शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

मोदी मुख्यमंत्री असताना मदत नाकारणारे नितीश कुमार आता मात्र 500 कोटींची मदत घेण्यात तयार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2017 08:45 IST

2010 रोजी नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते, तेव्हादेखील बिहारमध्ये पूर आल्यानंतर पाच कोटींचा चेक पाठवण्यात आला होता. मात्र नितीश कुमार यांनी चेक घेण्यास नकार देत पुन्हा पाठवला होता. 

ठळक मुद्देनितीश कुमार गुजरातकडून देण्यात येणारी पाच कोटींची मदत स्विकारणारनरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना नितीश कुमार यांनी मदत नाकारली होतीयावेळी पंतप्रधान मोदींनी 500 कोटींची मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे

नवी दिल्ली, दि. 6 - बिहारमधील पूरपरिस्थितीशी सामना करण्यासाठी गुजरात सरकारकडून देण्यात येणारी मदत मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी स्विकारली आहे अशी माहिती अधिका-यांनी दिली आहे. विशेष म्हणजे गेल्या सात वर्षात जे नितीश कुमार यांनी कधीच केलं नाही ते यावेळी करत आहेत. बिहारमध्ये पुराने थैमान घातल्यामुळे गुजरात सरकारने पाच कोटींचा मदतीचा चेक दिला आहे, जो नितीश कुमार यांनी स्विकारला आहे. महत्वाचं म्हणजे जेव्हा 2010 रोजी नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते, तेव्हादेखील बिहारमध्ये पूर आल्यानंतर पाच कोटींचा चेक पाठवण्यात आला होता. मात्र नितीश कुमार यांनी चेक घेण्यास नकार देत पुन्हा पाठवला होता. 

आता पुन्हा एकदा बिहारमध्ये पूर आला आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बिहारच्या मदतीसाठी 500 कोटींचं पॅकेज देण्याचं आश्वासन दिलं आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल करताना जेडीयूला सामील करण्यात आलं नसतानाही नितीश कुमार यांनी ही मदत स्विकारली आहे. केंद्रीय मंत्रीमंडळ विस्तारात स्थान मिळालेले नऊच्या नऊ मंत्री भाजपाचे आहेत.

एका महिन्यापुर्वी एनडीएसोबत आलेल्या नितीश कुमार यांच्या पक्षाला मोदींच्या मंत्रिमंडळात एक ते दोन जागा मिळतील असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र नितीश कुमार यांनी आपल्याला प्रसारमाध्यमांकडून मंत्रीमंडळ विस्ताराची माहिती मिळाल्याचं सांगितल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. यावरुन लालू प्रसाद यांनी नितीश कुमारांची खिल्ली उडवण्याची संधी सोडली नाही. 'जेडीयूच्या काही नेत्यांनी शपथविधी कार्यक्रमात सामील होण्यासाठी कुर्ता - पायजमा शिवून ठेवला होता. पण त्यांना आमंत्रणच मिळालं नाही', अशी खिल्ली लालू प्रसाद यादव यांनी उडवली होती. 

बिहारमधील पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नितीश कुमारांचं जेवणाचं आमंत्रणही नाकारलं असल्याचा दावा लालू प्रसाद यादव यांनी केला. 2010 रोजी भाजपाने डिनरच आमंत्रण देऊनही नितीश कुमार यांनी ते नाकारलं होतं, कारण त्यामध्ये नरेंद्र मोदी सामील होणार होते. मोदींचं आमंत्रण न स्विकारण्यामागे हेच कारण असल्याचं बोललं जात आहे. 

2010 मधील हे राजकीय युद्ध तेव्हा सुरु झालं, जेव्हा पाटणामधील काही वृत्तपत्रांमधील पहिल्या पानावर बिहार पुरासाठी गुजरातचे मुख्यमंत्री मदत करत असल्याची जाहिरात छापण्यात आली होती. यावरुन संतापलेल्या नितीश कुमार यांनी फक्त भाजपाचं डिनर आमंत्रण धुडकावून लावलं नाही, तर दोन वर्षांपुर्वी पूर मदतीसाठी देण्यात आलेला चेकही परत करुन टाकला. 

यानंतर तीन वर्षांनी 2014 रोजी जेव्हा नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आलं तेव्हा नितीश कुमार यांनी भाजपासोबतची आपली 17 वर्षांची युती तोडली होती. गेल्या महिन्यात पुन्हा एकदा नितीश कुमार यांनी महाआघाडीतून माघार घेत एनडीएशी हातमिळवणी केली आहे. 

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा