शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

नको बंगला, नको सुरक्षा, वाजपेयींच्या कुटुंबीयांनी नाकारल्या सरकारी सुविधा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2018 14:41 IST

अटलजींच्या कुटुंबीयांनी पंतप्रधान कार्यालयास एका पत्राद्वारे कळवले आहे.

नवी दिल्ली - माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या साध्या अन् सरळ स्वभावाची सर्वांनाच ओळख होती. तर, देशाचे पंतप्रधानपद भुषावूनही 2004 मध्ये त्यांची संपत्ती 50 लाख एवढी होती. अटलजींनी कधीही सरकारचा स्वहितसाठी फायदा करुन घेतला नाही. आता, अटलबिहारी वाजपेयी यांच्या कुटुंबीयांनीही अटलजींच्या विचारांची कृती आपल्या कार्यातून दाखवून दिली. कारण, सरकारकडून मिळणाऱ्या सर्वच सुविधा अटलजींच्या कुटुंबीयांनी नाकारल्या आहेत. 

आमचे कुटुंब सक्षमपणे आपला खर्च भागवू शकते. त्यामुळे आम्हाला सरकारी सुविधांची आवश्यकता नाही, असे अटलजींच्या कुटुंबीयांनी पंतप्रधान कार्यालयास एका पत्राद्वारे कळवले आहे. वायपेयी यांच्या कुटुंबात त्यांची दत्तक मुलगी नमिता, जावई रंजन भट्टाचार्य, मुलगी निहारिका आणि इतर सदस्य आहेत. हे कुटुंब वाजपेयींसोबतच दिल्लीतील लुटियंस झोनच्या कृष्ण मेनन मार्गवरील सरकारी निवासस्थानात राहात आहे. मात्र, आता सरकारने हे घर सोडण्याचा निर्णय घेतला आहे. 

माजी पंतप्रधानांच्या कुटुबीयांस एसपीजी सुरक्षासह अनेक प्रकारच्या सुविधा पुरविण्यात येतात. सध्या, माजी पंतप्रधान मनमोहनसिंग आणि एच.डी. देवेगौडा यांच्या कुटुबीयांना या सुविधा मिळत आहेत. तर राजीव गांधींचे कुटुंब असल्याने सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधींच्या माजी पंतप्रधानांचे कुटुंबीय असल्यामुळए या सुविधा मिळत आहेत. 

या सुविधा मिळतात माजी पंतप्रधानांच्या कुटुंबीयांसमाजी पंतप्रधानांच्या कुटुंबीयास मोफत निवासस्थान, मोफत आरोग्य योजना, सरकारी स्टाफ, मोफत देशांतर्गत विमानप्रवास, मोफत रेल्वेप्रवास आणि एसपीजी सुरक्षांसह इतरही अनेक सुविधांचा लाभ मिळतो.  

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीdelhiदिल्ली