शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

"विभिषण रामाचा आश्रय घेऊ शकतो, मग नितीश कुमार...", सत्तांतरावर रामभद्राचार्यांचे विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2024 10:06 IST

उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये जगद्गुरू रामभद्राचार्य यांनी भाष्य केले.

बिहारमध्ये गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेले राजकीय नाट्य रविवारी संपुष्टात आले. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार पुन्हा एकदा राष्ट्रीय जनता दल सोडून भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएमध्ये सामील झाले आहेत. नितीश कुमार यांनी भाजपासोबत जात 9 व्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. दरम्यान, जगद्गुरू रामभद्राचार्य यांनी विभिषणाने रामाचा आश्रय घेतल्याचे उदाहरण देत नितीश कुमार यांना राष्ट्रीय जनता दलकडून सन्मान मिळत नसल्याचे म्हटले आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये जगद्गुरू रामभद्राचार्य यांनी भाष्य केले. यावेळी नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याबाबत म्हणाले की, "जे काही घडत आहे ते चांगले आहे. राजकारणात हे सर्व घडत असते. नितीश कुमार यांना तिथे सन्मान मिळत नव्हता. जेव्हा रावणाचा भाऊ विभिषण रामाचा आश्रय घेऊ शकतो, तर मग नितीश कुमार आल्याने काय फरक पडतो."

नितीश कुमार मंत्रिमंडळाची आज पहिली बैठकनितीश कुमार एनडीए युतीत सामील झाल्यानंतर, आज म्हणजेच सोमवारी पहिली मंत्रिमंडळ बैठक होणार आहे. नितीश कुमार यांच्या नवीन मंत्रिमंडळाची पहिली बैठक मंत्रिमंडळ कक्षात सकाळी 11.30 वाजता होणार आहे. बिहार विधानसभेचे अधिवेशन 5 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. याआधी नितीश मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे.

नितीश कुमार यांच्यासह 8 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. सध्या सर्व खाती मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याकडेच राहतील. मंत्रिमंडळाच्या संपूर्ण विस्तारानंतरच मंत्र्यांच्या खात्यांचे विभाजन होण्याची शक्यता आहे. 9व्यांदा बिहारचे मुख्यमंत्री बनल्यावर नितीश कुमार म्हणाले की, मला मुक्ती मिळाली, जिथे होते तिथे परत आलो. सोमवारी मंत्रिमंडळाची पहिली बैठक होणार आहे. तसेच, नितीश कुमार यांनी पंतप्रधान मोदींचे अभिनंदनही केले.

कॅप्टनने इंडिया आघाडी सोडली - आचार्य प्रमोद कृष्णमविरोधी आघाडी 'इंडिया'मध्ये नितीशकुमार संयोजकपदाच्या शर्यतीत पुढे होते. काँग्रेससह बहुतांश पक्षांना एकत्र आणण्याचे काम त्यांनी केले होते, मात्र त्यांना संयोजक करण्यात आले नाही. यामुळे नितीशकुमार नाराज झाल्याचे दिसून आले. तसेच, कोणत्याही पदाची इच्छा नसल्याचे त्यांनी अनेकदा सांगितले. मात्र असे असले तरी आता त्यांनी एनडीएसोबत हातमिळवणी केली आहे. नितीश कुमार एनडीएमध्ये सामील झाल्याबद्दल काँग्रेस नेते आचार्य प्रमोद कृष्णम म्हणाले की, कॅप्टन यांनी इंडिया आघाडी सोडली, हे आमच्यासाठी खूप दुःखद आहे. 

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारBiharबिहार