शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

सीमाभाग केंद्रशासित करण्याची पुन्हा मागणी नको; महाराष्ट्र एकीकरण समितीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 13:40 IST

उच्चाधिकार समितीची बैठक घेण्याची मागणी

कोल्हापूर : सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ठ असताना, सीमाभाग केंद्रशासित करावा, ही मागणी पुन्हा करणे योग्य होणार नाही. वादग्रस्त सीमाभागातील चार जिल्ह्यांतील ८६५ गावे केंद्रशासित करणे भौगोलिकदृष्या शक्य नाही. म्हणून, केंद्रशासितऐवजी खेडे घटक, भौगोलिक सलगता, सापेक्ष भाषिक बहुसंख्य, लोकेच्छा या आधारे केंद्राने हा वाद सोडवावा, असा ठराव अधिवेशनात करावा, अशी मागणी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर, अध्यक्ष दीपक दळवी, सरचिटणीस मालोजी अष्टेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.

नागपुरात सध्या सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात सीमाप्रश्न पुन्हा चर्चेला आला आहे. या मागणीला गेल्या चार दशकांहून अधिक काळ कारवार, निपाणी, बिदर, बेळगाव या शहरांसह ८६५ गावांचा महाराष्ट्रात समावेश करावा, यासाठी लढणाऱ्या मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने विरोध केला आहे.त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे, सन २००८ मध्ये बेळगावचे तत्कालीन महापौर, माजी आमदार यांना सीमाप्रश्नी कन्नड संघटनांनी काळे फासले. मारहाण केली. त्यानंतर महाराष्ट्र शासनाने सर्वाेच्च न्यायालयात सीमाभागातील मराठी भाषिक, तसेच लोकप्रतिनिधींवर अन्याय होत आहे. हे थांबण्यासाठी वादग्रस्त सीमाभाग दावा प्रलंबित असेपर्यंत केंद्र शासनाचा अंमल ठेवावा, अशा मागणीचा अंतरिम अर्ज केला. मात्र, ‘ॲप्लीकेशन इज क्लोज्ड’ असा शब्द प्रयोग करून अंतरिम अर्ज न्यायालयाने बाजूला ठेवला. यामुळे आता पुन्हा सीमाभाग केंद्रशासित करण्याची मागणी करणे योग्य होणार नाही.उच्चाधिकार समितीची बैठक घेण्याची मागणीमहाराष्ट्र - कर्नाटक सीमाप्रश्नी सर्वाेच्च न्यायालयातील दाव्याच्या प्रगतीसंबंधी तातडीने उच्चाधिकार समितीने बैठक घ्यावी, सीमाप्रश्नी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधान, गृहमंत्री यांची भेट घ्यावी, सीमाप्रश्नाच्या दाव्यात भक्कम बाजू मांडण्यासाठी ज्येष्ठ वकिलांची नेमणूक करावी, आदी मागण्याही पत्राद्वारे केली आहे.

टॅग्स :Karnatakकर्नाटकMaharashtraमहाराष्ट्रbelgaonबेळगावDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSupreme Courtसर्वोच्च न्यायालय