शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
2
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
3
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
4
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
5
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
6
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
7
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
8
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
9
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
10
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
11
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
12
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
13
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
14
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
15
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
16
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
17
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
18
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
19
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
20
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती

No Confidence Motion: मोदीही वाजपेयींसारखा 'करिष्मा' करुन दाखवतील?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2018 13:12 IST

2003 साली झालेल्या अविश्वास दर्शक ठरावाच्या चर्चेमध्ये तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी आपल्या सरकारचे मोठे बहुमत असल्याचे दाखवून दिले.

नवी दिल्ली- 1999 साली अटलबिहारी वाजपेयी यांनी अविश्वासदर्शक ठरावाचा पहिल्यांदा सामना केला. तेव्हा त्यांचे सरकार केवळ एका मताने पराभूत झाले होते. मात्र 2003 साली अटलबिहारी वाजपेयी यांनी याचे प्रत्युत्तर विरोधकांना दिले. 2003 साली झालेल्या अविश्वास दर्शक ठरावाच्या चर्चेमध्ये त्यांनी आपल्या सरकारचे मोठे बहुमत असल्याचे दाखवून दिले.

का मांडला गेला ठराव?- भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे तत्कालीन संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. मात्र काही काळानंतर ते पुन्हा मंत्रिमंडळात आले. या घटनेचा निषेध म्हणून विरोधक सतत लोकसभेतून सभात्याग करत असत. त्यामुळे काँग्रेसने अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारविरोधात अविश्वास दर्शक ठराव लोकसभेत मांडला.

मतदानात काय झाले?- विरोधीपक्षनेत्या सोनिया गांधी, पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांनी भाषणे केल्यानंतर या ठरावावर मतदान घेण्यात आले. या मतदानात ठरावाच्या बाजूने केवळ 186 खासदारांनी मतदान केले तर सरकारच्या बाजूने 312 खासदारांनी मतदान केले. त्यामुळे विरोधकांचा मोठा पराभव करण्याची व आपल्या बाजूने लोकसभेचा विश्वास आहे हे दाखविण्याची मोठी संधी वाजपेयी यांच्याकडे चालून आली.

त्या पुढच्या सरकारांमध्ये काय झाले?- अटलबिहारी वाजपेयी यांच्यानंतर सलग डॉ. मनमोहन सिंह यांच्या नेतृत्वाखाली केंद्रामध्ये संपुआची सलग दोन सरकारे 10 वर्षे कार्यरत होती. 2008 साली पहिल्या संपुआ सरकारचा पाठिंबा डाव्यांनी काढून घेतल्यावर डॉ. मनमोहन सिंह यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला होता.

टॅग्स :No Confidence motionअविश्वास ठरावAtal Bihari Vajpayeeअटल बिहारी वाजपेयीprime ministerपंतप्रधानlok sabhaलोकसभा