शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

दिवाळीत धडाड-धूम नाहीच, फटाक्यांवर बंदी; केजरीवाल सरकारचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2023 14:00 IST

दिवाळीत फटाके आणि दरवर्षी दिवाळीच्या रात्री फटाके फोडण्याचा अतिरेक करून कोट्यवधी रुपयांचा धूर करण्याची दिल्लीकरांची सवय आहे.

नवी दिल्ली - दिवाळी म्हणजे भारतीयांचं सर्वात मोठा उत्सव. गरिबातील गरिबांपासून ते गर्भश्रीमंतांच्याही घरात दिवाळी साजरी केली जाते. गोड-धोड पदार्थांचा फराळ, नवे कपडे आणि फटाक्यांची आतषबाजी म्हणजे दिवाळी. मात्र, गेल्या काही वर्षांपासून पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्यासाठी फटाक्यांवर बंदी घालण्याची मागणी केली जाते. त्यानुसार, आता दिल्लीतील केजरीवाल सरकारने यंदाच्या दिवाळीत फटाक्यांवर बंदी घातली आहे. त्यामुळे दिल्लीकरांची दिवाळी फटाकेमुक्त आणि धूरमुक्त असणार आहे. 

दिवाळीत फटाके आणि दरवर्षी दिवाळीच्या रात्री फटाके फोडण्याचा अतिरेक करून कोट्यवधी रुपयांचा धूर करण्याची दिल्लीकरांची सवय आहे. मात्र, प्रदुषणमुक्त दिल्लीसाठी केजरीवाल सरकारने दिल्लीत फटाके फोडण्यावर बंदी घातली आहे. दिल्लीचे पर्यावरणमंत्री गोपाल राय यांनी यासंदर्भातील घोषणा केली. हिवाळ्यात फटाक्यांची विक्री आणि फटाके वाजवण्यास बंदी घालण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे, असे राय यांनी सांगितले. फटाक्यांसदर्भातील परवाने न देण्याच्या सूचना दिल्ली पोलिसांनी सरकारच्यावतीने करण्यात आल्या आहेत. हिवाळ्याच्या हंगामात दिल्लीत प्रदुषणाचं प्रमाण वाढलेलं असतं. त्यामुळे, संपूर्ण हिवाळ्यातील प्रदुषण रोखण्यासाठी सरकारकडून यंत्रणा उभी केली जात आहे, असेही राय यांनी सांगितले.

दिल्ली सरकारच्या या निर्णयावर आता दिल्लीकरांची भूमिका काय राहिल हे पाहावे लागणार आहे. याशिवाय दिवाळीत फटाके फोडण्या सरकार काही प्रमाणात शिथीलता देईल का, हेही पाहावे लागेल. 

दरम्यान, गतवर्षी फटाक्यांवर पूर्ण बंदी लागू करण्यासाठी सरकारच्या वतीने ४०८ पथके तयार करण्यात आली होती. त्यात महसूल विभागाची १६५ पथके, त्यांच्या जोडीला दिल्ली पोलिसांची २१० व दिल्ली प्रदूषण नियंत्रण मंडळाची ३३ पथकांचा समावेश होता. मात्र, या पथकांची फिरती सुरू राहते आणि फटाक्यांचा धूरही सुरू राहतो हा नेमेची येणारा अनुभव आहे. त्यामुळे, यावर्षीही दिल्लीतील फटाकेबंदीचा निर्णय कागदोपत्रीच राहतो की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.  

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालDiwaliदिवाळी 2022delhiदिल्लीfire crackerफटाके