शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

Coronavirus : अद्याप कम्युनिटी ट्रांसमिशन नाही, मृतांचा आकडा 200वर - आरोग्य मंत्रालय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2020 19:57 IST

यावेळी अग्रवाल यांनी, पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्‍टन अमरिंदर सिंग यांनी राज्यात कम्‍युनिटी ट्रांसमिशनचा केलेला दावाई फेटाळून लावला. तसेच अद्याप कम्यूनिटी ट्रांसमिशन झाले नसले तरीही काळजी घेण्याची आवश्यकता आहे, असेही अग्रवाल म्हणाले.  

ठळक मुद्देदेशभरात 24 तासांत एकूण 896 नवे कोरोना बाधित आढळून आले आहेतदेशात आतापर्यंत एकूण 6761 जणांना कोरोनाची लागण झाली आहेकोरोनामुळे देशात आतापर्यंत 206 जणांचा मृत्यू झाला आहे

नवी दिल्‍ली - देशात कोरोना बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या 24 तासांत देशभरात एकूण 896 नवे कोरोना बाधित आढळून आले आहेत. तर 37 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत एकूण 6761 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 6039 सक्रिय असून 516 जण बरे हेऊन घरी परतले आहेत. तर 206 जणांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक गोष्ट ही, की अद्याप देशात कसल्याही प्रकारचे कम्‍युनिटी ट्रांसमिशन झालेले नाही, अशी माहिती आरोग्यमंत्रालयाचे संयुक्‍त सचिव लव अग्रवाल यांनी दिली.

यावेळी अग्रवाल यांनी, पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्‍टन अमरिंदर सिंग यांनी राज्यात कम्‍युनिटी ट्रांसमिशनचा केलेला दावाई फेटाळून लावला. तसेच अद्याप कम्यूनिटी ट्रांसमिशन झाले नसले तरीही आपल्याला काळजी घेण्याची आवश्यकता आहे, असेही अग्रवाल म्हणाले.  

देशात कोरोना व्हायसरची स्थिती, सुरू असलेल्या उपाय योजना आणि लॉकडाऊनच्या स्थितीसंदर्भात आज (शुक्रवारी) आरोग्यमंत्रालय आणि गृहमंत्रालयाची संयुक्‍त पत्रकार परिषद पार पडली. या पत्रार परिषदेत लव अग्रवाल बोलत होते.

अग्रवाल म्हणला गुरुवारी आपण 16,002 टेस्ट केल्या. यापैकी केवळ 0.2 टक्के लोकच पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले. कोरोना व्हायरसच्या तपासणीसाठी 146 सरकारी प्रयोगशाळा आणि 67 खासगी प्रयोगशाळांना मंजुरी देण्यात आलेली आहे.

औषधाची निर्यात करण्याचा निर्णय -

अग्रवाल म्हणाले, आपल्याला एक कोटी हाइड्रॉक्सीक्लोरोक्वाइन गोळ्यांची आवश्यकता आहे. मात्र आपल्याकडे सध्या 3.28 कोटी हाइड्रॉक्सीक्लोरोक्वाइन गोळ्या उपलब्ध आहेत. त्यामुळे काही प्रमाणावर अधिकच्या गोळ्या पाठवण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.

परराषट्रमंत्रालयाचे एएस आणि समन्वयक (कोरोना व्हायरस) दम्‍मू रवि यांनी सांगितले, की काल आपण 20,473 परदेशी नागरिकांना बाहेर काढले आहे. ही सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे. हे सर्व सरकारी प्रयत्न आहेत. तर गृहमंत्रालयाच्या संयुक्त सचिव पुण्य सलिला श्रीवास्तव म्हणाल्या, गृह मंत्रालयाने आज सर्व राज्यांना पत्र लिहून लॉकडाऊनची चांगल्या प्रकारे अंमलबजावणी करण्यात यावी. तसेच कुठल्याही प्रकारची आपत्तिजनक माहिती प्रसारित होणार नाही, यासाठी सोशल मीडियावरही लक्ष ठेवावे, असे सांगितले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतDeathमृत्यूGovernmentसरकारdelhiदिल्ली