शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

भारत आता मुस्लिमांचा देश राहिलेला नाही; मेहबूबा मुफ्तींच्या कन्येचं टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2019 14:20 IST

नागरिकत्व (सुधारणा) विधेयकावरुन मोदी सरकार लक्ष्य

श्रीनगर- नागरिकत्व (सुधारणा) विधेयकावरुन जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्या कन्या इल्तिजा जावेद यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. भारत आता मुस्लिमांचा देश राहिलेला नाही, अशा शब्दांमध्ये इल्तिजा जावेद यांनी नागरिकत्व (सुधारणा) विधेयकावरुन सरकारला लक्ष्य करत त्यांची नाराजी व्यक्त केली. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटवण्यात आल्यानंतर मुफ्ती यांना ताब्यात घेण्यात आलं. तेव्हापासून त्यांची मुलगी इल्तिजा त्यांची सोशल मीडिया अकाऊंट्स सांभाळते.नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या आराखड्याला काल केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. यानंतर काही तासांमध्ये मेहबूबा मुफ्तींच्या ट्विटरवरुन इल्तिजा यांनी ट्विट केलं. भारत आता मुस्लिमांचा देश राहिलेला नाही, अशा शब्दांत त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. नागरिकत्व सुधारणा विधेयकाला संसदेची मंजुरी मिळाल्यास बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधून येणाऱ्या अल्पसंख्यांकांना भारताचं नागरिकत्व मिळवण्याची प्रक्रिया सोपी होईल. या विधेयकावर विरोधी पक्षांनी टीकेची झोड उठवली आहे. सरकार मुस्लिमांशी भेदभाव करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.  मेहबूबा मुफ्ती यांनी याआधीही अनेकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा काढल्यानंतरही त्यांनी मोदी सरकारला लक्ष्य केलं होतं. भारत सरकारचा उद्देश भयावह आहे. मुस्लिमांची संख्या जास्त असलेल्या देशातील एकमेव राज्यातील लोकसंख्येचं गणित बदलण्याचा सरकारचा मानस आहे. मुस्लिमांचे अधिकार कमी करुन त्यांना त्यांच्याच राज्यात दुय्यम वागणूक देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, अशी टीका मुफ्ती यांनी केली होती. 

टॅग्स :Mehbooba Muftiमहेबूबा मुफ्तीPDPपीडीपीBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी