शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
3
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
4
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
5
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
6
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
7
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
8
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
9
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
10
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
11
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
12
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
13
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
14
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
15
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
16
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
17
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
18
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
19
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
20
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
Daily Top 2Weekly Top 5

तेव्हा लालूंना वैतागलेले नितीशकुमार करणार होते भाजपामध्ये प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2017 15:40 IST

समता पार्टीच्या माजी अध्यक्षा आणि एकेकाळी केंद्रातील राजकारणामध्ये महत्त्वाच्या नेत्या असलेल्या जया जेटली यांनी आपल्या आत्मचरित्रातून एक धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे.

नवी दिल्ली - समता पार्टीच्या माजी अध्यक्षा आणि एकेकाळी केंद्रातील राजकारणामध्ये महत्त्वाच्या नेत्या असलेल्या जया जेटली यांनी आपल्या आत्मचरित्रातून एक धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे. एकेकाळी लालूंच्या कारवायांमुळे हैराण झालेले नितीश कुमार हे आपली राजकीय कारकीर्द वाचवण्यासाठी भाजपामध्ये प्रवेश करण्याचा विचार करत होते, असा उल्लेख जेटली यांनी आपल्या आत्मचरित्रात केला आहे. या आत्मचरित्रातून जेटलींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आहे. तर लालूप्रसाद यादव, शरद यादव आणि मुलायम सिंह यादव यांच्या वर टीका केली आहे. जया जेटली आपल्या आत्मचरित्रात लिहितात, आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्यामुळे त्रस्त झालेले नितीश कुमार भाजपामध्ये प्रवेश करण्यास इच्छुक होते. जर समता पक्षाची स्थापना करून आम्ही निवडणूक लढलो नसतो तर कदाचित नितीश कुमार यांनी भाजपामध्ये प्रवेश केला असता. नितीश कुमार यांनी वैयक्तित हितांना नेहमीच प्राधान्य दिले होते. त्यामुळेच जॉर्ज फर्नांडिस यांनी केले अपिल डावलून नितीश कुमार यांनी माझ्याऐवजी उद्योगपती महेंद्र प्रसाद यांना राज्यसभेवर पाठवले होते. यावेळी सहकारी पक्षांकडे झालेले दुर्लक्ष आणि अहंकार यामुळे अटल बिहारी वाजपेयी सरकारला 2004 साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत पराभव झाला होता, असा उल्लेख जया जेटली यांनी केला आहे. जेटली यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मात्र कौतुक केले आहे. त्या लिहितात, "मोदी हे त्यांच्याकडे पूर्ण बहुमत असूनही सहकारी पक्षांना सोबत घेतात. मोदी विरोधकांनाही भेटतात. त्यांच्याशी चर्चा करतात. गुजरामध्ये मोदींनी अगदी सहजपणे बदल घडवून आणला होता. पण देशात चांगले काम आणि बदल काही लोक सहजपणे मान्य करणार नाहीत." जया जेटली यांनी या आत्मचरित्रांमधून लालू, शरद आणि मुलायम सिंह या यादवांवरही जोरदार टीका केली आहे. आपल्या दीर्घ राजकीय कारकीर्दीमधील अनुभवातून विविध नेत्यांबाबतचे मतही जेटली यांनी मांडले आहे. त्या लिहितात,"लालू आणि शरद यादव हे केवळ भाषणापुरते समाजवादी आहेत. मधु लियमे. जेपी आणि राममनोहर लोहिया यांचे त्यांच्या विचारसरणीप्रमाणेच राहणीमान होते. शरद यादव यांनी मी यादव आहे, असे थेट जाहीर केले होते. तर लालू आणि मुलायम यांनी जेवढा परिवारवाद वाढवला आहे. ते पाहिले असते तर लोहिया आणि मधु लिमये यांनी ते कदापि सहन केले नसते.

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारLalu Prasad Yadavलालूप्रसाद यादव