शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

"नितीश कुमार यांनी विश्वासार्हता गमावली, राजीनामा दिला तर...", ममता बॅनर्जींचे मोठे विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2024 08:07 IST

७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राजभवनात एका कार्यक्रमादरम्यान ममता बॅनर्जी यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

कोलकाता : बिहारच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत. बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दल युनायटेडचे ​​राष्ट्रीय अध्यक्ष नितीश कुमार (Nitish Kumar) हे विरोधकांच्या इंडिया आघाडीतून बाहेर पडणार आणि राज्यात पुन्हा भाजपामध्ये सामील होणार, अशा चर्चा राजकीय वर्तुळात सध्या सुरु आहेत. याच पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी मोठे विधान केले आहे. त्या म्हणाल्या की, नितीशकुमार इंडिया आघाडीमधून बाहेर पडल्यानंतर आघाडीवर फारसा परिणाम होणार नाही.

७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राजभवनात एका कार्यक्रमादरम्यान ममता बॅनर्जी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, "मला वाटते की नितीश कुमार यांनी बिहारच्या लोकांच्या नजरेत आपली विश्वासार्हता गमावली आहे. त्यांनी राजीनामा दिल्यास तेजस्वी यादव यांना बिहारमध्ये सुरळीतपणे काम करणे सोपे होईल." अलीकडेच, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपला पक्ष तृणमूल काँग्रेस पश्चिम बंगालमध्ये आगामी लोकसभा निवडणूक स्वबळावर लढवेल, असे जाहीर केले होते. तसेच, प्रादेशिक पक्ष एकत्र राहतील आणि लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतरच भविष्यातील सर्व निर्णय घेतले जातील, असे त्या म्हणाल्या होत्या. 

दरम्यान, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी केंद्र सरकारला विविध केंद्र पुरस्कृत योजनांतर्गत पश्चिम बंगाल सरकारला केंद्रीय निधी न दिल्याबद्दल चेतावणी देणारी नोट जारी केली. सीएम ममता बॅनर्जी म्हणाल्या, 'जोपर्यंत केंद्राचा निधी येत्या सात दिवसांत दिला जात नाही, तोपर्यंत या मुद्द्यावर आणखी आंदोलने केली जातील.' मुख्यमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, केंद्र सरकारद्वारे विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे राज्य सरकारने समाधानकारक दिल्यानंतर सुद्धा केंद्राचा निधी जारी झालेला नाही. 

इंडिया आघाडीसाठी बजावली महत्त्वाची भूमिकानितीश कुमार सध्या इंडिया आघाडीत आहेत. या आघाडीत विरोधी बाकावरील एकूण २८ घटक पक्ष आहेत. या विरोधकांना एकत्र आणण्यासाठी नितीश कुमार यांनी महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. त्यांनी तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा, शिवसेना (ठाकरे गट) अशा देशातील वेगवेगळ्या नेत्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन विरोधकांना एकत्र येण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे नितीश कुमार यांनी आता भाजपाशी हातमिळवणी केल्यास इंडिया आघाडीच्या भवितव्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते. नितीश कुमार यांच्या या निर्णयाचा बिहारमधील महाआघाडी, तसेच राष्ट्रीय पातळीवरील इंडिया आघाडीला मोठा फटका बसू शकतो. 

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारMamata Banerjeeममता बॅनर्जीBiharबिहार