शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव का मिळत नाही? नितीन गडकरी यांनी कारण सांगितले
2
अखेर बीएसएनएल नेटवर्क बदलणार, देशभरात या तारखेला 4G सेवा सुरु करण्याची घोषणा
3
"बेबी, आय लव्ह यू, तू खूप...", स्वयंघोषित बाबा रात्रभर पाठवायचा अश्लील मेसेज, ३५ मुलींचा छळ
4
डोळ्यांत मिरची पूड ओतली, नंतर साडीने लेकाचा गळा आवळला अन्...; जन्मदात्री आई इतकी क्रूर का झाली?
5
जगातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती लॅरी एलिसन ९५% संपत्ती दान करणार; काय आहे अट?
6
कमाल झाली राव! आता QR कोड नाही, तर फक्त अंगठ्याने करा पेमेंट; काय आहे ThumbPay?
7
भारताच्या हाती लागली मोठी शक्ती, धावत्या रेल्वेतून शत्रूवर मिसाईल डागता येणार; अग्नी प्राइमची चाचणी यशस्वी...
8
मुंबई पोलीस कॉन्स्टेबलच्या मृत्यूचं गूढ उकललं; ४ महिन्यांनी हत्येचा खुलासा, 'त्या' पत्रावर संशय
9
बाहुबली नेते राजा भैय्या यांच्या मुलांनी आईवर केले गंभीर आरोप, म्हणाले, "आमच्या घरात…’’  
10
ललिता पंचमी व्रत २०२५: शुक्रवारी इच्छापूर्तीसाठी 'असे' करा ललिता पंचमीचे व्रत; टाळा 'ही' एक चूक!
11
"हो मला बाबा व्हायचंय...", ५९व्या वर्षी सलमान खानला हवंय मूल, म्हणाला...
12
इथेनॉलचा डंख: सेकंड हँड कार, ती पण पेट्रोलची घेत असाल तर हा विचार जरूर करा...; २०२२ पूर्वीची घ्याल तर...
13
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांना मदत केलेला आरोपी सुरक्षा दलाच्या जाळ्यात; ऑपरेशन महादेवला मोठं यश
14
काश्मीर मुद्द्यावरून अमेरिकेचा पाकिस्तानला धक्का! पंतप्रधान मोदी-ट्रम्प भेटीबद्दलही केले मोठे विधान
15
'अशा' कमाईवर विशेष टॅक्स सूट नाही; कर सवलत मिळालेल्यांना थकबाकी भरावी लागणार, पण एक दिलासा...
16
"पैशाचं सोंग आणता येत नाही, मग सरकार शेतकऱ्यांना जीवन संपवू देणार का?’’, विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
17
एअरस्पेसमध्ये रशियाचा 'डिजिटल हल्ला'; स्पेनच्या संरक्षण मंत्र्यांच्या विमानाच्या जीपीएसमध्ये बिघाड, युरोपमध्ये खळबळ
18
महाराष्ट्रातील बेस्ट पर्यटन स्थळे क्लिक करा, ५ लाख जिंका; शासनाची अनोखी स्पर्धा, काय आहेत अटी?
19
नवरात्री २०२५: शुक्रवारी ललिता पंचमी, ३ शुभ योगासह, भद्रा राजयोगात ७ राशींचा भाग्योदय
20
लडाखमधील भडकलेल्या आंदोलनाचं पाकिस्तान कनेक्शन? सोनम वांगचूक यांच्या दौऱ्याबद्दल उपस्थित होताहेत शंका

तेव्हा लालूंना वैतागलेले नितीशकुमार करणार होते भाजपामध्ये प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2017 15:40 IST

समता पार्टीच्या माजी अध्यक्षा आणि एकेकाळी केंद्रातील राजकारणामध्ये महत्त्वाच्या नेत्या असलेल्या जया जेटली यांनी आपल्या आत्मचरित्रातून एक धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे.

नवी दिल्ली - समता पार्टीच्या माजी अध्यक्षा आणि एकेकाळी केंद्रातील राजकारणामध्ये महत्त्वाच्या नेत्या असलेल्या जया जेटली यांनी आपल्या आत्मचरित्रातून एक धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे. एकेकाळी लालूंच्या कारवायांमुळे हैराण झालेले नितीश कुमार हे आपली राजकीय कारकीर्द वाचवण्यासाठी भाजपामध्ये प्रवेश करण्याचा विचार करत होते, असा उल्लेख जेटली यांनी आपल्या आत्मचरित्रात केला आहे. या आत्मचरित्रातून जेटलींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आहे. तर लालूप्रसाद यादव, शरद यादव आणि मुलायम सिंह यादव यांच्या वर टीका केली आहे. जया जेटली आपल्या आत्मचरित्रात लिहितात, आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्यामुळे त्रस्त झालेले नितीश कुमार भाजपामध्ये प्रवेश करण्यास इच्छुक होते. जर समता पक्षाची स्थापना करून आम्ही निवडणूक लढलो नसतो तर कदाचित नितीश कुमार यांनी भाजपामध्ये प्रवेश केला असता. नितीश कुमार यांनी वैयक्तित हितांना नेहमीच प्राधान्य दिले होते. त्यामुळेच जॉर्ज फर्नांडिस यांनी केले अपिल डावलून नितीश कुमार यांनी माझ्याऐवजी उद्योगपती महेंद्र प्रसाद यांना राज्यसभेवर पाठवले होते. यावेळी सहकारी पक्षांकडे झालेले दुर्लक्ष आणि अहंकार यामुळे अटल बिहारी वाजपेयी सरकारला 2004 साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत पराभव झाला होता, असा उल्लेख जया जेटली यांनी केला आहे. जेटली यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मात्र कौतुक केले आहे. त्या लिहितात, "मोदी हे त्यांच्याकडे पूर्ण बहुमत असूनही सहकारी पक्षांना सोबत घेतात. मोदी विरोधकांनाही भेटतात. त्यांच्याशी चर्चा करतात. गुजरामध्ये मोदींनी अगदी सहजपणे बदल घडवून आणला होता. पण देशात चांगले काम आणि बदल काही लोक सहजपणे मान्य करणार नाहीत." जया जेटली यांनी या आत्मचरित्रांमधून लालू, शरद आणि मुलायम सिंह या यादवांवरही जोरदार टीका केली आहे. आपल्या दीर्घ राजकीय कारकीर्दीमधील अनुभवातून विविध नेत्यांबाबतचे मतही जेटली यांनी मांडले आहे. त्या लिहितात,"लालू आणि शरद यादव हे केवळ भाषणापुरते समाजवादी आहेत. मधु लियमे. जेपी आणि राममनोहर लोहिया यांचे त्यांच्या विचारसरणीप्रमाणेच राहणीमान होते. शरद यादव यांनी मी यादव आहे, असे थेट जाहीर केले होते. तर लालू आणि मुलायम यांनी जेवढा परिवारवाद वाढवला आहे. ते पाहिले असते तर लोहिया आणि मधु लिमये यांनी ते कदापि सहन केले नसते.

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारLalu Prasad Yadavलालूप्रसाद यादव