाडस लागतं, असा टोला चिंदबरम यांनी मोदींना लगावला आहे.  नोटाबंदीमुळे जानेवारी 2017 या एका महिन्यात 15 लाख लोकांच्या नोकऱ्या गेल्या . तर 104 लोकांचा मृत्यू झाला. लघु आणि मध्यम उद्योग बंद झाले. उत्पादन घटलं, मागणी घटली, कृषी विकासदर घटला, निर्यातही घटली.  सरकार दरवर्षी दोन कोटी नव्या नोकऱ्या देणार होतं मग नोकऱ्या कुठे आहेत?, असा सवाल चिदंबरम यांनी उपस्थित केला.