शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

नीतीश कुमार मुख्यमंत्रिपद सोडू शकतात; भाजपा नेत्याच्या विधानानं चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2023 15:53 IST

सध्या जेडीयूत सर्वकाही आलबेल नाही. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ललन सिंह यांच्याबाबत विविध बातम्या समोर येत आहेत.

पटना - बिहारमध्ये गेल्या काही दिवसांपासून पुन्हा राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यातच नीतीश कुमार कधीही मुख्यमंत्रिपद सोडू शकतात असं विधान केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते गिरीराज सिंह यांनी केल्यानं खळबळ उडाली आहे. जेडीयूतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला असताना अशावेळी भाजपा नेत्याने हे विधान केले आहे. दिल्लीत जेडीयू नेत्यांच्या राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक होणार आहे. त्यात सहभागी होण्यासाठी अनेक नेते दिल्लीत पोहचलेत. मुख्यमंत्री नीतीश कुमार हेदेखील राजधानीत पोहचले आहेत. 

सध्या जेडीयूत सर्वकाही आलबेल नाही. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ललन सिंह यांच्याबाबत विविध बातम्या समोर येत आहेत. त्यात भाजपाचे दिग्गज नेते गिरीराज सिंह यांनी म्हटलं की, नीतीश कुमार हे मुख्यमंत्रिपद सोडू शकतात. त्यांच्याकडे २ पर्याय आहेत. एकतर पक्षाचे विलीनीकरण करणे किंवा मुख्यमंत्रिपद सोडणे.पण बिहारचे मुख्यमंत्रिपद ते सोडतील हे २०० टक्के निश्चित झाले आहे. ललन सिंह यांच्यावर नितीश कुमार नाराज आहेत. त्यामुळे त्यांना पक्षातील पद सोडण्यास सांगितले जाऊ शकते. 

तसेच लालू यादव आणि नीतीश कुमार यांच्याबाबतही त्यांनी भाष्य केले. लालू यादव मुख्य रणनीतीकार आहेत. तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री बनवण्यासाठी ते काहीही करतील. विधानसभा अध्यक्ष राजदचा आहे ते महत्त्वाची भूमिका पार पाडतील. विधानसभा अध्यक्ष खेळ करतील. नीतीश कुमारांनी जॉर्ज फर्नांडिस, शरद यादव यांनाही सोडले नाही. ललन सिंह यांनाही हटवले तर कुठली मोठी गोष्ट आहे. आतापर्यंत पक्षाच्या ३ राष्ट्रीय अध्यक्षांना हटवण्याचं काम नीतीश कुमार यांनी केले आहे असंही गिरीराज सिंह यांनी म्हटलं.  

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारBJPभाजपा