शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
3
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
4
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
5
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
6
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
7
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
8
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
9
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
10
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
11
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
12
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
13
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
14
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
15
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
16
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना
17
"कोणी ड्रममध्ये भरत आहे तर कोणी...", शिव ठाकरेला वाटते लग्नाची भीती, म्हणाला- "हा तर कर्मा..."
18
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
19
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
20
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं

No Confidence Motion : मोदी सरकारनं विश्वास जिंकला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2018 07:03 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारविरोधात दाखल झालेला अविश्वास ठराव बहुमताच्या जोरावर खासदारांनी फेटाळून लावला आहे.

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारविरोधात दाखल झालेला अविश्वास ठराव बहुमताच्या जोरावर खासदारांनी फेटाळून लावला आहे. मोदी सरकारविरोधात दाखल झालेल्या अविश्वास ठरावाच्या बाजूनं फक्त 126 मतं पडली आहेत. तर ठरावाच्या विरोधात 325 खासदारांनी मतदान केलं आहे. त्यामुळे बहुमताच्या जोरावर मोदी सरकारनं विरोधकांचा हा प्रस्ताव हाणून पाडला आहे.मतदानादरम्यान जवळपास 92 खासदार अनुपस्थित होते.  अविश्वास प्रस्तावावर एकूण 451 सदस्यांनी मतदान केलं आहे. प्रस्तावावरील मतदानानंतर लोकसभेची कार्यवाही सोमवारपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा द्यावा, या मागणीसाठी हा प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला होता. विशेष म्हणजे AIADMKच्या काही खासदारांनी अविश्वास ठरावाच्या विरोधात मतदान केलं आहे. त्यामुळे तामिळनाडूमध्ये मोदी सरकारला नवा मित्र सापडल्याची आता राजकीय वर्तुळात चर्चा आहे.मोदींनी यावेळी काँग्रेसला अहंकारी म्हटलं आहे. काँग्रेसची माणसं जी भाषा बोलतात, ती अतिआत्मविश्वास आणि अज्ञानातून आलेली आहे. हा अविश्वास प्रस्ताव नव्हे, तर काँग्रेसच्या कथित मित्र पक्षांची फ्लोअर टेस्ट आहे. मी पुन्हा पंतप्रधान बनेन याचं ट्रायल सुरू आहे. तसेच आंध्र प्रदेशला विशेष दर्जा देण्याच्या मागणीवर मोदींनी भाष्य केलं आहे. जोरजबरदस्तीनं आंध्र प्रदेशचं विभाजन करण्यात आलं. त्यावेळी मी म्हणालो होतो, तेलुगू आमची आई आहे. तेलुगूंच्या एकीची ताटातूट व्हायला नको होती. काँग्रेसमुळेच तेलंगणाचा वाद उत्पन्न झाला. काँग्रेसनं त्यावेळी भारत आणि पाकिस्तानचं विभाजन केलं आणि त्याचे परिणाम अजूनही आपण भोगतोय. काँग्रेसला विभाजन करून आंध्र प्रदेशला जिंकायचं होतं. परंतु काँग्रेसला ना आंध्र प्रदेश मिळालं ना तेलंगणा. आंध्र प्रदेशचं विभाजनं काँग्रेसनं बळाच्या जोरावर केलं आहे, असंही मोदी म्हणाले आहेत. सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल झाल्यापासून लोकसभेचे कामकाज सलग 12 तास चालले. याच वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जवळपास दीड तास भाषण केले.शिवसेना व बिजू जनता दलाच्या खासदारांनी मतदानात भाग न घेता वॉकआऊट केलं. भाजपाचे खासदार के. सी. पटेल आणि भोला सिंग हे आजारी असतानाही फक्त मतदानासाठी लोकसभेत उपस्थित राहिले, तर खासदार पप्पू यादव यांनी मतदानादरम्यान सभात्याग केला. मोदींनी अविश्वास प्रस्तावाच्या विरोधात मतदान केलेल्या मित्रपक्षांचे आभारही मानले आहेत. तसेच 125 कोटी जनतेचा विश्वास आम्ही संपादन केला आहे. भारतात परिवर्तन घडवण्याबरोबरच तरुणांची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असंही मोदी म्हणाले आहेत.   

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीNo Confidence motionअविश्वास ठरावParliamentसंसदcongressकाँग्रेस