शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

सीमाभाग केंद्रशासित करण्याची पुन्हा मागणी नको; महाराष्ट्र एकीकरण समितीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 13:40 IST

उच्चाधिकार समितीची बैठक घेण्याची मागणी

कोल्हापूर : सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ठ असताना, सीमाभाग केंद्रशासित करावा, ही मागणी पुन्हा करणे योग्य होणार नाही. वादग्रस्त सीमाभागातील चार जिल्ह्यांतील ८६५ गावे केंद्रशासित करणे भौगोलिकदृष्या शक्य नाही. म्हणून, केंद्रशासितऐवजी खेडे घटक, भौगोलिक सलगता, सापेक्ष भाषिक बहुसंख्य, लोकेच्छा या आधारे केंद्राने हा वाद सोडवावा, असा ठराव अधिवेशनात करावा, अशी मागणी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर, अध्यक्ष दीपक दळवी, सरचिटणीस मालोजी अष्टेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.

नागपुरात सध्या सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात सीमाप्रश्न पुन्हा चर्चेला आला आहे. या मागणीला गेल्या चार दशकांहून अधिक काळ कारवार, निपाणी, बिदर, बेळगाव या शहरांसह ८६५ गावांचा महाराष्ट्रात समावेश करावा, यासाठी लढणाऱ्या मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने विरोध केला आहे.त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे, सन २००८ मध्ये बेळगावचे तत्कालीन महापौर, माजी आमदार यांना सीमाप्रश्नी कन्नड संघटनांनी काळे फासले. मारहाण केली. त्यानंतर महाराष्ट्र शासनाने सर्वाेच्च न्यायालयात सीमाभागातील मराठी भाषिक, तसेच लोकप्रतिनिधींवर अन्याय होत आहे. हे थांबण्यासाठी वादग्रस्त सीमाभाग दावा प्रलंबित असेपर्यंत केंद्र शासनाचा अंमल ठेवावा, अशा मागणीचा अंतरिम अर्ज केला. मात्र, ‘ॲप्लीकेशन इज क्लोज्ड’ असा शब्द प्रयोग करून अंतरिम अर्ज न्यायालयाने बाजूला ठेवला. यामुळे आता पुन्हा सीमाभाग केंद्रशासित करण्याची मागणी करणे योग्य होणार नाही.उच्चाधिकार समितीची बैठक घेण्याची मागणीमहाराष्ट्र - कर्नाटक सीमाप्रश्नी सर्वाेच्च न्यायालयातील दाव्याच्या प्रगतीसंबंधी तातडीने उच्चाधिकार समितीने बैठक घ्यावी, सीमाप्रश्नी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधान, गृहमंत्री यांची भेट घ्यावी, सीमाप्रश्नाच्या दाव्यात भक्कम बाजू मांडण्यासाठी ज्येष्ठ वकिलांची नेमणूक करावी, आदी मागण्याही पत्राद्वारे केली आहे.

टॅग्स :Karnatakकर्नाटकMaharashtraमहाराष्ट्रbelgaonबेळगावDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSupreme Courtसर्वोच्च न्यायालय