शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

मोदी मुख्यमंत्री असताना मदत नाकारणारे नितीश कुमार आता मात्र 500 कोटींची मदत घेण्यात तयार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2017 08:45 IST

2010 रोजी नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते, तेव्हादेखील बिहारमध्ये पूर आल्यानंतर पाच कोटींचा चेक पाठवण्यात आला होता. मात्र नितीश कुमार यांनी चेक घेण्यास नकार देत पुन्हा पाठवला होता. 

ठळक मुद्देनितीश कुमार गुजरातकडून देण्यात येणारी पाच कोटींची मदत स्विकारणारनरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना नितीश कुमार यांनी मदत नाकारली होतीयावेळी पंतप्रधान मोदींनी 500 कोटींची मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे

नवी दिल्ली, दि. 6 - बिहारमधील पूरपरिस्थितीशी सामना करण्यासाठी गुजरात सरकारकडून देण्यात येणारी मदत मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी स्विकारली आहे अशी माहिती अधिका-यांनी दिली आहे. विशेष म्हणजे गेल्या सात वर्षात जे नितीश कुमार यांनी कधीच केलं नाही ते यावेळी करत आहेत. बिहारमध्ये पुराने थैमान घातल्यामुळे गुजरात सरकारने पाच कोटींचा मदतीचा चेक दिला आहे, जो नितीश कुमार यांनी स्विकारला आहे. महत्वाचं म्हणजे जेव्हा 2010 रोजी नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते, तेव्हादेखील बिहारमध्ये पूर आल्यानंतर पाच कोटींचा चेक पाठवण्यात आला होता. मात्र नितीश कुमार यांनी चेक घेण्यास नकार देत पुन्हा पाठवला होता. 

आता पुन्हा एकदा बिहारमध्ये पूर आला आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बिहारच्या मदतीसाठी 500 कोटींचं पॅकेज देण्याचं आश्वासन दिलं आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल करताना जेडीयूला सामील करण्यात आलं नसतानाही नितीश कुमार यांनी ही मदत स्विकारली आहे. केंद्रीय मंत्रीमंडळ विस्तारात स्थान मिळालेले नऊच्या नऊ मंत्री भाजपाचे आहेत.

एका महिन्यापुर्वी एनडीएसोबत आलेल्या नितीश कुमार यांच्या पक्षाला मोदींच्या मंत्रिमंडळात एक ते दोन जागा मिळतील असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र नितीश कुमार यांनी आपल्याला प्रसारमाध्यमांकडून मंत्रीमंडळ विस्ताराची माहिती मिळाल्याचं सांगितल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. यावरुन लालू प्रसाद यांनी नितीश कुमारांची खिल्ली उडवण्याची संधी सोडली नाही. 'जेडीयूच्या काही नेत्यांनी शपथविधी कार्यक्रमात सामील होण्यासाठी कुर्ता - पायजमा शिवून ठेवला होता. पण त्यांना आमंत्रणच मिळालं नाही', अशी खिल्ली लालू प्रसाद यादव यांनी उडवली होती. 

बिहारमधील पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नितीश कुमारांचं जेवणाचं आमंत्रणही नाकारलं असल्याचा दावा लालू प्रसाद यादव यांनी केला. 2010 रोजी भाजपाने डिनरच आमंत्रण देऊनही नितीश कुमार यांनी ते नाकारलं होतं, कारण त्यामध्ये नरेंद्र मोदी सामील होणार होते. मोदींचं आमंत्रण न स्विकारण्यामागे हेच कारण असल्याचं बोललं जात आहे. 

2010 मधील हे राजकीय युद्ध तेव्हा सुरु झालं, जेव्हा पाटणामधील काही वृत्तपत्रांमधील पहिल्या पानावर बिहार पुरासाठी गुजरातचे मुख्यमंत्री मदत करत असल्याची जाहिरात छापण्यात आली होती. यावरुन संतापलेल्या नितीश कुमार यांनी फक्त भाजपाचं डिनर आमंत्रण धुडकावून लावलं नाही, तर दोन वर्षांपुर्वी पूर मदतीसाठी देण्यात आलेला चेकही परत करुन टाकला. 

यानंतर तीन वर्षांनी 2014 रोजी जेव्हा नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आलं तेव्हा नितीश कुमार यांनी भाजपासोबतची आपली 17 वर्षांची युती तोडली होती. गेल्या महिन्यात पुन्हा एकदा नितीश कुमार यांनी महाआघाडीतून माघार घेत एनडीएशी हातमिळवणी केली आहे. 

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा