शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

विमानांची भरारी आजपासून पूर्ण क्षमतेने; आसन मर्यादेची अट रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2021 09:21 IST

तोट्यात असलेल्या विमान कंपन्यांना काहीसा दिलासा

मुंबई : आजपासून देशांतर्गत विमाने पूर्ण क्षमतेसह उड्डाण करणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हवाई प्रवासासाठी लागू केलेली आसन मर्यादा हटविण्याचा निर्णय केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालयाने घेतला असून, १८ ऑक्टोबरपासून देशभरात त्याची अंमलबजावणी होणार आहे. त्यामुळे तोट्यात असलेल्या विमान कंपन्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.हवाई मार्गाने कोरोनाचा प्रसार सर्वाधिक होत असल्याची चर्चा पहिल्या लाटेच्या काळात होती.  त्यामुळे प्रवाशांची सुरक्षा आणि अंतर नियम पालनासाठी विमानातील प्रवासी क्षमतेवर मर्यादा आणण्यात आल्या. लॉकडाऊनच्या दरम्यान देशांतर्गत उड्डाणांवर पूर्ण बंदी घातल्यानंतर, २५ मे, २०२० रोजी ३३ टक्के आसन क्षमतेसह ऑपरेशन्स सुरू करण्यात आली. डिसेंबर, २०२० पर्यंत हळूहळू ही मर्यादा ८० टक्क्यांपर्यंत वाढविण्यात आली. मात्र, दुसऱ्या लाटेचा प्रकोप वाढल्यामुळे १ जून, २०२१ रोजी पुन्हा एकदा वाहन क्षमता ५० टक्क्यांवर आणण्यात आली. त्यामुळे आधीच तोट्यात असलेल्या विमान कंपन्यांसमोर पेच निर्माण झाला. जूनपासून दुसऱ्या लाटेची तीव्रता कमी झाल्याने प्रवासी क्षमता पूर्ववत करण्याची मागणी विमान कंपन्यांकडून सातत्याने करण्यात येत होती.कोरोना पूर्वकाळाच्या दिशेने गेल्या काही दिवसांपासून हवाई प्रवाशांची संख्या कोरोना पूर्वकाळाच्या दिशेने वाटचाल करू लागली आहे.शिवाय सणासुदीला विमान प्रवासाची मागणी वाढल्यामुळे आसन क्षमतेची अट अडथळा ठरू लागली आहे. मुंबई, दिल्लीसारख्या महत्त्वाच्या विमानतळांवर गर्दी वाढू लागल्यामुळे, तिच्या व्यवस्थापनासाठी ही अट काढून टाकण्यात आली आहे.