शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
2
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
3
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
4
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
5
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
6
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
7
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
8
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
9
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
10
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
11
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
12
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
13
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
14
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
15
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
16
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
17
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
18
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
19
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
20
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?

नोटाबंदीच्या निर्णयाचा एकही उद्देश सफल झाला नाही; पी. चिदंबरम यांची मोदींवर सडकून टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2017 17:58 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाचा एकही उद्देश सफल झाला नाही, अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी.चिंदबरम यांनी केली आहे.

ठळक मुद्दे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाचा एकही उद्देश सफल झाला नाही, अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी.चिंदबरम यांनी केली आहे. बनावट चलनी नोटा, दहशतवाद, देशातील काळ पैसा रोखणं यापैकी नोटाबंदीचा एकही उद्देश सफल झाला नसल्याचं पी. चिदंबरम यांनी म्हंटलं आहे.

मुंबई, दि. 9- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाचा एकही उद्देश सफल झाला नाही, अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी.चिंदबरम यांनी केली आहे. बनावट चलनी नोटा, दहशतवाद, देशातील काळ पैसा रोखणं यापैकी नोटाबंदीचा एकही उद्देश सफल झाला नसल्याचं पी. चिदंबरम यांनी म्हंटलं आहे. नोटांबदी पूर्णपणे अपयशी ठरल्याची थेट टीका पी.चिदंबरम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली आहे. नोटाबंदीनंतर दोन हजार रूपयांची नवी नोट चलनात आली. पण त्या दोन हजाराच्या नोटेच्याही बनावट नोटा अनेक ठिकाणी आढळून आल्याचं चिदंबरम यांनी म्हंटलं. मुंबईमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत पी. चिदंबरम बोलत होते. 

नोटाबंदीनंतर 2017 या वर्षात काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले आणि मृत्यूमुखी पडलेल्या  जवानांच्या संख्येत मोठी वाढ झाली. काळ्या पैशामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने तामिळनाडूच्या आर के नगर मतदारसंघातली निवडणूक निवडणूक आयोगाने रद्द केली. या निवडणूकीत वापरलेला पैसा काळ होता की पांढरा?  भाजपने देशात अनेक सभा घेतल्या त्या सभांचा व्यवहार चेकने केला का? असे सवालही चिदंबरम यांनी उपस्थित केले आहेत. मोदींनी केलेली नोटाबंदी पूर्णपणे अपयशी ठरली आहे, असं मत चिदंबरम यांनी मांडलं. 

नोटाबंदीमुळे विकासदर दोन टक्क्याने कमी होईल, असं मनमोहन सिंह म्हणाले होते.  ते खरं ठरलं असून सलग सहाव्या तिमाहीत विकासदरात घसरण झाली.  तसंच येणा-या तिमाहीत ही घसरण कायम राहील. आता भारत ही जगात सर्वात वेगाने वाढणारी व्यवस्था राहिली नाही, असं म्हणतं पी चिंदबरम यांनी घसरलेल्या जीडीपीच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर टीका केली आहे. नव्या नोटांची छपाई करण्यालक 8 हजार कोटींचा खर्च झाला. तसंच नोटांची वाहतूक, जुन्या नोटा जमा करणं, त्या जुन्या नोटांची विल्हेवाट लावणं,  यावर झालेला तसंच होणारा खर्च वेगळा आहे.  नोटाबंदीवर 21000 कोटी खर्च झाले. असंही चिदंबरम यांनी म्हंटलं आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदीच्या निर्णयाला धाडसी निर्णय म्हंटलं होतं. पण चुकीचे निर्णय घ्यायला धाडस लागत नाही. चुकीची जबाबदारी स्वीकारायला धाडस लागतं, असा टोला चिंदबरम यांनी मोदींना लगावला आहे.  नोटाबंदीमुळे जानेवारी 2017 या एका महिन्यात 15 लाख लोकांच्या नोकऱ्या गेल्या . तर 104 लोकांचा मृत्यू झाला. लघु आणि मध्यम उद्योग बंद झाले. उत्पादन घटलं, मागणी घटली, कृषी विकासदर घटला, निर्यातही घटली.  सरकार दरवर्षी दोन कोटी नव्या नोकऱ्या देणार होतं मग नोकऱ्या कुठे आहेत?, असा सवाल चिदंबरम यांनी उपस्थित केला.