शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

२०२४च्या निवडणुकीसाठी नितीश कुमारांकडे मोठी जबाबदारी, विरोधी पक्षांच्या बैठकीत झाला निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2023 15:41 IST

Nitish Kumar: पाटणा येथे होत असलेल्या बैठकीत विरोधी पक्षांनी एक मोठा निर्णय घेतला असून, नितीश कुमार यांच्याकडे एक महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवली आहे.  नितीश कुमार हे विरोधी पक्षांच्या एकतेसाठी समन्वयक म्हणून काम पाहणार आहेत.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी आणि भाजपाला रोखण्यासाठी विरोधी पक्ष आज पाटण्यामध्ये एकत्र आले आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या या बैठकीमध्ये काँग्रेस, आप, राष्ट्रवादी काँग्रेससह अनेक प्रमुख पक्ष सहभागी झाले आहेत. या बैठकीत विरोधी पक्षांनी एक मोठा निर्णय घेतला असून, नितीश कुमार यांच्याकडे एक महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवली आहे.  नितीश कुमार हे विरोधी पक्षांच्या एकतेसाठी समन्वयक म्हणून काम पाहणार आहेत.  सर्व पक्षांच्या नेत्यांनी एकमताने हा निर्णय घेतला आहे. नितीश कुमार हे विरोधी ऐक्यासाठी बनणाऱ्या आघाडीचे मुख्य कर्तेधर्ते असतील. ते सर्व पक्षांमध्ये समन्वय स्थापन करण्यसाठी रणनीती आखतील. नितीश कुमार यांच्या नावावर सर्व पक्षांच्या प्रमुखांनी सहमती व्यक्त केल्यानंतर त्याबाबतचा निर्णय जाहीर करण्यात आला. 

या बैठकीत २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय निर्णय घेण्यासाठी नितीश कुमार यांना नियुक्त करण्यात आले आहे. विरोधी पक्षांच्या ऐक्यासाठी होणाऱ्या आगामी बैठका आणि सर्व राजकीय निर्णयांसाठी नितीश कुमार हे जबाबदार असतील.

काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी नितीश कुमार यांच्या नावावर सहमती दर्शवली. त्यानंतर इतर पक्षांनी त्यावर शिक्कामोर्तब केले. दरम्यान, पाटणा येथे होत असलेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीला बीआरएस अनुपस्थित होती. बीआरएसचे नेते टी.आर. रामाराव यांनी माध्यमांशी बोलताना याबाबत सूचक विधान केले आहे. त्यांनी सांगितले की, नितीश कुमार हे खूप चांगले नेते आहेत. मात्र आमच्यासाठी काँग्रेससोबत एकाच मंचावर येणं शक्य नाही. ज्या बैठकीत काँग्रेस असेल तिथे आम्ही असू शकत नाही. देशाच्या सध्याच्या स्थितीसाठी काँग्रेस जबाबदार आहे. आम्ही काँग्रेसला माफ करू शकत नाही. आम्ही भाजपा आणि काँग्रेससोबत जाऊ शकत नाही, असे रामाराव यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारIndiaभारतlok sabhaलोकसभाElectionनिवडणूक