शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

'आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून मदत नाही'

By महेश गलांडे | Updated: February 3, 2021 10:14 IST

लोकसभेत शेतकरी आंदोलनासंदर्भात चर्चेचा प्रश्न विचारण्यात आला होता, त्यावर कृषीमंत्री तोमर यांनी उत्तर दिले. तसेच, शेतकरी आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना सरकारकडून कुठलिही आर्थिक मदत देण्यात येणार नसल्याचेही स्पष्टीकरण तोमर यांनी केलं

ठळक मुद्देलोकसभेत शेतकरी आंदोलनासंदर्भात चर्चेचा प्रश्न विचारण्यात आला होता, त्यावर कृषीमंत्री तोमर यांनी उत्तर दिले. तसेच, शेतकरी आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना सरकारकडून कुठलिही आर्थिक मदत देण्यात येणार नसल्याचेही स्पष्टीकरण तोमर यांनी केलं

नवी दिल्ली - दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला दिवसेंदिवस आक्रमता येत असून पाठिंबाही वाढत आहे. शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी गाझीपूर सीमेवर जाऊन शेतकरी नेते राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांची भेट घेतली आणि शेतकरी आंदोलनाला शिवसेनाचा पाठिंबा दर्शवला. तर, पॉपस्टार गायिका आणि अभिनेत्री रिहाना हिनेही शेतकरी आंदोलनासंदर्भात आपण बोलत का नाही? असे म्हणत आंदोलक शेतकऱ्यांचे समर्थन केलंय. गेल्या 68 दिवसांपासून हे आंदोलन सुरु असून अधिक आंदोलनाची धार अधिक तीव्र होताना दिसत आहे. या आंदोलनात अनेक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. मात्र, आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांना सरकार आर्थिक मदत देणार नसल्याचे कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी सांगितलं. 

लोकसभेत शेतकरी आंदोलनासंदर्भात चर्चेचा प्रश्न विचारण्यात आला होता, त्यावर कृषीमंत्री तोमर यांनी उत्तर दिले. तसेच, शेतकरी आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना सरकारकडून कुठलिही आर्थिक मदत देण्यात येणार नसल्याचेही स्पष्टीकरण तोमर यांनी केलं. कोरोनामुळे शेतकरी आंदोलनातील महिला व लहान मुलांना घरी पाठविण्यात यावं, असं आवाहन अनेकवेळा करण्यात आलं होतं, असेही ते म्हणाले. विशेष म्हणजे आत्तापर्यंत शेतकरी आंदोलक आणि सरकारमध्ये चर्चेच्या 11 फेऱ्या झाल्या असून अद्यापही मार्ग निघाला नाही. दरम्यान, लोकसभेत चर्चेदरम्यान विरोधकांनी गोंधळ केल्यामुळे कृषीमंत्र्यांनी शांत राहण्याचं आवाहन केलं. तसेच, सरकार संसद सभागृहात आणि सभागृहाबाहेरही चर्चेला तयार असल्याचं तोमर यांनी म्हटलंय. 

भारतीय किसान युनियनने दावा केला आहे की, आत्तापर्यंत गेल्या 68 दिवसांत 70 पेक्षा अधिक शेतकऱ्यांचा या आंदोलनात मृत्यू झाला आहे. त्यामध्ये, थंडी आणि ह्रदयविकाराच्या झटक्यानं मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे. थंडीमुळेच महाराष्ट्राच्या गडचिरोली येथील सिताबाई यांचाही याच आंदोलनादरम्यान मृत्यू झाला आहे. दरम्यान, सरकारने आंदोलनात मृत्यूमुखी पडलेल्या शेतकऱ्यांची आकडेवारी दिली नाही, तसेच त्यांच्या कुटुंबीयांना मदत करण्यासही स्पष्टपणे नकार दिलाय.  

टॅग्स :Narendra Singh Tomarनरेंद्र सिंह तोमरFarmerशेतकरीfarmer suicideशेतकरी आत्महत्या