शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

नितीशकुमारांनी INDIA आघाडीचं संयोजकपद नाकारलं, 'हे' नाव सूचवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2024 16:38 IST

इंडिया आघाडीच्या बैठकीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या बैठकीला गैहजर आहेत.

नवी दिल्ली - आगामी लोकसभा निवडणुकांच रणधुमाळी जोरात सुरू असून सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. सत्ताधारी विकासामांच्या माध्यमातून मिरवत आहेत. तर, विरोधकही एकजुटीची मूट बांधताना दिसत आहेत. सध्या, विरोधकांच्या इंडिया आघाडीत सध्या जागावाटपावर चर्चा सुरू आहे. लवकरच जागावाटपाचे सूत्र निश्चित केले जाण्याची शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज इंडिया आघाडीच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या नेत्यांची बैठक संपन्न झाली. त्यामध्ये १४ पक्षांचे नेते सहभागी झाले होते. या बैठकीत बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी इंडिया आघाडीचं संयोजकपद नाकारलं.  

इंडिया आघाडीच्या बैठकीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या बैठकीला गैहजर आहेत. तर, काँग्रेसचे नेते राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी बैठकीत व्हिडिओ कॉन्फरेन्सिंगद्वारे ऑनलाइन उपस्थिती दर्शवली. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचीच संयोजकपदी निवड व्हावी यासाठी संयुक्त जनता दल (जदयू) पक्षाकडून इंडिया आघाडीवर दबाव टाकला जात असल्याचे वृत्त होते. मात्र, या बैठकीत नितीशकुमार यांना इंडिया आघाडीचे संजोयक बनवण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला. पण, स्वत: नितीशकुमार यांनी तो प्रस्ताव नाकारला. त्यानंतर, त्यांनी लालू प्रसाद यादव यांचं नाव संयोजक पदासाठी सूचवलं. 

लालू यादव हे सर्वात वरिष्ठ नेते आहेत, म्हणून या आघाडीचे संजोयकपद त्यांनाच द्यायला हवं. तर, काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष आहे, त्यामुळे इंडिया आघाडीचे चेअरमनपद काँग्रेसकडेच असावे, असेही त्यांनी म्हटले. या आघाडीत मी कुठल्याही पदावर न राहता काम करेल, असेही त्यांनी स्पष्ट केल्याचे समजते. 

दरम्याान, काँग्रेस नेते सिताराम येचुरी, सोनिया गांधींसह इतर ब्लॉकच्या नेत्यांनी नितीशकुमार यांचे नाव संयोजकपदासाठी समोर आणले होते. या बैठकीला जदयुकडून स्वत: नितीशकुमार आणि पक्षाचे माजी अध्यक्ष ललनसिंह व संजय झा सहभागी झाले होते. नितीश कुमार यांनी, या बैठकीत बोलताना, जागावाटप हा सर्वात कठीण काम असल्याचे म्हटले. तसेच, काही बड्या पक्षाच्या प्रमुखांनी बैठकीत उपस्थिती न दर्शवल्याने त्यांनी नाराजीही व्यक्त केली.  

जागावाटपावरुन एकमत कठीण

दरम्यान, इंडिया आघाडीची आजची बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. कारण, इंडिया आघाडीला जागावाटप अंतिम करायचे आहे. तर काँग्रेसची राष्ट्रीय आघाडी समिती दररोज राज्यनिहाय जागावाटपावर चर्चा करत आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या टीएमसीने काँग्रेसला लोकसभेच्या ४२ जागांपैकी २ जागांची ऑफर दिली आहे. फक्त दोन जागा असल्यामुळे टीएमसीची या ऑफरसाठी तयारी नसल्याचे काँग्रेसने म्हटले होते. दरम्यान, टीएमसीशी संबंधित सूत्रांनी शुक्रवारी सांगितले की, टीएमसी बंगालमध्ये काँग्रेसला ३ जागा देण्यास तयार आहे, परंतु त्यासाठी टीएमसीला आसाममध्ये दोन आणि मेघालयमध्ये एक जागा द्यावी लागेल. 

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारINDIA Opposition Allianceइंडिया आघाडीLalu Prasad Yadavलालूप्रसाद यादव