शहरं
Join us  
Trending Stories
1
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
2
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
3
"दगा फटका झाला तर बच्चू कडू फाशीवर जाईल" आंदोलनाचा विजय झाल्याचा दावा करत बच्चू कडूंनी सरकारला दिला इशारा
4
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांवर पोलिसांची पाळत, थेट बेडरुमध्ये घुसून हेरगिरी? आरोपामुळे खळबळ
5
भररस्त्यात पाठलाग, कारची काच फोडली... महिला पत्रकारावर मध्यरात्री हल्ला! अखेर दोघांना अटक
6
'मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा…’, आजारी संजय राऊत यांच्यासाठी सुषमा अंधारे यांची खास पोस्ट
7
सरदार पटेल यांना त्यांच्या 150व्या जयंतीनिमित्त शशी थरूर यांचं अभिवादन, महात्मा गांधींच्या नातवाच्या शब्दांत अर्पण केली श्रद्धांजली
8
Mumbai Hostage Case: ‘त्याने फटाके वाजवले आणि बाहेर गोळीबार सुरू असल्याचे सांगितले’; रोहित आर्या प्रकरणी प्रत्यक्षदर्शी वृद्ध महिलेचा खुलासा
9
ट्रम्प यांनी अण्वस्त्र टेस्टिंगचा आदेश देताच रशियाची थेट प्रतिक्रिया, दिला अल्टीमेटम!
10
मित्रांचा आग्रह जीवावर बेतला, पार्टीत बॅक टू बॅक पाजले पेग; २६ वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्यू
11
पवईतील आरोपी रोहित आर्यला दीपक केसरकरांनी इतकी मोठी रक्कम का दिली?; सामाजिक कार्यकर्त्यांचा सवाल
12
मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत सापडली दोन सिल्वर गिबन; कस्टम अधिकारीही झाले अवाक्
13
वाघ अगदी जवळून पाहायचाय? मग, भारतातील 'या' ६ व्याघ्र प्रकल्पांना नक्की भेट द्या!
14
गोळीबार, आग आणि धमकीचं पत्र, फरार कैद्याने आणले पोलिसांच्या नाकी नऊ, नेमकं प्रकरण काय?
15
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटी बुडाले; सर्वात जास्त कुठे?
16
Extra Marital Affairs:मुलाचं लग्न ठरलं आणि होणाऱ्या सूनेच्या बापावरच जडला महिलेचा जीव; लग्नाआधीच दोघे गेले पळून
17
Rain Alert: कमी दाबाचे क्षेत्र कायम, या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; महाराष्ट्रात कुठे-कुठे पाऊस पडणार?
18
शेतकऱ्यांना न झुलवता तात्काळ कर्जमाफी करा; उद्धव ठाकरेंची राज्य सरकारकडे मागणी
19
धोनीची गुंतवणूक असलेली कंपनी बाजारात! ६ नोव्हेंबरला उघडणार IPO; प्राइस बँडसह तपशील जाणून घ्या
20
खात्यात ८ लाख जमा केले अन् प्राप्तिकर विभागाची 'टॅक्स' नोटीस; ६ वर्षांच्या लढ्यानंतर करदात्याचा विजय!

'कायदा आणि सुव्यवस्थेशी तडजोड नाही', तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांचा तेलगू चित्रपट संघटनेला कडक इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2024 15:41 IST

पुष्पा 2 चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान एका ३५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. अभिनेता अल्लू अर्जुन या प्रकरणामुळे सतत चर्चेत आहे.आज तेलुगू चित्रपट सृष्टीतील दिग्दर्शक आणि अभिनेते तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांची भेट घेतली.

चेंगराचेंगरीच्या वादामुळे अभिनेता अल्लू अर्जुन सतत चर्चेत आहे. काही दिवसापूर्वी पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली होती. आता तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांची तेलुगू सिने दिग्दर्शक आणि अभिनेत्यांची भेट घेतली. या भेटीनंतर आता मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. 

मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीला सुरेश बेबी, दामोधर, केएल नारायण, चिन्ना बाबू, बीव्हीएसएन प्रसाद, सुधाकर रेड्डी, चित्रपट दिग्दर्शक कोर्टला सिवा, अनिल रविपुडी, के राघवेंद्र राव, प्रशांत वर्मा, नागार्जुन, शिवा बालाजी आणि व्यंकटेश उपस्थित होते. विशेष म्हणजे कोंडा सुरेखा वादानंतर नागार्जुन मुख्यमंत्र्यांना भेटण्याची ही पहिलीच वेळ होती.

चित्रपटसृष्टीतील कलाकारांसोबतच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी तेलुगू चित्रपटसृष्टीला पूर्ण पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले आहे. संध्या थिएटरमधील चेंगराचेंगरीबद्दल बोलताना ते म्हणाले की, स्टार्सनीही त्यांच्या चाहत्यांना नियंत्रित करण्याची जबाबदारी घेतली पाहिजे. कायदेशीर व्यवस्थेशी कोणतीही तडजोड करता येणार नाही,असंही ते म्हणाले.

पुष्पा 2 अभिनेता अल्लू अर्जुन विरुद्ध रेड्डी यांचे गेल्या काही दिवसापासून एकमेकांविरुद्ध वक्तव्य समोर येत आहेत. पीडितेच्या कुटुंबाचा अधिक विचार करायला हवा, असे मुख्यमंत्र्यांनी अनेकदा सांगितले आहे. रेड्डी यांनी असेही म्हटले आहे की अभिनेत्याने पोलिसांकडे दुर्लक्ष केले आणि त्यांच्या निष्काळजीपणामुळे ही दुःखद घटना घडली.

पुष्पा हा चित्रपट ५ डिसेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. अल्लू अर्जुन हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये चित्रपटाच्या स्क्रिनिंगदरम्यान पोहोचला. यावेळी त्याला पाहून चाहत्यांचे नियंत्रण सुटले आणि प्रत्येकजण त्याची एक झलक पाहण्याचा प्रयत्न करत होता. चेंगराचेंगरीमुळे रेवती नावाच्या ३५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. यावेळी त्यांचा मुलगा जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी कारवाई करत पोलिसांनी अल्लू अर्जुनला १३ डिसेंबरला अटक केली. त्याला कनिष्ठ न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. मात्र, उच्च न्यायालयाने या अभिनेत्याला दिलासा देत जामीन मंजूर केला.

टॅग्स :Allu Arjunअल्लू अर्जुन