शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
2
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
3
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
4
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
5
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
6
"सरकार निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचे काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
7
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
8
VIDEO: अरे देवा... माकडाने ट्रेकरला मध्येच गाठलं, आधी बॅग उचकली, मग पाठीवर चढलं अन् मग...
9
धक्कादायक! या डेटिंग ॲपवरून महिलांचे हजारो फोटो लीक, प्रायव्हसी आली धोक्यात
10
'संपत्तीचे पुरावे देतो चौकशी करा'; एकनाथ खडसे म्हणाले, 'महिलांबाबत गिरीश महाजनांचे नाव पुढे का येतं?'
11
फणस खाणं महागात पडलं, ड्रिंक अँड ड्राइव्हमध्ये पकडलं; चालकांसोबत नेमकं काय घडलं?
12
१ ऑगस्टपासून लागू होणार नवे नियम, क्रेडिट कार्ड, यूपीआय, एलपीजीसह होणार हे ६ बदल, खबरदारी न घेतल्यास खिसा होणार रिकामा
13
वाल्मिक कराडचा जेलमधून माझ्यासमोर एकाला फोन आला; अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा
14
सॉवरेन गोल्ड बाँडची कमाल...! ८ वर्षांत दिला २५०% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
15
Raja Raghuvanshi : "राजाचा आत्मा अजूनही भटकतोय", भावाचा मोठा दावा; हत्येच्या ठिकाणी कुटुंबाने केलं असं काही...
16
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
17
टेलिव्हिजनवरील या अभिनेत्रीला लागला मोठा जॅकपॉट, रणबीरच्या 'रामायण'मध्ये झाली एन्ट्री
18
हृदयद्रावक! "माझी दोन्ही मुलं गेली, देवाने मला...", आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
19
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
20
Shravan Somvar 2025: श्रावण सोमवारनिमित्त मित्रांना, नातेवाईकांना पाठवा श्लोकरूपी शुभेच्छा संदेश!

'एक देश, एक निवडणूक'वर नितीश कुमारांच्या पक्षाला ही चिंता; जेपीसी बैठकीत मुद्दा काढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 15:50 IST

३९ सदस्यांची ही समिती दोन विधेयकांवर चर्चा करत आहे. एक देश, एक निवडणुकीच्या व्यवहार्यतेवर सर्वांनी बोट ठेवले आहे. या विधेयकामुळे देशात एकाच वेळी निवडणुका घेता येतील. यामुळे प्रचंड पैसा वाचेल असे सांगितले जात आहे.

एक देश, एक निवडणुकीचे विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे सोपविण्यात आले आहे. प्रत्येक खासदाराला वाचण्यासाठी निळ्या सुटकेसमधून १८०० पानांचे विधेयक देण्यात आले आहे. आजपासून या विधेयकावर या जेपीसीमध्ये चर्चा सुरु झाली आहे. यामध्ये विरोधकांचा विरोध तर आहेच पण भाजपाच्या मित्र पक्षांनीही मुद्दे काढायला सुरुवात केली आहे. यामुळे वन नेशन, वन इलेक्शनवर मित्रच सोबत नसल्याचे चित्र सध्या एनडीएमध्ये दिसत आहे. 

एक देश, एक निवडणुकीच्या व्यवहार्यतेवर सर्वांनी बोट ठेवले आहे. या विधेयकामुळे देशात एकाच वेळी निवडणुका घेता येतील. यामुळे प्रचंड पैसा वाचेल असे सांगितले जात आहे. परंतू, एकाच कार्यकाळात अनेकदा सरकार पडले तर हे विधेयक निवडणुकीचा खर्च कशाप्रकारे कमी करणार असा मुद्दा जदयूने उपस्थित केला आहे. तर वायएसआरसीपीने ईव्हीएमच्या मुद्द्यावर शंका उपस्थित केली असून बॅलेट पेपरवर पुन्हा परतण्याचा सल्ला दिला आहे. 

३९ सदस्यांची ही समिती दोन विधेयकांवर चर्चा करत आहे. लोकसभा आणि राज्यसभेच्या कार्यकाळाला एकसारखे करण्यासाठी एक विधेयक असून दुसरे केंद्र शासित प्रदेश आणि दिल्ली प्रदेशातील संबंधीत अधिनियमांमध्ये संशोधन करण्याचे आहे. एकत्र निवडणूक घेता यावी यासाठी प्रामुख्याने यात बदल करावे लागणार आहेत. बुधवारी या समितीला विधी मंत्रालयाकडून याबाबतची कागदपत्रे मिळाली आहे, असे इंडियन एक्स्प्रेसने म्हटले आहे. 

समितीच्या प्रत्येक सदस्याला माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या समितीची रिपोर्ट इंग्रजी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांत देण्यात आली आहे. याचबबरोबर मागील विधी आयोगांच्या आणि स्थायी समित्यांचे अहवालही आहेत. 

एकाच वेळी निवडणुका घेण्याची संकल्पना संविधान आणि देशाच्या संघराज्य रचनेच्या विरोधात आहे, असा सूर विरोधकांचा आहे. आदर्श आचारसंहिता फक्त ज्या राज्यांमध्ये निवडणुका होत आहेत त्या राज्यांवर परिणाम करते आणि इतर राज्यांवर नाही, असे तृणमूलचे म्हणणे आहे. तर सरकार म्हणतेय की वेगवेगळ्या वेळी निवडणुका घेतल्याने धोरणात्मक पक्षाघात होतो. यावर खूप विस्तृत असल्याने समितीने आपला अहवाल सादर करण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ मागावी अशी मागणी तृणमूलने केली आहे. 

अलटी-पलटी मारून प्रत्येकवेळा मुख्यमंत्री झालेल्या नितिशकुमारांच्या पक्षाला सारखे सारखे सरकार पडले तर निवडणुका घ्याव्याच लागतील. मग निवडणुकीचा खर्च वाचविण्याच्या उद्देशाने हे जे विधेयक आणले जातेय ते खर्च कसा कमी करणार आहे, अशी चिंता उपस्थित करत आहेत. आता या सगळ्या प्रॅक्टीकल गोष्टींतून विधेयकावर काय अहवाल येतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

टॅग्स :One Nation One Electionवन नेशन वन इलेक्शनNitish Kumarनितीश कुमारlok sabhaलोकसभा