शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : टॉस जिंकून फसलो! थेट शुभमन गिलचं नाव घेत सूर्या म्हणाला, तो पहिल्याच बॉलवर आउट झाला अन्...
2
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
3
‘गोल्डन डक’मुळं गिलच्या निवडीवर प्रश्नचिन्ह; संजूसह टीम इंडियातील ‘वशीलेबाजी’चा मुद्दा पुन्हा चर्चेत
4
धोकादायक सेस इमारतींचा तिढा सुटला; मुंबई 'पागडीमुक्त' होणार, पुनर्विकाच्या नव्या नियमावलीची शिंदेंकडून घोषणा
5
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा पलटवार; घरच्या मैदानात टीम इंडियावर ओढावली T20I मधील सर्वात मोठ्या पराभवाची नामुष्की
6
वसंत मोरे थोडक्यात बचावले; नवले पुलावरील अपघातांवर बोलत असतानाच भरधाव टेम्पो आला अन्..
7
VIDEO : अर्शदीपची ओव्हर संपता संपेना; लाजिरवाण्या रेकॉर्डनंतर डगआउटमध्ये बसलेला गंभीर चिडला!
8
नीलेश घायवळ न्यायालयाकडून फरार घोषित; संपूर्ण मालमत्ता जप्त होण्याची शक्यता
9
FIH Hockey Men’s Junior World Cup 2025 : भारताच्या युवा हॉकी संघाचे PM मोदींकडून खास शब्दांत कौतुक, म्हणाले...
10
"एकदा भावाचा टी-शर्ट घालून मॅच खेळायला गेले अन्..."; महिला क्रिकेटर शेफालीचा धमाल किस्सा
11
IND vs SA : विकेटमागे जितेशची चपळाई! क्विंटन डी कॉकवर ओढावली 'नर्व्हस नाइंटी'ची नामुष्की (VIDEO)
12
"ते पार्ट टाइम पॉलिटिशियन, त्यांना गोपनीय परदेश दौऱ्यांचा छंद..."; मुस्लीम महिला नेत्या राहुल गांधींवर स्पष्टच बोलल्या
13
Indigo ला साडेसाती भोवली? दोन शत्रू ग्रहांमुळे अशी ‘दशा’ झाली; २०२७ पर्यंत आव्हान कायम अन्…
14
लुथरा बंधूंची अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली; HC म्हणाले, “जिवाला धोका असल्याचा पुरावा...”
15
"मी स्वतःच फॉर्म भरला नाही, आता दंगलखोरांच्या पक्षासमोर...!" SIR वरून ममतांचा हल्लाबोल
16
इम्रान खानच्या तुरुंगात अडचणी आणखी वाढणार! पाकिस्तानने २४ तासात घेतले ५ मोठे निर्णय
17
"'मी गोमांस खातो, कोण मला अडवतं?', म्हणणाऱ्या मंत्र्यासोबत अमित शाह जेवताहेत, हिम्मत असेल तर...!"; उद्धव ठाकरे यांचं थेट आव्हान
18
T20 World Cup 2026 Tickets Live: ICC चा ऐतिहासिक निर्णय! फक्त १०० रुपयांत बूक करा वर्ल्ड कपचं तिकीट
19
"खुर्चीसाठी स्वत:चं पायपुसणं करून घेणाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांवर बोलू नये"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
20
IND vs SA 2nd T20I : अखेर सूर्या भाऊनं डाव साधला! टॉसचा बॉस होण्यासाठी यावेळी आजमावला हा फंडा
Daily Top 2Weekly Top 5

"तुम्ही लहान होतात, तुमच्या आई-वडीलांच्या सरकारमध्ये..."; नितीश यांनी तेजस्वी यादवांना सुनावलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 18:37 IST

Nitish Kumar vs Tejashwi Yadav, Bihar Politics: बिहार विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात रंगला वाद

Nitish Kumar vs Tejashwi Yadav, Bihar Politics: बिहार विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी बुधवारी सभागृहाचे कामकाज सुरू झाले, तेव्हा वातावरण चांगलेच तापले. सभागृहाचे कामकाज सुरू होताच तेजस्वी यादव यांनी SIRच्या मुद्द्यावर सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. तेजस्वी यादव यांच्या मागणीनुसार, विधानसभा अध्यक्ष नंद किशोर यादव यांनीही सर्व पक्षांना या मुद्द्यावर त्यांचे मत मांडण्यासाठी वेळ दिला होता. पण राजद आमदाराच्या विधानानंतर सभागृह तहकूब करण्यात आले.

"सभागृह कुणाच्याही बापाचं नाही"

तेजस्वी यादव यांनी सभागृहात बोलायला सुरुवात केली, तेव्हा सत्ताधारी पक्षाच्या काही सदस्यांनी गोंधळ सुरू केला. यावर राजद आमदार भाई वीरेंद्र म्हणाले की, 'सभागृह कोणाच्याही बापाचे नाही. विरोधकांनाही येथे आपले विचार मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे.' भाई वीरेंद्र यांच्या या विधानानंतर सभागृहाचे वातावरण पूर्णपणे तापले. यानंतर सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे सदस्य एकमेकांशी भिडले. संपूर्ण सभागृहात जोरदार वाद आणि आरडाओरडा सुरू झाली. या सगळ्यानंतर सभागृहाचे वातावरण इतके बिघडले की विधानसभा अध्यक्ष नंद किशोर यादव यांनी सभागृहाचे कामकाज तहकूब केले. या दरम्यान विधानसभा अध्यक्षांनी भाई वीरेंद्र यांना माफी मागण्यास सांगितले.

मुख्यमंत्री नितीश यांचे विकासाचे भाषण

तेजस्वी यांनी संवाद सुरू केला, तेव्हा पहिल्यांदाच मुख्यमंत्री नितीश कुमार मध्यभागी उभे राहिले आणि त्यांनी बिहारसाठी काय काम केले आहे हे सांगितले. मुख्यमंत्री म्हणाले, "२००५ पूर्वी बिहारमध्ये कोणत्या प्रकारची व्यवस्था होती? आम्ही पाहिले आहे. लोक संध्याकाळी ५ नंतर घराबाहेर पडत नव्हते. अराजकतेचे वातावरण होते. तुम्ही तेव्हा लहान होतात. तुमच्या आई-वडीलांची सत्ता असताना येथे काय घडायचे हे तुम्हाला कसे कळणार? आम्ही कसे काम केले आणि बिहारला योग्य मार्गावर आणले, ते आम्हालाच माहिती आहे," असे बिहारचे मुख्यमंत्री म्हणाले.

"जनता सांगेल की कोणी काय केले?"

"आम्हाला जनतेने दोनदा संधी दिली, पण तरीही तुम्ही लोक तेच करत राहिलात. मग आम्ही बिहारच्या विकासासाठी काम करू लागलो. बिहारची आता काय स्थिती आहे? हे सर्वांसमोर आहे. येत्या काही दिवसांत निवडणुका होणार आहेत आणि सर्वांना निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. त्यावेळी जनता सांगेल की कोणी काय केले?" असे नितीश कुमार यांनी ठणकावले.

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारTejashwi Yadavतेजस्वी यादवBiharबिहार