शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

"विभिषण रामाचा आश्रय घेऊ शकतो, मग नितीश कुमार...", सत्तांतरावर रामभद्राचार्यांचे विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2024 10:06 IST

उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये जगद्गुरू रामभद्राचार्य यांनी भाष्य केले.

बिहारमध्ये गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेले राजकीय नाट्य रविवारी संपुष्टात आले. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार पुन्हा एकदा राष्ट्रीय जनता दल सोडून भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएमध्ये सामील झाले आहेत. नितीश कुमार यांनी भाजपासोबत जात 9 व्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. दरम्यान, जगद्गुरू रामभद्राचार्य यांनी विभिषणाने रामाचा आश्रय घेतल्याचे उदाहरण देत नितीश कुमार यांना राष्ट्रीय जनता दलकडून सन्मान मिळत नसल्याचे म्हटले आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये जगद्गुरू रामभद्राचार्य यांनी भाष्य केले. यावेळी नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याबाबत म्हणाले की, "जे काही घडत आहे ते चांगले आहे. राजकारणात हे सर्व घडत असते. नितीश कुमार यांना तिथे सन्मान मिळत नव्हता. जेव्हा रावणाचा भाऊ विभिषण रामाचा आश्रय घेऊ शकतो, तर मग नितीश कुमार आल्याने काय फरक पडतो."

नितीश कुमार मंत्रिमंडळाची आज पहिली बैठकनितीश कुमार एनडीए युतीत सामील झाल्यानंतर, आज म्हणजेच सोमवारी पहिली मंत्रिमंडळ बैठक होणार आहे. नितीश कुमार यांच्या नवीन मंत्रिमंडळाची पहिली बैठक मंत्रिमंडळ कक्षात सकाळी 11.30 वाजता होणार आहे. बिहार विधानसभेचे अधिवेशन 5 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. याआधी नितीश मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे.

नितीश कुमार यांच्यासह 8 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. सध्या सर्व खाती मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याकडेच राहतील. मंत्रिमंडळाच्या संपूर्ण विस्तारानंतरच मंत्र्यांच्या खात्यांचे विभाजन होण्याची शक्यता आहे. 9व्यांदा बिहारचे मुख्यमंत्री बनल्यावर नितीश कुमार म्हणाले की, मला मुक्ती मिळाली, जिथे होते तिथे परत आलो. सोमवारी मंत्रिमंडळाची पहिली बैठक होणार आहे. तसेच, नितीश कुमार यांनी पंतप्रधान मोदींचे अभिनंदनही केले.

कॅप्टनने इंडिया आघाडी सोडली - आचार्य प्रमोद कृष्णमविरोधी आघाडी 'इंडिया'मध्ये नितीशकुमार संयोजकपदाच्या शर्यतीत पुढे होते. काँग्रेससह बहुतांश पक्षांना एकत्र आणण्याचे काम त्यांनी केले होते, मात्र त्यांना संयोजक करण्यात आले नाही. यामुळे नितीशकुमार नाराज झाल्याचे दिसून आले. तसेच, कोणत्याही पदाची इच्छा नसल्याचे त्यांनी अनेकदा सांगितले. मात्र असे असले तरी आता त्यांनी एनडीएसोबत हातमिळवणी केली आहे. नितीश कुमार एनडीएमध्ये सामील झाल्याबद्दल काँग्रेस नेते आचार्य प्रमोद कृष्णम म्हणाले की, कॅप्टन यांनी इंडिया आघाडी सोडली, हे आमच्यासाठी खूप दुःखद आहे. 

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारBiharबिहार