शहरं
Join us  
Trending Stories
1
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
2
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
3
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
4
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
5
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...
6
पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..." 
7
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
8
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
9
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!
10
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?
11
उमेश सहकलाकार नसता तर मी हा सिनेमा केला नसता, प्रिया बापटने सांगितलं कारण
12
२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या
13
गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू
14
१०% नं घसरलाय हा शेअर, पण अजूनही IPO च्या किंमतीपेक्षा ६०% नं अधिक; काय म्हणाले एक्सपर्ट?
15
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
16
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
17
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
18
अंकिता लोखंडेचा नवरा रुग्णालयात दाखल; हाताला ४५ टाके अन्... मित्राने शेअर केली पोस्ट
19
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
20
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?

NDA सोडून INDIA आघाडीसोबत जाणार नितीश कुमार?; बिहारमध्ये पुन्हा एकदा चर्चेला उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2024 15:01 IST

एनडीएचे घटक असलेले नितीश कुमार यांच्या नाराजीची चर्चा पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. त्याला विरोधकांकडूनही खतपाणी घातलं जात आहे. 

बक्सर - बिहारच्या राजकारणात नितीश कुमारांची खासियत थ्री सी म्हणजेच क्राइम, करप्शन आणि कम्युनलिज्म याबाबत झीरो टॉलरेंस अशी आहे. मात्र त्याचसोबत आघाडीच्या राजकारणात पलटी मारणं हेसुद्धा आहे. त्यामुळे वारंवार पलटी मारणाऱ्या बातम्यांमध्ये नितीश कुमार सातत्याने चर्चेत असतात. बिहारला पुन्हा एकदा विशेष राज्याचा दर्जा मिळाला नाही. त्यामुळे नितीश कुमार लवकरच इंडिया आघाडीसोबत येतील अशी चर्चा आहे. त्यात काँग्रेसच्या एका आमदारानं या चर्चेला बळ दिलं आहे.

काँग्रेस आमदार संजय तिवारी उर्फ मुन्ना यांनी म्हटलं की, नाराज असलेले नितीश कुमार लवकरच एनडीएची साथ सोडून महाआघाडीसोबत येणार आहेत. त्यांच्या नाराजी मागचं कारण म्हणजे त्यांचे ड्रीम असलेले बिहार राज्याला विशेष राज्याचा दर्जा मिळवणं ते झालं नाही. केंद्र सरकारच्या थेट नकारामुळे नितीश कुमार इतके नाराज झाले की त्यामुळे ते नीती आयोगाच्या बैठकीलाही हजर राहिले नाहीत असं त्यांनी सांगितले.

वारंवार का होते नाराजीची चर्चा?

अशाप्रकारे नाराजीच्या बातम्या चर्चेत येण्यास स्वत:नितीश कुमार कारण आहेत. त्यांच्यासोबत काम करणाऱ्या राजकीय सहकाऱ्यांनाही ते कुठल्या कारणाने नाराज होतील आणि खुश होतील हे माहिती होत नाही. परंतु त्यांची राजकीय नाराजी ही त्यांच्या निकटवर्तीयांच्या खांद्यावर बंदूक ठेवूनच होते. एनडीएत जायचे असेल तर त्यांच्या जवळचे संजय झा यांचं मत असल्याचं सांगतात आणि महाआघाडीत जायचं असेल तर ते विजेंद्र यादव यांचं नाव घेतात.

नितीश कुमार हे राजकारण स्वत:भोवती ठेवण्यासाठी आणि त्याचवेळी समोरच्या व्यक्तीला आपली राजकीय स्थिती दाखवण्यासाठी हे करतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे आणि त्यासाठी नितीश कुमार यांनी जे दोन शब्द सर्वाधिक वापरले ते म्हणजे जातीयवाद आणि जंगलराज. जंगलराज म्हणत एनडीएमध्ये आणि जातीयवादाचा आरोप करत महाआघाडीसोबत जात मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीच्या सुरक्षिततेने राजकीय पोकळी भरत आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या जवळच्यांनाही त्यांचा विवेक कधी जागृत होतो ते कळत नाही आणि मग एका झटक्यात नितीश कुमार आपला पत्ता बदलतात.मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याबाबत सातत्याने पलटी मारण्याची भाषा होते. ते कुठल्याही गोष्टीवरून नाराज होतात. आता मुख्यमंत्रिपदाची खुर्चीच नाही तर पक्षही वाचवायचा आहे त्यामुळे कधी इथे तर कधी तिथे असं त्यांचे राजकारण असते.    

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारBJPभाजपाINDIA Opposition Allianceइंडिया आघाडीNational Democratic Allianceराष्ट्रीय लोकशाही आघाडी