शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
2
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
3
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
4
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
5
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
6
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
7
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
8
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
9
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
10
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
11
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
12
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
13
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
14
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
15
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
16
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
17
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
18
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
19
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?
20
Crime: गे डेटिंग अपवर ओळख, ८ जण फ्लॅटवर पार्टीसाठी भेटले; पार्टीनंतर शुभमचा मृत्यू

No Confidence Motion : मोदी सरकारनं विश्वास जिंकला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2018 07:03 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारविरोधात दाखल झालेला अविश्वास ठराव बहुमताच्या जोरावर खासदारांनी फेटाळून लावला आहे.

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारविरोधात दाखल झालेला अविश्वास ठराव बहुमताच्या जोरावर खासदारांनी फेटाळून लावला आहे. मोदी सरकारविरोधात दाखल झालेल्या अविश्वास ठरावाच्या बाजूनं फक्त 126 मतं पडली आहेत. तर ठरावाच्या विरोधात 325 खासदारांनी मतदान केलं आहे. त्यामुळे बहुमताच्या जोरावर मोदी सरकारनं विरोधकांचा हा प्रस्ताव हाणून पाडला आहे.मतदानादरम्यान जवळपास 92 खासदार अनुपस्थित होते.  अविश्वास प्रस्तावावर एकूण 451 सदस्यांनी मतदान केलं आहे. प्रस्तावावरील मतदानानंतर लोकसभेची कार्यवाही सोमवारपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा द्यावा, या मागणीसाठी हा प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला होता. विशेष म्हणजे AIADMKच्या काही खासदारांनी अविश्वास ठरावाच्या विरोधात मतदान केलं आहे. त्यामुळे तामिळनाडूमध्ये मोदी सरकारला नवा मित्र सापडल्याची आता राजकीय वर्तुळात चर्चा आहे.मोदींनी यावेळी काँग्रेसला अहंकारी म्हटलं आहे. काँग्रेसची माणसं जी भाषा बोलतात, ती अतिआत्मविश्वास आणि अज्ञानातून आलेली आहे. हा अविश्वास प्रस्ताव नव्हे, तर काँग्रेसच्या कथित मित्र पक्षांची फ्लोअर टेस्ट आहे. मी पुन्हा पंतप्रधान बनेन याचं ट्रायल सुरू आहे. तसेच आंध्र प्रदेशला विशेष दर्जा देण्याच्या मागणीवर मोदींनी भाष्य केलं आहे. जोरजबरदस्तीनं आंध्र प्रदेशचं विभाजन करण्यात आलं. त्यावेळी मी म्हणालो होतो, तेलुगू आमची आई आहे. तेलुगूंच्या एकीची ताटातूट व्हायला नको होती. काँग्रेसमुळेच तेलंगणाचा वाद उत्पन्न झाला. काँग्रेसनं त्यावेळी भारत आणि पाकिस्तानचं विभाजन केलं आणि त्याचे परिणाम अजूनही आपण भोगतोय. काँग्रेसला विभाजन करून आंध्र प्रदेशला जिंकायचं होतं. परंतु काँग्रेसला ना आंध्र प्रदेश मिळालं ना तेलंगणा. आंध्र प्रदेशचं विभाजनं काँग्रेसनं बळाच्या जोरावर केलं आहे, असंही मोदी म्हणाले आहेत. सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल झाल्यापासून लोकसभेचे कामकाज सलग 12 तास चालले. याच वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जवळपास दीड तास भाषण केले.शिवसेना व बिजू जनता दलाच्या खासदारांनी मतदानात भाग न घेता वॉकआऊट केलं. भाजपाचे खासदार के. सी. पटेल आणि भोला सिंग हे आजारी असतानाही फक्त मतदानासाठी लोकसभेत उपस्थित राहिले, तर खासदार पप्पू यादव यांनी मतदानादरम्यान सभात्याग केला. मोदींनी अविश्वास प्रस्तावाच्या विरोधात मतदान केलेल्या मित्रपक्षांचे आभारही मानले आहेत. तसेच 125 कोटी जनतेचा विश्वास आम्ही संपादन केला आहे. भारतात परिवर्तन घडवण्याबरोबरच तरुणांची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असंही मोदी म्हणाले आहेत.   

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीNo Confidence motionअविश्वास ठरावParliamentसंसदcongressकाँग्रेस