शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

NDA सोडून INDIA आघाडीसोबत जाणार नितीश कुमार?; बिहारमध्ये पुन्हा एकदा चर्चेला उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2024 15:01 IST

एनडीएचे घटक असलेले नितीश कुमार यांच्या नाराजीची चर्चा पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. त्याला विरोधकांकडूनही खतपाणी घातलं जात आहे. 

बक्सर - बिहारच्या राजकारणात नितीश कुमारांची खासियत थ्री सी म्हणजेच क्राइम, करप्शन आणि कम्युनलिज्म याबाबत झीरो टॉलरेंस अशी आहे. मात्र त्याचसोबत आघाडीच्या राजकारणात पलटी मारणं हेसुद्धा आहे. त्यामुळे वारंवार पलटी मारणाऱ्या बातम्यांमध्ये नितीश कुमार सातत्याने चर्चेत असतात. बिहारला पुन्हा एकदा विशेष राज्याचा दर्जा मिळाला नाही. त्यामुळे नितीश कुमार लवकरच इंडिया आघाडीसोबत येतील अशी चर्चा आहे. त्यात काँग्रेसच्या एका आमदारानं या चर्चेला बळ दिलं आहे.

काँग्रेस आमदार संजय तिवारी उर्फ मुन्ना यांनी म्हटलं की, नाराज असलेले नितीश कुमार लवकरच एनडीएची साथ सोडून महाआघाडीसोबत येणार आहेत. त्यांच्या नाराजी मागचं कारण म्हणजे त्यांचे ड्रीम असलेले बिहार राज्याला विशेष राज्याचा दर्जा मिळवणं ते झालं नाही. केंद्र सरकारच्या थेट नकारामुळे नितीश कुमार इतके नाराज झाले की त्यामुळे ते नीती आयोगाच्या बैठकीलाही हजर राहिले नाहीत असं त्यांनी सांगितले.

वारंवार का होते नाराजीची चर्चा?

अशाप्रकारे नाराजीच्या बातम्या चर्चेत येण्यास स्वत:नितीश कुमार कारण आहेत. त्यांच्यासोबत काम करणाऱ्या राजकीय सहकाऱ्यांनाही ते कुठल्या कारणाने नाराज होतील आणि खुश होतील हे माहिती होत नाही. परंतु त्यांची राजकीय नाराजी ही त्यांच्या निकटवर्तीयांच्या खांद्यावर बंदूक ठेवूनच होते. एनडीएत जायचे असेल तर त्यांच्या जवळचे संजय झा यांचं मत असल्याचं सांगतात आणि महाआघाडीत जायचं असेल तर ते विजेंद्र यादव यांचं नाव घेतात.

नितीश कुमार हे राजकारण स्वत:भोवती ठेवण्यासाठी आणि त्याचवेळी समोरच्या व्यक्तीला आपली राजकीय स्थिती दाखवण्यासाठी हे करतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे आणि त्यासाठी नितीश कुमार यांनी जे दोन शब्द सर्वाधिक वापरले ते म्हणजे जातीयवाद आणि जंगलराज. जंगलराज म्हणत एनडीएमध्ये आणि जातीयवादाचा आरोप करत महाआघाडीसोबत जात मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीच्या सुरक्षिततेने राजकीय पोकळी भरत आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या जवळच्यांनाही त्यांचा विवेक कधी जागृत होतो ते कळत नाही आणि मग एका झटक्यात नितीश कुमार आपला पत्ता बदलतात.मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याबाबत सातत्याने पलटी मारण्याची भाषा होते. ते कुठल्याही गोष्टीवरून नाराज होतात. आता मुख्यमंत्रिपदाची खुर्चीच नाही तर पक्षही वाचवायचा आहे त्यामुळे कधी इथे तर कधी तिथे असं त्यांचे राजकारण असते.    

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारBJPभाजपाINDIA Opposition Allianceइंडिया आघाडीNational Democratic Allianceराष्ट्रीय लोकशाही आघाडी