शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

न्यायाधीशांना धमक्यांची सीबीआय चौकशीच नाही, सर्वोच्च न्यायालयाची तीव्र शब्दांत नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2021 07:43 IST

Supreme Court News: देशात कुख्यात गुंड तसेच नामवंत माणसांनी न्यायाधीशांना धमकाविल्याची प्रकरणे घडली आहेत. त्यातील काही प्रकरणांची सीबीआयने चौकशी करावी, असा कोर्टाने आदेश देऊनही सीबीआयने काहीही केलेले नाही, अशी तीव्र नाराजी सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली.

नवी दिल्ली : देशात कुख्यात गुंड तसेच नामवंत माणसांनी न्यायाधीशांना धमकाविल्याची प्रकरणे घडली आहेत. त्यातील काही प्रकरणांची सीबीआयने चौकशी करावी, असा कोर्टाने आदेश देऊनही सीबीआयने काहीही केलेले नाही, अशी तीव्र नाराजी सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली. धनबादमधील जिल्हा न्यायाधीश उत्तम आनंद यांच्या मृत्यू प्रकरणाची आता सीबीआय चौकशी करणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, न्यायाधीशांना मिळत असलेल्या धमक्यांप्रकरणी सीबीआयने वेगाने तपास केला पाहिजे. २०१९ सालीही न्यायाधीशांना धमकी दिल्याचे एक प्रकरण घडले होते. त्यावेळी केंद्र सरकारने कोर्टाला उत्तरच सादर केले नव्हते. धनबाद प्रकरणाबाबत उत्तर दाखल करण्यासाठी केंद्राला एक आठवड्याची मुदत दिली आहे. कोर्टाने सांगितले की, काही गुंड तसेच नामवंत माणसे कनिष्ठ व उच्च न्यायालयांतील न्यायाधीशांना धमक्या देतात. शारीरिक वा मानसिक त्रास देतात. व्हॉट्सॲप, फेसबुकवर धमकी देण्यापर्यंत काही जणांची मजल जाते. सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा ॲटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांना म्हणाले की, झारखंडमधील जिल्हा न्यायाधीशांच्या हत्येप्रकरणीच्या तपासात केंद्रा सहकार्य हवे आहे. त्यावर झारखंडच्या वकिलाने सांगितले की, न्या. उत्तम आनंद यांच्या हत्येच्या दिवशीच याच्या चौकशीसाठी सरकारने एसआयटी स्थापना केली आहे. त्या प्रकरणी २ जणांना अटक करून त्यांची चौकशी केली जात आहे. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्यावा, अशी शिफारस ३० जुलै रोजी करण्यात आली.  

न्यायाधीशांना सुरक्षा पुरविणे आवश्यकn सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी सांगितले की, न्यायाधीश उत्तम आनंद यांचा ज्या पद्धतीने मृत्यू झाला ती सारी घटनाच दुर्दैवी आहे. n धनबादमध्ये कोळसामाफियांचे वर्चस्व आहे. अशा माहोलमध्ये या न्यायाधीशांना सुरक्षा व्यवस्था पुरवायला हवी होती. ते झाले नाही. हे झारखंड सरकारचे अपयश आहे. न्यायाधीश उत्तम आनंद प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाने स्वत: हून दखल घेतली. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय