शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

NDA सोडून INDIA आघाडीसोबत जाणार नितीश कुमार?; बिहारमध्ये पुन्हा एकदा चर्चेला उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2024 15:01 IST

एनडीएचे घटक असलेले नितीश कुमार यांच्या नाराजीची चर्चा पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. त्याला विरोधकांकडूनही खतपाणी घातलं जात आहे. 

बक्सर - बिहारच्या राजकारणात नितीश कुमारांची खासियत थ्री सी म्हणजेच क्राइम, करप्शन आणि कम्युनलिज्म याबाबत झीरो टॉलरेंस अशी आहे. मात्र त्याचसोबत आघाडीच्या राजकारणात पलटी मारणं हेसुद्धा आहे. त्यामुळे वारंवार पलटी मारणाऱ्या बातम्यांमध्ये नितीश कुमार सातत्याने चर्चेत असतात. बिहारला पुन्हा एकदा विशेष राज्याचा दर्जा मिळाला नाही. त्यामुळे नितीश कुमार लवकरच इंडिया आघाडीसोबत येतील अशी चर्चा आहे. त्यात काँग्रेसच्या एका आमदारानं या चर्चेला बळ दिलं आहे.

काँग्रेस आमदार संजय तिवारी उर्फ मुन्ना यांनी म्हटलं की, नाराज असलेले नितीश कुमार लवकरच एनडीएची साथ सोडून महाआघाडीसोबत येणार आहेत. त्यांच्या नाराजी मागचं कारण म्हणजे त्यांचे ड्रीम असलेले बिहार राज्याला विशेष राज्याचा दर्जा मिळवणं ते झालं नाही. केंद्र सरकारच्या थेट नकारामुळे नितीश कुमार इतके नाराज झाले की त्यामुळे ते नीती आयोगाच्या बैठकीलाही हजर राहिले नाहीत असं त्यांनी सांगितले.

वारंवार का होते नाराजीची चर्चा?

अशाप्रकारे नाराजीच्या बातम्या चर्चेत येण्यास स्वत:नितीश कुमार कारण आहेत. त्यांच्यासोबत काम करणाऱ्या राजकीय सहकाऱ्यांनाही ते कुठल्या कारणाने नाराज होतील आणि खुश होतील हे माहिती होत नाही. परंतु त्यांची राजकीय नाराजी ही त्यांच्या निकटवर्तीयांच्या खांद्यावर बंदूक ठेवूनच होते. एनडीएत जायचे असेल तर त्यांच्या जवळचे संजय झा यांचं मत असल्याचं सांगतात आणि महाआघाडीत जायचं असेल तर ते विजेंद्र यादव यांचं नाव घेतात.

नितीश कुमार हे राजकारण स्वत:भोवती ठेवण्यासाठी आणि त्याचवेळी समोरच्या व्यक्तीला आपली राजकीय स्थिती दाखवण्यासाठी हे करतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे आणि त्यासाठी नितीश कुमार यांनी जे दोन शब्द सर्वाधिक वापरले ते म्हणजे जातीयवाद आणि जंगलराज. जंगलराज म्हणत एनडीएमध्ये आणि जातीयवादाचा आरोप करत महाआघाडीसोबत जात मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीच्या सुरक्षिततेने राजकीय पोकळी भरत आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या जवळच्यांनाही त्यांचा विवेक कधी जागृत होतो ते कळत नाही आणि मग एका झटक्यात नितीश कुमार आपला पत्ता बदलतात.मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याबाबत सातत्याने पलटी मारण्याची भाषा होते. ते कुठल्याही गोष्टीवरून नाराज होतात. आता मुख्यमंत्रिपदाची खुर्चीच नाही तर पक्षही वाचवायचा आहे त्यामुळे कधी इथे तर कधी तिथे असं त्यांचे राजकारण असते.    

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारBJPभाजपाINDIA Opposition Allianceइंडिया आघाडीNational Democratic Allianceराष्ट्रीय लोकशाही आघाडी