शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

No Confidence Motion: ३८ मिनिटांत काँग्रेस मोदी सरकारची कोंडी करणार? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2018 12:37 IST

लोकसभेत २७३ सदस्य असलेल्या भाजपाला तब्बल ३ तास ३३ मिनिटं मिळाली आहेत.

नवी दिल्लीः केंद्रातील मोदी सरकारच्या अपयशाचा पाढा वाचून त्यांना देशापुढे उघडं पाडण्यासाठी काँग्रेससह प्रमुख विरोधी पक्षांनी लोकसभेत अविश्वास प्रस्तावाचा घाट घातला आहे. पण, प्रत्येक पक्षाला त्यांचं म्हणणं मांडण्यासाठी मिळालेला वेळ पाहता, भाजपासाठीच आजचा दिवस 'अच्छा दिन' ठरू शकतो, असं दिसतंय. 

संसदेत अविश्वास प्रस्तावावर चर्चा होते, तेव्हा पक्षीय बलाबल पाहून वेळ वाटून दिला जातो. त्यानुसार, काँग्रेसचे ४८ खासदार असल्यानं त्यांना ३८ मिनिटांचा वेळ देण्यात आला आहे. त्या खालोखाल अण्णा द्रमुकला (३७ खासदार) २९ मिनिटं, तृणमूल काँग्रेसला (३४ खासदार) २७ मिनिटं, बीजू जनता दलाला १५ मिनिटं आणि तेलंगणा राष्ट्र समितीला ९ मिनिटांचा कालावधी देण्यात आला आहे. याउलट, २७३ सदस्य असलेल्या भाजपाला तब्बल ३ तास ३३ मिनिटं मिळाली आहेत. त्यामुळे विरोधकांनी केलेल्या आरोपांना उत्तर देण्यासाठी, त्यांचे मुद्दे खोडून काढण्यासाठी भाजपाकडे भरपूर वेळ आहे. 

गेल्या चार वर्षांत, लोकसभेत जेव्हा महत्त्वाच्या विषयांवरून चर्चा झाल्यात, तेव्हा भाजपाचे संबंधित मंत्री आणि स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदीही धडाकेबाज भाषण करून भाव खाऊन गेल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यामुळे आज काँग्रेस आणि अन्य विरोधक त्यांच्यावर सरशी साधतात का, यावर बरंच काही ठरणार आहे. या अविश्वास प्रस्तावाच्या माध्यमातून, २०१९च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडण्याचा प्रयत्न सरकार आणि विरोधक करतील, असं मानलं जातंय. त्यात कोण बाजी मारतं, हे पाहावं लागेल.

टॅग्स :No Confidence motionअविश्वास ठरावNarendra Modiनरेंद्र मोदीlok sabhaलोकसभाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९congressकाँग्रेसBJPभाजपा