शहरं
Join us  
Trending Stories
1
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
2
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
5
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
6
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
7
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
8
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
9
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
10
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
11
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
12
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
13
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
14
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
15
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
16
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
17
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
18
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
19
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
20
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले

'आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून मदत नाही'

By महेश गलांडे | Updated: February 3, 2021 10:14 IST

लोकसभेत शेतकरी आंदोलनासंदर्भात चर्चेचा प्रश्न विचारण्यात आला होता, त्यावर कृषीमंत्री तोमर यांनी उत्तर दिले. तसेच, शेतकरी आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना सरकारकडून कुठलिही आर्थिक मदत देण्यात येणार नसल्याचेही स्पष्टीकरण तोमर यांनी केलं

ठळक मुद्देलोकसभेत शेतकरी आंदोलनासंदर्भात चर्चेचा प्रश्न विचारण्यात आला होता, त्यावर कृषीमंत्री तोमर यांनी उत्तर दिले. तसेच, शेतकरी आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना सरकारकडून कुठलिही आर्थिक मदत देण्यात येणार नसल्याचेही स्पष्टीकरण तोमर यांनी केलं

नवी दिल्ली - दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला दिवसेंदिवस आक्रमता येत असून पाठिंबाही वाढत आहे. शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी गाझीपूर सीमेवर जाऊन शेतकरी नेते राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांची भेट घेतली आणि शेतकरी आंदोलनाला शिवसेनाचा पाठिंबा दर्शवला. तर, पॉपस्टार गायिका आणि अभिनेत्री रिहाना हिनेही शेतकरी आंदोलनासंदर्भात आपण बोलत का नाही? असे म्हणत आंदोलक शेतकऱ्यांचे समर्थन केलंय. गेल्या 68 दिवसांपासून हे आंदोलन सुरु असून अधिक आंदोलनाची धार अधिक तीव्र होताना दिसत आहे. या आंदोलनात अनेक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. मात्र, आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांना सरकार आर्थिक मदत देणार नसल्याचे कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी सांगितलं. 

लोकसभेत शेतकरी आंदोलनासंदर्भात चर्चेचा प्रश्न विचारण्यात आला होता, त्यावर कृषीमंत्री तोमर यांनी उत्तर दिले. तसेच, शेतकरी आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना सरकारकडून कुठलिही आर्थिक मदत देण्यात येणार नसल्याचेही स्पष्टीकरण तोमर यांनी केलं. कोरोनामुळे शेतकरी आंदोलनातील महिला व लहान मुलांना घरी पाठविण्यात यावं, असं आवाहन अनेकवेळा करण्यात आलं होतं, असेही ते म्हणाले. विशेष म्हणजे आत्तापर्यंत शेतकरी आंदोलक आणि सरकारमध्ये चर्चेच्या 11 फेऱ्या झाल्या असून अद्यापही मार्ग निघाला नाही. दरम्यान, लोकसभेत चर्चेदरम्यान विरोधकांनी गोंधळ केल्यामुळे कृषीमंत्र्यांनी शांत राहण्याचं आवाहन केलं. तसेच, सरकार संसद सभागृहात आणि सभागृहाबाहेरही चर्चेला तयार असल्याचं तोमर यांनी म्हटलंय. 

भारतीय किसान युनियनने दावा केला आहे की, आत्तापर्यंत गेल्या 68 दिवसांत 70 पेक्षा अधिक शेतकऱ्यांचा या आंदोलनात मृत्यू झाला आहे. त्यामध्ये, थंडी आणि ह्रदयविकाराच्या झटक्यानं मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे. थंडीमुळेच महाराष्ट्राच्या गडचिरोली येथील सिताबाई यांचाही याच आंदोलनादरम्यान मृत्यू झाला आहे. दरम्यान, सरकारने आंदोलनात मृत्यूमुखी पडलेल्या शेतकऱ्यांची आकडेवारी दिली नाही, तसेच त्यांच्या कुटुंबीयांना मदत करण्यासही स्पष्टपणे नकार दिलाय.  

टॅग्स :Narendra Singh Tomarनरेंद्र सिंह तोमरFarmerशेतकरीfarmer suicideशेतकरी आत्महत्या