शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

"तुम्ही लहान होतात, तुमच्या आई-वडीलांच्या सरकारमध्ये..."; नितीश यांनी तेजस्वी यादवांना सुनावलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 18:37 IST

Nitish Kumar vs Tejashwi Yadav, Bihar Politics: बिहार विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात रंगला वाद

Nitish Kumar vs Tejashwi Yadav, Bihar Politics: बिहार विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी बुधवारी सभागृहाचे कामकाज सुरू झाले, तेव्हा वातावरण चांगलेच तापले. सभागृहाचे कामकाज सुरू होताच तेजस्वी यादव यांनी SIRच्या मुद्द्यावर सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. तेजस्वी यादव यांच्या मागणीनुसार, विधानसभा अध्यक्ष नंद किशोर यादव यांनीही सर्व पक्षांना या मुद्द्यावर त्यांचे मत मांडण्यासाठी वेळ दिला होता. पण राजद आमदाराच्या विधानानंतर सभागृह तहकूब करण्यात आले.

"सभागृह कुणाच्याही बापाचं नाही"

तेजस्वी यादव यांनी सभागृहात बोलायला सुरुवात केली, तेव्हा सत्ताधारी पक्षाच्या काही सदस्यांनी गोंधळ सुरू केला. यावर राजद आमदार भाई वीरेंद्र म्हणाले की, 'सभागृह कोणाच्याही बापाचे नाही. विरोधकांनाही येथे आपले विचार मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे.' भाई वीरेंद्र यांच्या या विधानानंतर सभागृहाचे वातावरण पूर्णपणे तापले. यानंतर सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे सदस्य एकमेकांशी भिडले. संपूर्ण सभागृहात जोरदार वाद आणि आरडाओरडा सुरू झाली. या सगळ्यानंतर सभागृहाचे वातावरण इतके बिघडले की विधानसभा अध्यक्ष नंद किशोर यादव यांनी सभागृहाचे कामकाज तहकूब केले. या दरम्यान विधानसभा अध्यक्षांनी भाई वीरेंद्र यांना माफी मागण्यास सांगितले.

मुख्यमंत्री नितीश यांचे विकासाचे भाषण

तेजस्वी यांनी संवाद सुरू केला, तेव्हा पहिल्यांदाच मुख्यमंत्री नितीश कुमार मध्यभागी उभे राहिले आणि त्यांनी बिहारसाठी काय काम केले आहे हे सांगितले. मुख्यमंत्री म्हणाले, "२००५ पूर्वी बिहारमध्ये कोणत्या प्रकारची व्यवस्था होती? आम्ही पाहिले आहे. लोक संध्याकाळी ५ नंतर घराबाहेर पडत नव्हते. अराजकतेचे वातावरण होते. तुम्ही तेव्हा लहान होतात. तुमच्या आई-वडीलांची सत्ता असताना येथे काय घडायचे हे तुम्हाला कसे कळणार? आम्ही कसे काम केले आणि बिहारला योग्य मार्गावर आणले, ते आम्हालाच माहिती आहे," असे बिहारचे मुख्यमंत्री म्हणाले.

"जनता सांगेल की कोणी काय केले?"

"आम्हाला जनतेने दोनदा संधी दिली, पण तरीही तुम्ही लोक तेच करत राहिलात. मग आम्ही बिहारच्या विकासासाठी काम करू लागलो. बिहारची आता काय स्थिती आहे? हे सर्वांसमोर आहे. येत्या काही दिवसांत निवडणुका होणार आहेत आणि सर्वांना निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. त्यावेळी जनता सांगेल की कोणी काय केले?" असे नितीश कुमार यांनी ठणकावले.

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारTejashwi Yadavतेजस्वी यादवBiharबिहार